शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा दिवस ‘काळा दिन’ इचलकरंजीत मोर्चा, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:35 IST

इचलकरंजी : गतवर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानक रद्द केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के चलन अचानक बाद झाल्याने सर्व क्षेत्रांत त्याचे विपरीत परिणाम होत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपा वगळता सर्वपक्षीयांच्यावतीने हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळून या निर्णयाच्या विरोधात ...

ठळक मुद्देभाजप वगळता सर्वपक्षीयांचा समावेशआर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असे जाहीर केले होते

इचलकरंजी : गतवर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानक रद्द केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के चलन अचानक बाद झाल्याने सर्व क्षेत्रांत त्याचे विपरीत परिणाम होत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपा वगळता सर्वपक्षीयांच्यावतीने हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळून या निर्णयाच्या विरोधात येथील के. एल. मलाबादे चौकात निदर्शने केली. तसेच मोर्चाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतल्यानंतर ५० दिवसांत परिस्थिती सुधारेल, आर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असे जाहीर केले होते. मात्र, ३६५ दिवस उलटले तरी त्यामध्ये सुधारणा झाली नाही. काळा पैसा नष्ट होईल, दहशतवादी कारवाया थांबतील, भ्रष्टाचार कमी होईल, अशा अनेक वल्गना केल्या होत्या. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. उलट या निर्णयामुळे देशाच्या बॅँकिंग व्यवस्थेवर मोठा ताण आला. पैसे बदलण्यासाठी रांगेत राहून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यासह अनेक विपरीत परिणामांना जनतेला सामोरे जावे लागले. त्यामुळे या तुघलकी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त हा दिवस काळा दिन म्हणून पाळावा लागत असल्याचे विरोधकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, सदा मलाबादे, आदींची भाषणे झाली. आंदोलनात सयाजी चव्हाण, प्रकाश मोरे यांच्यासह राष्टÑीय कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, माकप, भाकप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सर्व श्रमिक संघ, आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.कबनुरात निषेधकबनूर (ता. हातकणंगले) येथील विविध पक्ष व संघटना यांच्यावतीने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच मंडल अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.निवेदनात, मोदी शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशवासीयांना मोठी हानी पोहोचविली आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे या हुकूमशाही शासनाचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.यावेळी अशोक कांबळे, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर, राहुल कांबळे, बी. जी. देशमुख, नीलेश पाटील, बबन केटकाळे, आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.