शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
3
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
4
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
5
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
6
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
7
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
8
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
9
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
10
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
11
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
12
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
13
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
14
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
15
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
16
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
17
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

मुस्लिम मतदार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 00:21 IST

कुरुंदवाड नगरपालिका : सर्वच पक्षांकडून रस्सीखेच सुरू

गणपती कोळी -- कुरुंदवाड -शहरात मुस्लिम मतदार दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा निर्णायक मतदार असून या समाजाचे जास्तीत जास्त मतदार आपल्याकडे ओढण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारीमध्ये चांगले स्थान दिले आहे. त्यामुळे या मतासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच चालू आहे.कोणत्याही निवडणुकीत पक्ष उमेदवारी देताना त्याचे शिक्षण, कार्य, जनसंपर्क यापेक्षा आर्थिक कुवत व जात पाहिली जाते. ज्या-त्या प्रभागात शहरात ज्या समाजाचे वर्चस्व असते, त्या समाजाची मते मिळविण्यासाठी उमेदवारी दिली जाते. मराठा समाजानंतर मुस्लिम समाजाचे शहरात सुमारे ४५०० मतदार असून, प्रभाग ५ व ६ मध्ये निर्णायक मतदार आहेत. तसेच इतर सर्वच प्रभागांत दखल घेण्याइतपत मतदार आहेत. हा मतदार कोणत्या पक्षाकडे वळतो, तो पक्ष विजयश्री खेचण्यात यशस्वी होत असतो. त्यामुळे या समाजाची मते खेचण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच असून पक्षांनी उमेदवारीमध्ये या समाजाला झुकते माप दिले आहे. सर्वच पक्षांनी प्रभाग ४, ५ व ६ मध्ये उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीने नरगीस गौसमहंमद बारगीर, फारुक मौला जमादार, रजियाबेगम नासिरखान पठाण, मुमताज मुस्ताक बागवान, इसाक सैफुद्दीन मोमीन अशी सर्वाधिक पाच उमेदवारी दिली आहे.भाजपने नूरजहाँ सलीम सुतार, दस्तगीर अहमद फकीर (शिवशाही), खुशनजर हरुण पटवेगार (शिवशाही) असे तीन उमेदवार, तर काँग्रेसनेही लियाकत सरदार बागवान, सिमरन शकील गरगरे व मुमताज इसाक बागवान असे तीन उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या माध्यमातून समाजाची मते आपल्याच पक्षाच्या पारड्यात टाकण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.एमआयएम प्रथमच निवडणुकीतयेथील नगरपालिका निवडणुकीत एमआयएम प्रथमच उतरली असून, दलित समाजाचे कार्यकर्ते सुनील कुरुंदवाड यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे, तर प्रभाग ६ मधून तौसिफ यासीन चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एमआयएमची उमेदवारी सर्वच पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे.