शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कस्तुरीच्या एव्हरेस्ट चढाईमध्ये ‘यास’चा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : एव्हरेस्ट शिखरावर ‘यास’ चक्रीवादळामुळे प्रचंड वेगाने वाहणारे वारे, मोठ्या प्रमाणात पडणारा बर्फ, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली ...

कोल्हापूर : एव्हरेस्ट शिखरावर ‘यास’ चक्रीवादळामुळे प्रचंड वेगाने वाहणारे वारे, मोठ्या प्रमाणात पडणारा बर्फ, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिला कॅम्प दोनवर माघारी परतावे लागले. तिच्यासह ८० जणांचे पथकही वातावरण अनुकूल होण्याच्या प्रतीक्षेत आहे. चढाई केव्हा करायची याबद्दलचा निर्णय स्थानिक प्रशासन व शेर्पा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती गुरुवारी घेणार आहे.

एव्हरेस्ट मोहीम ही नेहमीच हवामानावर अवलंबून राहिली आहे. जास्तीत जास्त माेहिमा २० ते ३० मे यादरम्यान केल्या जातात. यंदासुद्धा २६ ते २८ मे ही वेदर विंडो चढाईसाठी पूरक होती. मात्र, प्रथम अरबी समुद्रातील ‘तौउते’ आणि दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये ‘यास’ वादळाने हवामानाचे सर्व अंदाज बदलून टाकले. अशा अटीतटीच्या वेळी वेगवान वारे आणि कल्पना करू न शकणारा वरून पडणारा बर्फ अशा वेळी एव्हरेस्ट चढाई करणे गिर्यारोहकांच्या जिवावर बेतणारे ठरू शकते. त्यामुळे २६ हजार फुटांवरील कॅम्प चारवर ऑक्सिजनविना मुक्काम करणे शक्य नाही. त्यामुळे कस्तुरीसह ८० जणांचे पथक आणि तितकेच मदत करणारे शेर्पा, असे १६० हून अधिक जण कॅम्प तीन आणि आता कॅम्प दोनवर आले आहेत. तेथेच बेस कॅम्पवरून खाण्याचे साहित्य हेलिकाॅप्टरद्वारे पोहोचविण्यात आले आहे. अशा खडतर आणि जोखमीच्या काळात गिर्यारोहकांच्या हाती केवळ प्रतीक्षा करणेच उरले आहे.

मोहिमेची मुदत वाढविली..

यात दिलासादायक बाब म्हणजे नेपाळ सरकारने यापूर्वी २९ तारीख खुंबूमधील रोप काढण्याची वेळ निश्चित केली होती. मात्र, त्यात बदल करीत ही मुदत ३१ मे पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे कस्तुरी ही मोहीम पूर्ण करून भारताचा तिरंगा लवकरच फडकवील, अशी आशा करवीरकरांना आहे.

कोट

विशेषत: २० ते ३० मे दरम्यान एव्हरेस्ट चढाईसाठी पोषक वातावरण असते. मात्र, प्रथम ‘तौउते’ आणि आता ‘यास’ चक्रीवादळ आले आहे. त्याचा परिणाम हिमालयीन महा लंगूरमध्ये दिसत आहे. पुन्हा चढाईसाठी वातावरण पोषक होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. एव्हरेस्टचा माथा गाठल्यानंतर तात्काळ मागेही तितक्याच वेगाने परतावे लागेल. त्याकरिता नियोजनही आवश्यक आहे.

- विनोद कांबोज,

प्रसिद्ध गिर्यारोहण तज्ज्ञ