शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

मनपा, जि. प. निवडणुका स्वबळावर

By admin | Updated: June 6, 2015 00:54 IST

सरवदे यांची घोषणा : आठवले गट महायुतीतून बाहेर

कोल्हापूर : भाजप सरकारने खासदार रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद दिले नाही़ सत्तेमध्येही दहा टक्के वाटा दिलेला नाही; त्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘आरपीआय’ स्वबळावर लढेल़़, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी शुक्रवारी केली़ पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा़ शहाजी कांबळे यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीतर्फे शाहू स्मारक भवनात सन्मान परिषद झाली. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ़ कृष्णा किरवले, प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव, प्रा़ विजय काळेबाग, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते. प्रा़ कांबळे यांचा राजर्षी शाहूंचा पुतळा व फेटा देऊन गौरव केला़ परिषदेपूर्वी पक्षाच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सरवदे यांच्या हस्ते झाले़सरवदे म्हणाले, गेली पंधरा वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून निराशा पदरी आली़ आता भाजपनेही तीच री ओढली आहे़ येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यासाठी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिले आहेत़ शहाजी कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात रिपलिब्कन चळवळ रुजविण्याचे काम केले़ प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये संविधानातील बदल, आरक्षणाला विरोध करण्यासाठी गुप्त डाव सुरू आहेत़ डॉ़ आंबेडकर यांच्या वैचारिकतेचा पुरस्कार करणारे गोविंद पानसरे व डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या या घटना डोळसपणे पाहिल्या पाहिजेत़डॉ़ कृष्णा किरवले म्हणाले, आंबेडकरी प्रवाहाचा गैरफायदा घेत काहींनी आरपीआय गटांना बदनाम करण्याचे ठरविले आहे़ आंबेडकरी चळवळीपुढे डावे-उजवे यांचे आव्हान तर आहेच़, याशिवाय आंबेडकरी चळवळीतीलच काही प्रवाह गुप्तपणे आरपीआय गटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करीत आहेत़ प्रा. विजय काळेबाग, डॉ़ अनिल माने, बहुजन दलित महासंघाचे संस्थापक बबन सावंत, संजय लोखंडे, रूपा वायंदडे, प्रा़ सुरेखा कांबळे, आदींची भाषणे झाली़ यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य शामप्रसाद कांबळे, बी़ के. कांबळे, सचिव मंगलराव माळगे, अशोक सरवदे, आदी उपस्थित होते़ शहाजी कुरणे यांनी सूत्रसंचालन केले़ सुखदेव बुद्ध्याळकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)तिथून चळवळनामांतर, ‘रिडल्स’मधील लढाऊ आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे काम प्रस्थापित साहित्यिकांनी आणि राजकारण्यांनी केले होते; पण या कार्यकर्त्यांचा विचार नेटाने पुढे नेण्याचा निर्धार केला अन् तिथून चळवळ सुरू झाली, असे प्रा़ शहाजी कांबळे म्हणाले.