शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तरुणाचा खून कवलापूरच्या तालमीतच

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

रिक्षाचालकास अटक : सात दिवस पोलीस कोठडी; खुनातील बांबू, दोरी जप्त; कसून चौकशी

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील करण अनिल खेडकर (वय १७) या तरुणाच्या झालेल्या खूनप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला रिक्षाचालक अरुण शिवाजी माळी (२६, रा. सिद्धेश्वर मंदिराजवळ, कवलापूर) यास शुक्रवारी संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्यानेच करणचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने त्यास सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. करणचा खून करण्यासाठी वापरलेला बांबू व दोरी सायंकाळी जप्त करण्यात आली. करणच्या नात्यातील एका महिलेशी अरुणचे अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. या महिलेशी अरुणची जवळीक वाढल्याने तो तिच्याशी सातत्याने मोबाईलवर बोलत असे; तसेच घरी भेटायलाही जात असे. हा प्रकार करणच्या लक्षात आल्याने, त्याने अरुणला ‘तू आमच्या नात्यातील महिलेकडे का येतोस?, तू तिच्याशी मोबाईलवर का बोलतोस?’, असा जाब विचारला होता. यातून दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता. अनैतिक संबंधात करण अडसर ठरत असल्याचे लक्षात येताच अरुणने त्याची ‘गेम’ करण्याचा बेत आखला होता. त्यानुसार २१ जुलैला त्याने करणला महादेव तालमीमध्ये बोलावून घेतले. प्रथम त्याच्या डोक्यात लाकडी बांबू घातला. यामध्ये तो रक्तबंबाळ होऊन जखमी होताच, अरुणने त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तालमीला कुलूप लावून त्याने पलायन केले होते. करणच्या खुनात सध्या तरी केवळ अरुण माळी याचाच हात असल्याचे निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित माळी सांगली-कवलापूर मार्गावर सहाआसनी रिक्षावर चालक म्हणून काम करतो. घटनेदिवशी तो रिक्षा चालवित होता. दुपारी तीननंतर त्याने रिक्षा चालविणे बंद केले होते. त्यानंतर एका मोटारीतून तो फिरत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यादिवशी महादेव तालमीमध्ये काही पैलवानांनी जेवणाचा बेत आखला होता. यासाठी ते तालमीमध्ये आले होते, पण तालमीस कुलूप होते. त्यांनी अरुणशी संपर्क साधून, तालमीची चावी देण्यास सांगितले. त्यावेळी त्याने आपल्याकडे नसल्याचे सांगितले. तालमीजवळ असलेल्या महादेव मंदिरामध्येही तो सायंकाळी आरतीला गेला होता. मंदिरातील गर्दी कमी झाल्यानंतर व पुजारी गेल्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, अशी माहिती तपासातून पुढे येत आहे. त्याने खून कधी केला, याविषयी त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर अरुणने गावातून पलायन केले होते. त्यास कऱ्हाड (जि. सातारा) येथे पकडण्यात यश आले होते. चौकशीत त्याने करणचा डोक्यात बांबू घालून व दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यास अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी त्यास न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सायंकाळी संजयनगर पोलिसांचे पथक तपासासाठी कवलापुरात गेले होते. अरुणने खुनानंतर लपवून ठेवलेला लाकडी बांबू व गळा आवळण्यासाठी वापरलेली दोरी जप्त केली आहे. (प्रतिनिधी)एकाचाच सहभागसध्या तरी अरुण माळी या एकाच संशयिताचा खुनात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीतून कोणाचे नाव निष्पन्न झाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.महादेव तालमीला सील ठोकलेअरुणने करणचा खून महादेव तालमीत केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री तालमीला भेट देऊन पाहणी केली. रक्ताचे डाग व अन्य काही महत्त्वाचे पुरावे मिळतात का, याची तपासणी केली. त्यानंतर तालमीला सील ठोकले. खुनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कोणाची मोटार वापरली, रक्ताचे डाग पडलेले कपडे कोठे बदलले, खुनानंतर तो कोठे आश्रयाला गेला होता, याबाबत चौकशी केली जात आहे. क्षुल्लक कारणावरून करण खेडकर या तरुणाचा बळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.