शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कामेरीत चुलत्याचा पुतण्याकडून निर्घृण खून

By admin | Updated: May 28, 2016 23:44 IST

शेतजमिनीचा वाद : बिल्लू श्वानाने शोधला कोयता, दोघे ताब्यात

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या बांधावरून असलेल्या वादातून चुलत्याचा पुतण्याने चौघांच्या साथीने कोयता आणि कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. बाळासाहेब विष्णू जाधव (वय ५५, रा. शिवाजी पेठ, कामेरी) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडली. पोलिसांनी मुख्य संशयित पुतण्यासह आणखी एकास ताब्यात घेतले आहे. बिल्लू श्वानाने संशयितांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांना शोधून दिला. याप्रकरणी हल्लेखोर यशवंत आनंदा जाधव (३८, रा. कामेरी) व संजय शिवाजी हवालदार (४९, रा. लाल चौक, इस्लामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमित आनंदा जाधव व इतर दोन अनोळखी फरार आहेत. याबाबत बाळासाहेब जाधव यांचा मुलगा संदीप याने फिर्याद दिली आहे. बाळासाहेब जाधव आणि त्यांचा पुतण्या यशवंत जाधव यांच्यामध्ये शेतजमिनीच्या बांधावरून वाद सुरू आहे. ३० वर्षांपासून ही दोन्ही कुटुंबे विभक्त राहात आहेत. त्यांच्या जमिनीच्या वाटण्याही झाल्या आहेत. बाळासाहेब जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात सऱ्या सोडल्या आहेत. शुक्रवारी रात्री दहा वाजता जेवण करून बाळासाहेब जाधव शेतातील वस्तीवर झोपण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा संदीप सकाळी सहा वाजता चहा घेऊन शेतात गेला. त्यावेळी बाळासाहेब जाधव विहिरीवरील मोटार सुरू करून केळीच्या बागेला पाणी पाजण्याची तयारी करीत होते. चहापान झाल्यावर बाळासाहेब दूध आणण्याकरिता माने वस्तीकडे गेले. यावेळी संदीपने सऱ्या उरजण्याचे काम सुरू केले. तेव्हा पुतण्या यशवंत विहिरीजवळ उभा राहून शेतात सोडलेल्या सऱ्यावरून जाब विचारत होता. तो भांडणाच्या तयारीतही आला होता. बाळासाहेब यांनी संदीपला सांगितले की, त्याच्याशी वाद नको, तू घरी जाऊन फराळाचे साहित्य घेऊन ये, तोपर्यंत मी हौदावर कपडे, अंथरुण-पांघरूण धुऊन घेतो. याचवेळी हल्लेखोर यशवंतची आई सुमन हीसुद्धा शेडजवळ उभी होती. संदीप हा पुन्हा पावणेनऊच्या सुमारास शेतात येत असताना यशवंत हा कोयत्याने बाळासाहेब यांच्यावर वार करीत असल्याचे त्याने पाहिले. तेथे आणखी एकाच्या हातात कुऱ्हाड होती. बाळासाहेब यांच्या डोक्यात, मानेवर, उजव्या खांद्यावर हल्लेखोरांनी खोलवर वार केल्याने ते शेतातील पाटात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मानेवरील वार वर्मी बसल्याने खोल जखम झाली होती. त्यांच्या हाता-पायाची हालचाल सुरू असल्याने संदीपने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली. बाळासाहेबांना वाहनातून खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयितांची चप्पल पडली होती. त्यावर सांगलीचा श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. बिल्लू श्वानाला चप्पलचा वास दिल्यावर ते थेट संशयित यशवंत जाधव यांच्या बंद घरासमोर जाऊन थांबले. तेथून इस्लामपूर-कामेरी रस्त्यावर पन्नास मीटर अंतरावर पडलेला कोयताही त्याने शोधून काढला. शेवटी इस्लामपूर रस्त्याने २०० मीटर अंतरापर्यंत त्याने माग दाखवला. यावेळी मानकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कामाला लावत अवघ्या सहा तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप मानकर करीत आहेत.