शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

मुदाळ येथे कूरच्या उजव्या कालव्याला भगदाड सोळा शेतकर्‍यांना फटका

By admin | Updated: June 5, 2014 01:05 IST

आठ एकरांतील पिकांचे नुकसान

गारगोटी : मुदाळ (ता. भुदरगड) येथील ‘सुतारकी’ नावाच्या शेताजवळ कूर उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने सोळा शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसले. यात सुमारे आठ एकरांतील ऊस व भात पिकांचे नुकसान झाले. काल, मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक कूर उजव्या कालव्यास भगदाड पडले आणि पाणी उभ्या पिकात शिरले. यात उसासह नवीनच पेरणी केलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी असलेला मुख्य कालव्यातील स्वीच फिरवून पाण्याचा दाब कमी केला व मोठे नुकसान टळले. रविवारी काळम्मावाडी धरणातून मूळ कालव्याला पाणी सोडले. सोमवारी, सकाळी मूळ कालव्यातून कूर उपकालव्याला पाणी सोडले. मुदाळ येथील सुतारकी नावाच्या शेताचा भूभाग सखली आहे व कालवा उंच भागावरून जातो. पावसाळ््यापूर्वी बसरेवाडीसह मिणचे व इतर पाच गावातील पिके व पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. त्यामुळे पूर्ण दाब व पावसाने कालव्याला भगदाड पडले. कालव्याच्या खालील बाजूची शेतातील माती कृष्णात सुतार यांच्या विहिरीत जमा झाली व विहीर गाळाने भरली. शिवाजी सुतार, आनंदा पाटील, साताप्पा पाटील, बाबूराव सुतार, संभाजी पाटील, आनंदा सुतार, सोनाबाई सुतार, बाळू पाटील, हिंदुराव पाटील, श्रीपती पाटील, गणपती पाटील, राजाराम पाटील, बाजीराव पाटील, लहू पाटील याचे ऊस व भात पिकाचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत भगदाड मुजवण्याचे काम पाटबंधारे विभागातर्फे सुरू होते. सरपंच विकास पाटील, तलाठी एस. एन. भोई, शाखा अभियंता के. आय. धुरे, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे केले. या भगदाडाने पुढील काही दिवस पाणी येणार नसल्याने या कालव्यावर विसंबून असणार्‍या सतरा गावांना फटका बसणार आहे. पिके वाळण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)