शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुदाळ येथे कूरच्या उजव्या कालव्याला भगदाड सोळा शेतकर्‍यांना फटका

By admin | Updated: June 5, 2014 01:05 IST

आठ एकरांतील पिकांचे नुकसान

गारगोटी : मुदाळ (ता. भुदरगड) येथील ‘सुतारकी’ नावाच्या शेताजवळ कूर उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने सोळा शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसले. यात सुमारे आठ एकरांतील ऊस व भात पिकांचे नुकसान झाले. काल, मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक कूर उजव्या कालव्यास भगदाड पडले आणि पाणी उभ्या पिकात शिरले. यात उसासह नवीनच पेरणी केलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी असलेला मुख्य कालव्यातील स्वीच फिरवून पाण्याचा दाब कमी केला व मोठे नुकसान टळले. रविवारी काळम्मावाडी धरणातून मूळ कालव्याला पाणी सोडले. सोमवारी, सकाळी मूळ कालव्यातून कूर उपकालव्याला पाणी सोडले. मुदाळ येथील सुतारकी नावाच्या शेताचा भूभाग सखली आहे व कालवा उंच भागावरून जातो. पावसाळ््यापूर्वी बसरेवाडीसह मिणचे व इतर पाच गावातील पिके व पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. त्यामुळे पूर्ण दाब व पावसाने कालव्याला भगदाड पडले. कालव्याच्या खालील बाजूची शेतातील माती कृष्णात सुतार यांच्या विहिरीत जमा झाली व विहीर गाळाने भरली. शिवाजी सुतार, आनंदा पाटील, साताप्पा पाटील, बाबूराव सुतार, संभाजी पाटील, आनंदा सुतार, सोनाबाई सुतार, बाळू पाटील, हिंदुराव पाटील, श्रीपती पाटील, गणपती पाटील, राजाराम पाटील, बाजीराव पाटील, लहू पाटील याचे ऊस व भात पिकाचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत भगदाड मुजवण्याचे काम पाटबंधारे विभागातर्फे सुरू होते. सरपंच विकास पाटील, तलाठी एस. एन. भोई, शाखा अभियंता के. आय. धुरे, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे केले. या भगदाडाने पुढील काही दिवस पाणी येणार नसल्याने या कालव्यावर विसंबून असणार्‍या सतरा गावांना फटका बसणार आहे. पिके वाळण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)