शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

सात ग्रामपंचायती होणार नगरपंचायती

By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST

लोकसंख्येचा निकष : शासनाने मागविल्या हरकती; शुक्रवारी अंतिम मुदत

कोल्हापूर : जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती होणार आहेत. गारगोटी, चंदगड, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी-तनवाड, आजरा, राधानगरी यांचा यामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यातील सर्व तालुकास्तरीय ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याची उद्घोषणा केली आहे. त्यासाठी शुक्रवार (दि.६)पर्यंत हरकती मागविल्या आहेत. तालुकास्तरावर बहुतांश सर्व शासकीय कार्यालये आहेत. बाजारपेठाही आहेत; परंतु ग्रामपंचायत असल्याने तालक्याच्या ठिकाणच्या या गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यातील सर्व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत हरकती शुक्रवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावयाच्या आहेत. आलेल्या हरकतींवर शासनाकडून विचार होऊन त्यानंतर नगरपंचायतींची घोषणा केली जाईल.जिल्ह्यातील सात तालुकास्तरीय ग्रामपंचायतींची माहिती यापूर्वीच नगरपालिका शाखेने शासनाला पाठविली आहे. त्यावरील हरकतीही वेळोवेळी सादर केल्या आहेत; परंतु शासनाच्या घोषणेनुसार कोल्हापुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसंदर्भात पुन्हा हरकती घेण्यात येणार आहेत.२५ हजार लोकसंख्येच्या पुढील गावांचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये, तर १० हजारांच्या पुढे लोकसंख्येच्या गावांचे नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना २१ मे २०१२ ला नगरविकास विभागाने जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिका विभागाला केल्या होत्या. सहायक संचालकांच्या अभिप्रायाबरोबरच २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळ किती?, अकृषक रोजगाराची टक्केवारी किती?, प्रस्तावित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीशेजारी असणाऱ्या नगरपरिषदेचे नाव, यापूर्वी नगरपरिषद अथवा नगरपंचायत करण्यासाठी प्रस्ताव पाठविला असेल, तर त्या प्रस्तावाची प्रत अशी विस्तृत माहिती मागविली होती. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या नगर परिषद विभागाने १० हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सात गावांची यादी तयार केली आहे. या गावांची शासनाला अपेक्षित असणारी सर्व माहिती संकलित करून ती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. सध्या फक्त तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींची नगरपंचायती करण्यासंदर्भात उद्घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रस्तावांचा सध्या तरी विचार झालेला नाही. (प्रतिनिधी)शासननिर्देशानुसार या हरकती ६ तारखेपर्यंत स्वीकारून दोन दिवसांत त्या शासनाकडे पाठविल्या जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही शासनस्तरावरूनच होईल.- ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका विभाग.