शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मनपा, जि. प. निवडणुका स्वबळावर

By admin | Updated: June 6, 2015 00:54 IST

सरवदे यांची घोषणा : आठवले गट महायुतीतून बाहेर

कोल्हापूर : भाजप सरकारने खासदार रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद दिले नाही़ सत्तेमध्येही दहा टक्के वाटा दिलेला नाही; त्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘आरपीआय’ स्वबळावर लढेल़़, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी शुक्रवारी केली़ पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा़ शहाजी कांबळे यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीतर्फे शाहू स्मारक भवनात सन्मान परिषद झाली. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ़ कृष्णा किरवले, प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव, प्रा़ विजय काळेबाग, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते. प्रा़ कांबळे यांचा राजर्षी शाहूंचा पुतळा व फेटा देऊन गौरव केला़ परिषदेपूर्वी पक्षाच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सरवदे यांच्या हस्ते झाले़सरवदे म्हणाले, गेली पंधरा वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून निराशा पदरी आली़ आता भाजपनेही तीच री ओढली आहे़ येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यासाठी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिले आहेत़ शहाजी कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात रिपलिब्कन चळवळ रुजविण्याचे काम केले़ प्राचार्य डॉ़ हरीश भालेराव म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये संविधानातील बदल, आरक्षणाला विरोध करण्यासाठी गुप्त डाव सुरू आहेत़ डॉ़ आंबेडकर यांच्या वैचारिकतेचा पुरस्कार करणारे गोविंद पानसरे व डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या या घटना डोळसपणे पाहिल्या पाहिजेत़डॉ़ कृष्णा किरवले म्हणाले, आंबेडकरी प्रवाहाचा गैरफायदा घेत काहींनी आरपीआय गटांना बदनाम करण्याचे ठरविले आहे़ आंबेडकरी चळवळीपुढे डावे-उजवे यांचे आव्हान तर आहेच़, याशिवाय आंबेडकरी चळवळीतीलच काही प्रवाह गुप्तपणे आरपीआय गटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करीत आहेत़ प्रा. विजय काळेबाग, डॉ़ अनिल माने, बहुजन दलित महासंघाचे संस्थापक बबन सावंत, संजय लोखंडे, रूपा वायंदडे, प्रा़ सुरेखा कांबळे, आदींची भाषणे झाली़ यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य शामप्रसाद कांबळे, बी़ के. कांबळे, सचिव मंगलराव माळगे, अशोक सरवदे, आदी उपस्थित होते़ शहाजी कुरणे यांनी सूत्रसंचालन केले़ सुखदेव बुद्ध्याळकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)तिथून चळवळनामांतर, ‘रिडल्स’मधील लढाऊ आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे काम प्रस्थापित साहित्यिकांनी आणि राजकारण्यांनी केले होते; पण या कार्यकर्त्यांचा विचार नेटाने पुढे नेण्याचा निर्धार केला अन् तिथून चळवळ सुरू झाली, असे प्रा़ शहाजी कांबळे म्हणाले.