शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

माझा लढा शिवाजी पेठेतील नागरिकांशी नाही

By admin | Updated: August 28, 2016 00:42 IST

चंद्रदीप नरके : काहीजण जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याची टीका

कोल्हापूर : माझा लढा हद्दवाढविरोधी आहे. शिवाजी पेठेतील नागरिकांशी नाही, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी पेठ व १८ गावांतील ग्रामीण जनता आणि पर्यायाने माझ्यामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणारे लोक कोण आहेत, याचा शिवाजी पेठेतील जनतेने गांभीर्याने विचार करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीतर्फे मेळावा झाला होता. मेळाव्यात, शिवाजी पेठेत राहून पेठेतील जनतेबाबत चुकीची वक्तव्ये केल्याबद्दल आमदार चंद्रदीप नरके यांचा निषेध नोंदवीत त्यांच्यावर प्रखर टीका केली होती. तिला आमदार नरके यांनी संयमाने उत्तर दिले. आमदार नरके म्हणाले, शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात आम्ही सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. पण सध्या हद्दवाढीबाबत महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि हद्दवाढसमर्थक यांची माझ्याविरुद्ध निरर्थक आणि संदर्भहीन वैयक्तिक टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे. माझ्यासह आमच्या नरके घराण्याच्या चार पिढ्या शिवाजी पेठेत वास्तव्यास आहेत. शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात, २० आॅगस्ट रोजी, शहराच्या लोकप्रतिनिधींनी ‘शिवाजी पेठ आली तर १८ गावांतील लोक वाहून जातील’ असे न शोभणारे वक्तव्य केले आहे. आजपर्यंत या लोकप्रतिनिधींनी व हद्दवाढसमर्थक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हीच १८ गावे शहरात समाविष्ट झाल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास होणार, असे वारंवार सांगितले आहे; पण या सभेला उपस्थित असणाऱ्या पेठेतील कोणाही नागरिक अथवा पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले नाही. शिवाजी पेठ आणि १८ गावांतील ग्रामीण जनतेचे ऋणानुबंधाचे संबंध आहेत. त्यांच्यात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हे लोकप्रतिनिधी करीत असल्याची टीका नरके यांनी केली. ६० नाले गायब, नवे रुग्णालय, नाट्यगृह नाही शहराच्या विकासाचा कारभार पाहता एकही नवे रुग्णालय अथवा नाट्यगृह बांधू शकला नाहीत, अशी टीका करीत नरके म्हणाले, नाल्यात भर टाकून ७६ नाल्यांपैकी १६ नाले आपण शिल्लक ठेवले. ड्रेनेजची दुरवस्था, केरकचरा उठावाचा बोजवारा, उपनगरांची दुरवस्था याबाबत टीका करीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कारभाराला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचीही टीका त्यांनी केली. प्रत्यक्षात महापालिकेतील नियोजनशून्य कारभारामुळेच शहराचे नाव व महानगरपालिका बदनाम झाली असल्याबाबत आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले. महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी हद्दवाढीत समाविष्ट केलेल्या गावांना चार वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने कर वाढविला जाणार असे महापालिकेचे पदाधिकारी सांगतात; पण त्याची श्वेतपत्रिका काढा. कारण शेतीवर आरक्षण टाकणार नाही म्हणून ते जाहीररीत्या बोलत असले तरी भविष्यातील विकास आराखड्यात जागांवर आरक्षण टाकण्याचा डाव या पदाधिकाऱ्यांचा दिसतो, असाही आरोप त्यांनी केला.