शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागदेववाडी पंपिंग आज, तर शिंगणापूर शनिवारपर्यंत सुरु होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:24 IST

कोल्हापूर : शहराला पाणी पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बालिंगा जलशुद्धीकरण केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरु केल्यानंतर आता नागदेववाडी व ...

कोल्हापूर : शहराला पाणी पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बालिंगा जलशुद्धीकरण केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरु केल्यानंतर आता नागदेववाडी व शिंगणापूर येथील उपसा केंद्र सुरु करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. नागदेववाडी उपसा केंद्र आज, बुधवारी सुरु होईल. मात्र शिंगणापूर उपसा केंद्र सुरु होण्याकरिता पंचगंगा नदीची पातळी कमी होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शनिवारपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी सुरु करण्याचा पाणी पुरवठा विभागाचा निर्धार आहे.

बालिंगा उपसा केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरु झाले. त्यातून मंगळवारपासून शहराच्या ए, बी, सी व डी भागाला कमी दाबाने का होईना पाणी पुरवठा सुरु झाला. मंगळवारी सकाळी नागदेववाडी उपसा केंद्रातील मोटारी, स्टार्टर तसेच ओकेव्ही पॅनेल पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याची दुरुस्ती सुरु झाली. आज, बुधवारी मोटार जोडली जाईल. ज्यावेळी बालिंगा जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु होईल तेव्हा प्रतिदिन ६० दशलक्ष लीटर पाणी नागरिकांना देण्यात येईल. सध्या नागदेववाडीचा २० दशलक्ष लीटरचा पुरवठा कमी पडतो आहे. त्यामुळे बालिंगा जरी सुरु झाले असले तरी पाणी कमी दाबाने मिळत आहे.

रोज ८० दशलक्ष लीटर पाणी उपसा करणाऱ्या शिंगणापूर येथील केंद्र सुरु होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे. परंतु पंचगंगा नदीची पातळी अद्यापही कमी झाली नसल्याने केंद्रात दहा ते बारा फूट पाणी असल्याने तेथपर्यंत पोहचून मोटारी बाहेर काढणे शक्य झालेले नाही. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत कर्मचारी काहीच करु शकत नाहीत. या केंद्रात चार मोटारी आहेत, त्या दुरुस्त करण्यासही कालावधी जाणार आहे. पाणी कमी झाल्यावर त्या खोलल्यानंतर पुढे दोन दिवस दुरुस्ती आणि पुन्हा जोडण्यास लागतील.

महानगरपालिकेची पाणी पुरवठ्याची सर्व यंत्रणा तसेच पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत असून विशेषत: जल अभियंता अजय साळुंखे, उप जल अभियंता (यांत्रिकी) जयेश जाधव यांनी उपसा केंद्रावर अक्षरश: ठाण मांडले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक हात राबत आहेत. शनिवारपर्यंत शिंगणापूरचा उपसा सुरु करुन पाणी पुरवठा करण्याचा निर्धार पाणी पुरवठा विभागाने केला आहे.