शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

नोटाबंदीचा दिवस ‘काळा दिन’ इचलकरंजीत मोर्चा, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:35 IST

इचलकरंजी : गतवर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानक रद्द केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के चलन अचानक बाद झाल्याने सर्व क्षेत्रांत त्याचे विपरीत परिणाम होत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपा वगळता सर्वपक्षीयांच्यावतीने हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळून या निर्णयाच्या विरोधात ...

ठळक मुद्देभाजप वगळता सर्वपक्षीयांचा समावेशआर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असे जाहीर केले होते

इचलकरंजी : गतवर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानक रद्द केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के चलन अचानक बाद झाल्याने सर्व क्षेत्रांत त्याचे विपरीत परिणाम होत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपा वगळता सर्वपक्षीयांच्यावतीने हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळून या निर्णयाच्या विरोधात येथील के. एल. मलाबादे चौकात निदर्शने केली. तसेच मोर्चाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतल्यानंतर ५० दिवसांत परिस्थिती सुधारेल, आर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असे जाहीर केले होते. मात्र, ३६५ दिवस उलटले तरी त्यामध्ये सुधारणा झाली नाही. काळा पैसा नष्ट होईल, दहशतवादी कारवाया थांबतील, भ्रष्टाचार कमी होईल, अशा अनेक वल्गना केल्या होत्या. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. उलट या निर्णयामुळे देशाच्या बॅँकिंग व्यवस्थेवर मोठा ताण आला. पैसे बदलण्यासाठी रांगेत राहून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यासह अनेक विपरीत परिणामांना जनतेला सामोरे जावे लागले. त्यामुळे या तुघलकी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त हा दिवस काळा दिन म्हणून पाळावा लागत असल्याचे विरोधकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, सदा मलाबादे, आदींची भाषणे झाली. आंदोलनात सयाजी चव्हाण, प्रकाश मोरे यांच्यासह राष्टÑीय कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, माकप, भाकप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सर्व श्रमिक संघ, आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.कबनुरात निषेधकबनूर (ता. हातकणंगले) येथील विविध पक्ष व संघटना यांच्यावतीने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच मंडल अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.निवेदनात, मोदी शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशवासीयांना मोठी हानी पोहोचविली आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे या हुकूमशाही शासनाचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.यावेळी अशोक कांबळे, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर, राहुल कांबळे, बी. जी. देशमुख, नीलेश पाटील, बबन केटकाळे, आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.