शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

कामेरीत चुलत्याचा पुतण्याकडून निर्घृण खून

By admin | Updated: May 28, 2016 23:44 IST

शेतजमिनीचा वाद : बिल्लू श्वानाने शोधला कोयता, दोघे ताब्यात

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या बांधावरून असलेल्या वादातून चुलत्याचा पुतण्याने चौघांच्या साथीने कोयता आणि कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. बाळासाहेब विष्णू जाधव (वय ५५, रा. शिवाजी पेठ, कामेरी) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडली. पोलिसांनी मुख्य संशयित पुतण्यासह आणखी एकास ताब्यात घेतले आहे. बिल्लू श्वानाने संशयितांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांना शोधून दिला. याप्रकरणी हल्लेखोर यशवंत आनंदा जाधव (३८, रा. कामेरी) व संजय शिवाजी हवालदार (४९, रा. लाल चौक, इस्लामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमित आनंदा जाधव व इतर दोन अनोळखी फरार आहेत. याबाबत बाळासाहेब जाधव यांचा मुलगा संदीप याने फिर्याद दिली आहे. बाळासाहेब जाधव आणि त्यांचा पुतण्या यशवंत जाधव यांच्यामध्ये शेतजमिनीच्या बांधावरून वाद सुरू आहे. ३० वर्षांपासून ही दोन्ही कुटुंबे विभक्त राहात आहेत. त्यांच्या जमिनीच्या वाटण्याही झाल्या आहेत. बाळासाहेब जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात सऱ्या सोडल्या आहेत. शुक्रवारी रात्री दहा वाजता जेवण करून बाळासाहेब जाधव शेतातील वस्तीवर झोपण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा संदीप सकाळी सहा वाजता चहा घेऊन शेतात गेला. त्यावेळी बाळासाहेब जाधव विहिरीवरील मोटार सुरू करून केळीच्या बागेला पाणी पाजण्याची तयारी करीत होते. चहापान झाल्यावर बाळासाहेब दूध आणण्याकरिता माने वस्तीकडे गेले. यावेळी संदीपने सऱ्या उरजण्याचे काम सुरू केले. तेव्हा पुतण्या यशवंत विहिरीजवळ उभा राहून शेतात सोडलेल्या सऱ्यावरून जाब विचारत होता. तो भांडणाच्या तयारीतही आला होता. बाळासाहेब यांनी संदीपला सांगितले की, त्याच्याशी वाद नको, तू घरी जाऊन फराळाचे साहित्य घेऊन ये, तोपर्यंत मी हौदावर कपडे, अंथरुण-पांघरूण धुऊन घेतो. याचवेळी हल्लेखोर यशवंतची आई सुमन हीसुद्धा शेडजवळ उभी होती. संदीप हा पुन्हा पावणेनऊच्या सुमारास शेतात येत असताना यशवंत हा कोयत्याने बाळासाहेब यांच्यावर वार करीत असल्याचे त्याने पाहिले. तेथे आणखी एकाच्या हातात कुऱ्हाड होती. बाळासाहेब यांच्या डोक्यात, मानेवर, उजव्या खांद्यावर हल्लेखोरांनी खोलवर वार केल्याने ते शेतातील पाटात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मानेवरील वार वर्मी बसल्याने खोल जखम झाली होती. त्यांच्या हाता-पायाची हालचाल सुरू असल्याने संदीपने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली. बाळासाहेबांना वाहनातून खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयितांची चप्पल पडली होती. त्यावर सांगलीचा श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. बिल्लू श्वानाला चप्पलचा वास दिल्यावर ते थेट संशयित यशवंत जाधव यांच्या बंद घरासमोर जाऊन थांबले. तेथून इस्लामपूर-कामेरी रस्त्यावर पन्नास मीटर अंतरावर पडलेला कोयताही त्याने शोधून काढला. शेवटी इस्लामपूर रस्त्याने २०० मीटर अंतरापर्यंत त्याने माग दाखवला. यावेळी मानकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कामाला लावत अवघ्या सहा तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप मानकर करीत आहेत.