शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘नगरोत्थान’ टक्केवारीत अडकला

By admin | Updated: January 20, 2015 00:56 IST

नियोजनचा खोडा : महापालिकेत देता, आम्हाला का नाही..?

कोल्हापूर : शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून मंजूर केलेला निधी जिल्हा नियोजन विभागातील एका अधिकाऱ्यामुळे अडकून पडला आहे. महापालिकेत तुम्ही प्रत्येक कामाला पैसे देता, मग इथे दिले म्हणजे काय झाले, अशी मागणी त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे होत असल्याचे जबाबदार सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दोन वर्षांचा सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी नियोजन विभागात पडला आहे.राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेसाठी जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून २०१३-१४ साली २ कोटी २५ लाख व २०१४-१५ साठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला तेवढाच हिस्सा महापालिकेने घालायचा आहे. त्यातून रस्ते, गटारींसह विविध स्वरुपांची कामे झाली आहेत. त्याचा पहिल्या वर्षाचा ५७ लाखांचा निधी व दुसऱ्या वर्षाचा ४ कोटी ४९ लाखांचा निधी शासनाने वितरीत केला आहे. हा निधी थेट महापालिकेला न येता तो जिल्हा नियोजन विभागाकडून वितरीत होतो. कारण नियोजन मंडळातर्फेच ही कामे शासनाला सादर झालेली असतात. कामे तरी झाली आहेत, निधीही प्राप्त झाला आहे; परंतु तो नियोजन विभागातून पुढे सरकत नसल्याने त्याची अधिक चौकशी केल्यावर हा निधी एका टेबलला अडवला असल्याचे समजले. निधी लवकर मिळावा म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला पण तो पुढे सरकेना. मग ज्यांनी नगरोत्थानमधील कामे केली आहेत, असे कंत्राटदार जावून थेट साहेबाला भेटले. तिथे पूर्वी महापालिकेत हंगामी कामगार असलेला एक लिपिक म्हणून रुजू झाला. त्यालाही सगळ््यांनी विनंती केली. (प्रतिनिधी)लाख नको, टक्का द्याकामाचे पैसे निघावेत म्हणून कंत्राटदारांनी वर्गणी काढून लाख रुपये लिपीकास द्यायचे निश्चित केल्याचे त्यांना कळविले; परंतु एवढ्यावर भागेना. उलटा निरोप दिला की, लाख नकोत, एक टक्का द्या. त्यामुळे कंत्राटदारांनीही तिकडे जाणेच बंद केले आहे. काहीजण यासंबंधी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे समजते.