शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुदाळ येथे कूरच्या उजव्या कालव्याला भगदाड सोळा शेतकर्‍यांना फटका

By admin | Updated: June 5, 2014 01:05 IST

आठ एकरांतील पिकांचे नुकसान

गारगोटी : मुदाळ (ता. भुदरगड) येथील ‘सुतारकी’ नावाच्या शेताजवळ कूर उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने सोळा शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसले. यात सुमारे आठ एकरांतील ऊस व भात पिकांचे नुकसान झाले. काल, मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक कूर उजव्या कालव्यास भगदाड पडले आणि पाणी उभ्या पिकात शिरले. यात उसासह नवीनच पेरणी केलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी असलेला मुख्य कालव्यातील स्वीच फिरवून पाण्याचा दाब कमी केला व मोठे नुकसान टळले. रविवारी काळम्मावाडी धरणातून मूळ कालव्याला पाणी सोडले. सोमवारी, सकाळी मूळ कालव्यातून कूर उपकालव्याला पाणी सोडले. मुदाळ येथील सुतारकी नावाच्या शेताचा भूभाग सखली आहे व कालवा उंच भागावरून जातो. पावसाळ््यापूर्वी बसरेवाडीसह मिणचे व इतर पाच गावातील पिके व पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. त्यामुळे पूर्ण दाब व पावसाने कालव्याला भगदाड पडले. कालव्याच्या खालील बाजूची शेतातील माती कृष्णात सुतार यांच्या विहिरीत जमा झाली व विहीर गाळाने भरली. शिवाजी सुतार, आनंदा पाटील, साताप्पा पाटील, बाबूराव सुतार, संभाजी पाटील, आनंदा सुतार, सोनाबाई सुतार, बाळू पाटील, हिंदुराव पाटील, श्रीपती पाटील, गणपती पाटील, राजाराम पाटील, बाजीराव पाटील, लहू पाटील याचे ऊस व भात पिकाचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत भगदाड मुजवण्याचे काम पाटबंधारे विभागातर्फे सुरू होते. सरपंच विकास पाटील, तलाठी एस. एन. भोई, शाखा अभियंता के. आय. धुरे, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे केले. या भगदाडाने पुढील काही दिवस पाणी येणार नसल्याने या कालव्यावर विसंबून असणार्‍या सतरा गावांना फटका बसणार आहे. पिके वाळण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)