शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सात ग्रामपंचायती होणार नगरपंचायती

By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST

लोकसंख्येचा निकष : शासनाने मागविल्या हरकती; शुक्रवारी अंतिम मुदत

कोल्हापूर : जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती होणार आहेत. गारगोटी, चंदगड, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी-तनवाड, आजरा, राधानगरी यांचा यामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यातील सर्व तालुकास्तरीय ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याची उद्घोषणा केली आहे. त्यासाठी शुक्रवार (दि.६)पर्यंत हरकती मागविल्या आहेत. तालुकास्तरावर बहुतांश सर्व शासकीय कार्यालये आहेत. बाजारपेठाही आहेत; परंतु ग्रामपंचायत असल्याने तालक्याच्या ठिकाणच्या या गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यातील सर्व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत हरकती शुक्रवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावयाच्या आहेत. आलेल्या हरकतींवर शासनाकडून विचार होऊन त्यानंतर नगरपंचायतींची घोषणा केली जाईल.जिल्ह्यातील सात तालुकास्तरीय ग्रामपंचायतींची माहिती यापूर्वीच नगरपालिका शाखेने शासनाला पाठविली आहे. त्यावरील हरकतीही वेळोवेळी सादर केल्या आहेत; परंतु शासनाच्या घोषणेनुसार कोल्हापुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसंदर्भात पुन्हा हरकती घेण्यात येणार आहेत.२५ हजार लोकसंख्येच्या पुढील गावांचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये, तर १० हजारांच्या पुढे लोकसंख्येच्या गावांचे नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना २१ मे २०१२ ला नगरविकास विभागाने जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिका विभागाला केल्या होत्या. सहायक संचालकांच्या अभिप्रायाबरोबरच २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळ किती?, अकृषक रोजगाराची टक्केवारी किती?, प्रस्तावित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीशेजारी असणाऱ्या नगरपरिषदेचे नाव, यापूर्वी नगरपरिषद अथवा नगरपंचायत करण्यासाठी प्रस्ताव पाठविला असेल, तर त्या प्रस्तावाची प्रत अशी विस्तृत माहिती मागविली होती. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या नगर परिषद विभागाने १० हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सात गावांची यादी तयार केली आहे. या गावांची शासनाला अपेक्षित असणारी सर्व माहिती संकलित करून ती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. सध्या फक्त तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींची नगरपंचायती करण्यासंदर्भात उद्घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रस्तावांचा सध्या तरी विचार झालेला नाही. (प्रतिनिधी)शासननिर्देशानुसार या हरकती ६ तारखेपर्यंत स्वीकारून दोन दिवसांत त्या शासनाकडे पाठविल्या जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही शासनस्तरावरूनच होईल.- ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका विभाग.