शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

झोपडपट्टीधारकांचा महापालिकेवर मोर्चा

By admin | Updated: December 5, 2014 00:20 IST

जनसुराज्य पक्ष : सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

कोल्हापूर : ‘आम्ही माणसे आहोत, जगण्याचा आम्हालाही अधिकार आहे, किमान पायाभूत सुविधा तरी द्या,’ अशी मागणी करीत इंदिरानगर झोपडपट्टीधारकांनी आज, गुरुवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. दसरा चौकातून काढलेल्या या मोर्चाचे नेतृत्व जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी निवेदन स्वीकारून चार दिवसांत सुविधा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन झोपडपट्टीधारकांना दिले.शहरात दहा घोषित, तर १६ अघोषित झोपडपट्ट्या आहेत. शहरातील अघोषित झोपडपट्टीधारक महापालिकेचा सर्व कर भरतात. मात्र, यांना कसलीही नागरी सुविधा पुरविली जात नाही. या झोपडपट्टीधारकांचे कार्ड तयार असूनही महापालिकेतर्फे वितरित केलेले नाही. अघोषित झोपडपट्टीधारकांना किमान सुविधा पुरवून महापालिकेने दिलासा द्यावा, यासाठी जनसुराज्य पक्षाने कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात पक्षातर्फे मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. महापालिकेने शहरातील झोपडपट्टी विकास कृती आराखडा तयार करावा, झोपडपट्ट्यांना किमान पायाभूत सुविधा द्याव्यात, राजीव आवास योजना कार्यक्षमपणे राबवावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे झोपडपट्टीधारकांनी केली. इंदिरानगर झोपडपट्टीत उद्या, शुक्रवारी ताराराणी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भेट द्यावी, याचा अहवाल देऊन तत्काळ सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना करावी. शहरातील सर्वच झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण क रावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी प्रशासनाला दिले. महापालिका प्रशासनाकडून झोपडपट्टीधारकांना सुविधा न मिळाल्यास पुढील आठवड्यात पुन्हा ‘जाब विचारो’ मोर्चा काढू, असा इशारा संजय पाटील यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)