शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

मनपा, जि. प. निवडणुका स्वबळावर

By admin | Updated: June 6, 2015 00:54 IST

सरवदे यांची घोषणा : आठवले गट महायुतीतून बाहेर

कोल्हापूर : भाजप सरकारने खासदार रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद दिले नाही़ सत्तेमध्येही दहा टक्के वाटा दिलेला नाही; त्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘आरपीआय’ स्वबळावर लढेल़़, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी शुक्रवारी केली़ पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा़ शहाजी कांबळे यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीतर्फे शाहू स्मारक भवनात सन्मान परिषद झाली. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ़ कृष्णा किरवले, प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव, प्रा़ विजय काळेबाग, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते. प्रा़ कांबळे यांचा राजर्षी शाहूंचा पुतळा व फेटा देऊन गौरव केला़ परिषदेपूर्वी पक्षाच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सरवदे यांच्या हस्ते झाले़सरवदे म्हणाले, गेली पंधरा वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून निराशा पदरी आली़ आता भाजपनेही तीच री ओढली आहे़ येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यासाठी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिले आहेत़ शहाजी कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात रिपलिब्कन चळवळ रुजविण्याचे काम केले़ प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये संविधानातील बदल, आरक्षणाला विरोध करण्यासाठी गुप्त डाव सुरू आहेत़ डॉ़ आंबेडकर यांच्या वैचारिकतेचा पुरस्कार करणारे गोविंद पानसरे व डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या या घटना डोळसपणे पाहिल्या पाहिजेत़डॉ़ कृष्णा किरवले म्हणाले, आंबेडकरी प्रवाहाचा गैरफायदा घेत काहींनी आरपीआय गटांना बदनाम करण्याचे ठरविले आहे़ आंबेडकरी चळवळीपुढे डावे-उजवे यांचे आव्हान तर आहेच़, याशिवाय आंबेडकरी चळवळीतीलच काही प्रवाह गुप्तपणे आरपीआय गटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करीत आहेत़ प्रा. विजय काळेबाग, डॉ़ अनिल माने, बहुजन दलित महासंघाचे संस्थापक बबन सावंत, संजय लोखंडे, रूपा वायंदडे, प्रा़ सुरेखा कांबळे, आदींची भाषणे झाली़ यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य शामप्रसाद कांबळे, बी़ के. कांबळे, सचिव मंगलराव माळगे, अशोक सरवदे, आदी उपस्थित होते़ शहाजी कुरणे यांनी सूत्रसंचालन केले़ सुखदेव बुद्ध्याळकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)तिथून चळवळनामांतर, ‘रिडल्स’मधील लढाऊ आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे काम प्रस्थापित साहित्यिकांनी आणि राजकारण्यांनी केले होते; पण या कार्यकर्त्यांचा विचार नेटाने पुढे नेण्याचा निर्धार केला अन् तिथून चळवळ सुरू झाली, असे प्रा़ शहाजी कांबळे म्हणाले.