शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

नाबार्ड देणार पाणी बचतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:32 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणी मुबलक असले तरी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे वळले पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.‘नाबार्ड’च्यावतीने पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाचा प्रारंभ सोमवारी जिल्हा बॅँकेत करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माने म्हणाल्या, जिल्हा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणी मुबलक असले तरी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे वळले पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.‘नाबार्ड’च्यावतीने पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाचा प्रारंभ सोमवारी जिल्हा बॅँकेत करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माने म्हणाल्या, जिल्हा बॅँकेने शेतकºयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या आहेत. ‘नाबार्ड’ने योजनांचा केवळ प्रसार न करता शेतकºयांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘नाबार्ड’चे सहायक महाप्रबंधक नंदू नाईक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ९४ टक्के शेतकरी पाच एकरांच्या आतील आहेत. त्यामुळे उत्पादकता वाढली तरच शेती किफायतशीर होऊ शकते. उत्पादकता वाढीसाठी ठिबकची गरज असून, ‘नाबार्ड’ने त्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे. पाच तालुक्यांतील शंभर गावांमध्ये जाऊन जैन इरिगेशन व दृष्टी ग्राम कृषी विकास संस्थेचे पदाधिकारी शेतकºयांमध्ये प्रबोधन करतील.यावेळी जैन इरिगेशनचे उद्धव पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, आसिफ फरास, उदयानी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. पाण्याचा कार्यक्षम वापर अभियान व्हॅनचा प्रारंभ निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार, बॅँकेचे संचालक अनिल पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजीव आवळे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, आर. के. पोवार, विलास गाताडे, विविध गावांतील सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यवस्थापक जी. एस. शिंदे यांनी आभार मानले.ठिबक कर्जावरील व्याज आवाक्याबाहेरजिल्ह्यातील पहिले शंभर टक्के ठिबक राबविणारे कारभारवाडी (ता. करवीर) येथील शेतकरी साळोखे म्हणाले, ठिबकमुळे एकरी ४०-५० टन उसाचे उत्पादन मिळते; पण ठिबकसाठी काढलेल्या कर्जाचा व्याजदर परवडत नाही. त्यासाठी ‘नाबार्ड’ने मदत केल्यास ठिबकचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल.रुकडीचा खडकाळ माळ फुलला!रयत शिक्षण संस्थेने जैन इरिगेशनच्या मदतीने रुकडी येथील खडकाळ माळ फुलविला आहे. शंभर एकरांत ऊस, सोयाबीनसह फळांच्या बागा डोलू लागल्या असून, ठिबकची शेती किफायतशीर कशी, याचे उत्तम उदाहरण आहे. लवकरच याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.