शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध नरसिंगराव, भरमूअण्णा

By admin | Updated: January 20, 2017 01:20 IST

चंदगडमधील लढतीचे संभाव्य चित्र : हालचाली गतिमान; दोन दिवसांत शिक्कामोर्तब

समीर देशपांडे -- कोल्हापूर चंदगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याची माहिती आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मुलाखती सुरू असतानाच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही आघाडी करण्याचे निश्चित झाल्याचे सांगितले. त्यामुळे भरमूअण्णा पाटील आणि नरसिंगराव पाटील गट एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, दोनच दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळीही चंदगडमध्ये दोन्ही पाटील गट एकत्र आले होते. त्यामुळे कॉँग्रेसची सत्ता आल्यानंतर नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव महेश यांना शिक्षण व अर्थ समितीचे सभापतिपद मिळाले; तर भरमूअण्णांच्या सूनबाई ज्योती यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद मिळाले. भरमूअण्णा पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा विधानसभेची निवडणूक ताकदीने लढवायची आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे नरसिंगरावांचे चिरंजीव राजेश आणि महेश यांचे मामा गोपाळराव पाटील यांच्याशी पटू शकत नाही. या पार्श्वभूमीवर पुढील अडचणी ओळखून कुपेकर वहिनींनी भाजपच्या गोपाळराव पाटील यांच्याशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. दौलत साखर कारखाना बंद पडल्याने अडचणीत आलेल्या गोपाळराव पाटील यांनी आधारासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र तेथे भाजपची ताकद नसून गोपाळरावांचा गटच आता भाजपचा म्हणून ओळखला जात आहे. वेळेत आघाडी झाली नाही तर चंदगडमध्ये एकाकी पडण्याची भीती होती; म्हणून संध्यादेवी कुपेकर यांनी हालचाली करीत भाजपशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. येथे जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा आहेत. त्यात सामंजस्याने जागावाटप होईल, असे सध्याचे चित्र आहे. दुसरीकडे, नरसिंगराव आणि भरमूअण्णा गट एकत्र येण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली असून, येत्या दोन दिवसांत जागावाटपाबाबतचा तोडगा निघू शकेल. सध्या दोघांचेही चिरंजीव राजेश व दीपक ‘गोकुळ’मध्ये संचालक आहेत. नरसिंगरावांच्या निधनानंतर जिल्हा बॅँंकेची जागा रिक्त आहे. तेथे त्यांचे चिरंजीव राजेश इच्छुक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी चार जागा घेऊन ही युती होईल. याबाबत बुधवारी पाटणे फाटा, ता. चंदगड येथे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली. या आघाड्यांबरोबरच शिवसेना, स्वाभिमानी यांच्याही भूमिकांविषयी उत्सुकता वाढली असून हे पक्ष स्वतंत्र लढणार की कुणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट होणार आहे.चिन्ह कुठले घ्यायचे?नरसिंगराव पाटील आणि भरमूअण्णा पाटील यांच्या दृष्टिक्षेपातील आघाडीमध्ये चिन्ह कुठले घ्यायचे यावर चर्चा सुरू आहे. भरमूअण्णांचा हातासाठी आग्रह असून राजेश पाटील मात्र आघाडी म्हणून लढू इच्छितात. वेळ पडल्यास जिल्हा बॅँकेच्या वेळी किंवा इतर कामावेळी हाताची अडचण येऊ नये. त्यापेक्षा आघाडी करून लढणे सोयीचे असल्याने त्यांचा तसा आग्रह आहे. कार्यकर्त्यांंशी चर्चा करून आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल. अजून निर्णय झालेला नाही. तशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत. - भरमूआण्णा पाटील