शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

नाबार्ड देणार पाणी बचतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:32 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणी मुबलक असले तरी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे वळले पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.‘नाबार्ड’च्यावतीने पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाचा प्रारंभ सोमवारी जिल्हा बॅँकेत करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माने म्हणाल्या, जिल्हा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणी मुबलक असले तरी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे वळले पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.‘नाबार्ड’च्यावतीने पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाचा प्रारंभ सोमवारी जिल्हा बॅँकेत करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माने म्हणाल्या, जिल्हा बॅँकेने शेतकºयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या आहेत. ‘नाबार्ड’ने योजनांचा केवळ प्रसार न करता शेतकºयांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘नाबार्ड’चे सहायक महाप्रबंधक नंदू नाईक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ९४ टक्के शेतकरी पाच एकरांच्या आतील आहेत. त्यामुळे उत्पादकता वाढली तरच शेती किफायतशीर होऊ शकते. उत्पादकता वाढीसाठी ठिबकची गरज असून, ‘नाबार्ड’ने त्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे. पाच तालुक्यांतील शंभर गावांमध्ये जाऊन जैन इरिगेशन व दृष्टी ग्राम कृषी विकास संस्थेचे पदाधिकारी शेतकºयांमध्ये प्रबोधन करतील.यावेळी जैन इरिगेशनचे उद्धव पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, आसिफ फरास, उदयानी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. पाण्याचा कार्यक्षम वापर अभियान व्हॅनचा प्रारंभ निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार, बॅँकेचे संचालक अनिल पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजीव आवळे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, आर. के. पोवार, विलास गाताडे, विविध गावांतील सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यवस्थापक जी. एस. शिंदे यांनी आभार मानले.ठिबक कर्जावरील व्याज आवाक्याबाहेरजिल्ह्यातील पहिले शंभर टक्के ठिबक राबविणारे कारभारवाडी (ता. करवीर) येथील शेतकरी साळोखे म्हणाले, ठिबकमुळे एकरी ४०-५० टन उसाचे उत्पादन मिळते; पण ठिबकसाठी काढलेल्या कर्जाचा व्याजदर परवडत नाही. त्यासाठी ‘नाबार्ड’ने मदत केल्यास ठिबकचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल.रुकडीचा खडकाळ माळ फुलला!रयत शिक्षण संस्थेने जैन इरिगेशनच्या मदतीने रुकडी येथील खडकाळ माळ फुलविला आहे. शंभर एकरांत ऊस, सोयाबीनसह फळांच्या बागा डोलू लागल्या असून, ठिबकची शेती किफायतशीर कशी, याचे उत्तम उदाहरण आहे. लवकरच याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.