शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नियतच नसणाऱ्या मुश्रीफांचा बेईमान कारभार

By admin | Updated: April 11, 2015 00:08 IST

संजय घाटगेंचा पलटवार : शिक्षणमंत्री असताना व्हनाळीसाठी माध्यमिक शाळाही दिली नाही

साके : मुश्रीफ यांची लबाडी, खोटेपणा, अनाचार, भ्रष्टाचार हे सगळे कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. त्यांच्या बेईमान कारभाराचे उदाहरण म्हणजे जिल्हा बँक आहेच. पैसा, सत्ता आणि लबाडीने जिल्ह्याला चिरडण्याची राक्षसी प्रवृत्तीच्या मुश्रीफ यांची भाषा असते, त्या ‘नियतच’ नसणाऱ्या मुश्रीफांना देवाचे नाव घेताना लाज कशी वाटत नाही? असा पलटवार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केला.ते व्हनाळी (ता. कागल) येथे पत्रकारांशी बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, व्हनाळीच्या समृद्धी दूध संघाच्या माळावर मुश्रीफ यांनीच तालुक्यात दोन-दोन आमदार असतील, अशी खोटी घोषणा केली. आम्ही विनाभ्रष्टाचार काम करून सामान्यांचे जीवनमान उंचावल्यानेच सत्ता नसतानाही कार्यकर्ते एकनिष्ठ राहिल्याचे कौतुक केले आणि माझ्याच कार्यकर्त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवून माझ्यापासून दूर करून संधीचा फायदा घेतला. असली लबाड, फसवी, अनाचारी वृत्ती लक्षात येताच मी बाजूला झालो. एवढेच काम करणाऱ्या मुश्रीफ यांनी माझे इतर कोणतेही काम केले नाही. युतीत असताना व्हनाळी गावातील मुले चार किलोमीटर चालत जातात, यासाठी माध्यमिक शाळा द्या, एवढीच मागणी मी मुश्रीफ शिक्षणमंत्री असताना केली होती. परंतु, त्यांनी माझीही फसवणूकच केली.घाटगे म्हणाले, जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यावर आमच्या सेवा संस्था आणि कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, या अटीवर जिल्हा बँकेत दोनवेळा मुश्रीफ यांना बिनविरोध निवडून दिले. निवडून आल्यावर दोन दिवससुद्धा ही अट त्यांनी पाळली नाही. जिल्ह्यात पी. एन. पाटील हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी माझ्याशी प्रामाणिक मैत्री आणि भावासारखे प्रेम केले. त्यांच्यामुळेच आम्हाला ‘गोकुळ’चे संचालकपद मिळाले. म्हणूनच ‘गोकुळ’मध्ये सत्तारूढ गटाने उमेदवारी दिली नसली तरी माघार घेण्याचा माझा अंतिम निर्णय झाला होता. परंतु, कागल तालुक्यात सर्वांत जास्त ‘गोकुळ’चे मतदान आमच्या पार्टीकडे असूनसुद्धा आम्हाला डावलल्याच्या क्रोधापोटी कार्यकर्त्यांनी अंबरिश यांची उमेदवारी मागे घेऊ दिली नाही. आमची लोकप्रियता बघून मुश्रीफांना पोटशूळ उठला. महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्यात व आमच्यात व संजय मंडलिक यांच्यात फूट पाडता आली नाही म्हणून ते स्वार्थाची भाषा करून आगपाखड करीत आहेत. परंतु, दिवंगत खा.सदाशिवराव मंडलिकांचा आदर्श ठेवून मतदार आम्हाला निवडून देतील याची खात्री आहे.आमच्या भीतीमुळेच मुश्रीफांचे लोटांगणघाटगे म्हणाले, बोलण्यात बढाई असणाऱ्या मुश्रीफांच्या बाहुबळात दमच नाही. कारण आम्हाला भिऊन भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे जाऊन गुडघे टेकून लोटांगण घातले. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सवयीप्रमाणे विश्वासघात केला आहे.