शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

कस्तुरीच्या एव्हरेस्ट चढाईमध्ये ‘यास’चा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : एव्हरेस्ट शिखरावर ‘यास’ चक्रीवादळामुळे प्रचंड वेगाने वाहणारे वारे, मोठ्या प्रमाणात पडणारा बर्फ, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली ...

कोल्हापूर : एव्हरेस्ट शिखरावर ‘यास’ चक्रीवादळामुळे प्रचंड वेगाने वाहणारे वारे, मोठ्या प्रमाणात पडणारा बर्फ, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिला कॅम्प दोनवर माघारी परतावे लागले. तिच्यासह ८० जणांचे पथकही वातावरण अनुकूल होण्याच्या प्रतीक्षेत आहे. चढाई केव्हा करायची याबद्दलचा निर्णय स्थानिक प्रशासन व शेर्पा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती गुरुवारी घेणार आहे.

एव्हरेस्ट मोहीम ही नेहमीच हवामानावर अवलंबून राहिली आहे. जास्तीत जास्त माेहिमा २० ते ३० मे यादरम्यान केल्या जातात. यंदासुद्धा २६ ते २८ मे ही वेदर विंडो चढाईसाठी पूरक होती. मात्र, प्रथम अरबी समुद्रातील ‘तौउते’ आणि दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये ‘यास’ वादळाने हवामानाचे सर्व अंदाज बदलून टाकले. अशा अटीतटीच्या वेळी वेगवान वारे आणि कल्पना करू न शकणारा वरून पडणारा बर्फ अशा वेळी एव्हरेस्ट चढाई करणे गिर्यारोहकांच्या जिवावर बेतणारे ठरू शकते. त्यामुळे २६ हजार फुटांवरील कॅम्प चारवर ऑक्सिजनविना मुक्काम करणे शक्य नाही. त्यामुळे कस्तुरीसह ८० जणांचे पथक आणि तितकेच मदत करणारे शेर्पा, असे १६० हून अधिक जण कॅम्प तीन आणि आता कॅम्प दोनवर आले आहेत. तेथेच बेस कॅम्पवरून खाण्याचे साहित्य हेलिकाॅप्टरद्वारे पोहोचविण्यात आले आहे. अशा खडतर आणि जोखमीच्या काळात गिर्यारोहकांच्या हाती केवळ प्रतीक्षा करणेच उरले आहे.

मोहिमेची मुदत वाढविली..

यात दिलासादायक बाब म्हणजे नेपाळ सरकारने यापूर्वी २९ तारीख खुंबूमधील रोप काढण्याची वेळ निश्चित केली होती. मात्र, त्यात बदल करीत ही मुदत ३१ मे पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे कस्तुरी ही मोहीम पूर्ण करून भारताचा तिरंगा लवकरच फडकवील, अशी आशा करवीरकरांना आहे.

कोट

विशेषत: २० ते ३० मे दरम्यान एव्हरेस्ट चढाईसाठी पोषक वातावरण असते. मात्र, प्रथम ‘तौउते’ आणि आता ‘यास’ चक्रीवादळ आले आहे. त्याचा परिणाम हिमालयीन महा लंगूरमध्ये दिसत आहे. पुन्हा चढाईसाठी वातावरण पोषक होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. एव्हरेस्टचा माथा गाठल्यानंतर तात्काळ मागेही तितक्याच वेगाने परतावे लागेल. त्याकरिता नियोजनही आवश्यक आहे.

- विनोद कांबोज,

प्रसिद्ध गिर्यारोहण तज्ज्ञ