शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

प्रदूषण रोखण्याच्या कामांना महापालिकेचे आता प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 01:04 IST

शहर प्रदूषण प्रश्न : बापट कॅम्प नाल्याचे काम आठ दिवसांत सुरू करणार

कोल्हापूर : रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी उच्च न्यायालय, तसेच राष्ट्रीय हरित लवादाने टोकदार अंकुश लावल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने प्रदूषण रोखण्याच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. येत्या आठ दिवसांत बापट कॅम्प येथील नाला अडविण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे, तर कसबा बावडा येथील छत्रपती नाल्यावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याकरिता जागा संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळून नदीचे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत होत्या. इचलकरंजी शहरात काविळीसह अन्य साथींचे आजार पसरले होते. तरीही महानगरपालिका प्रशासन केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देत आपली जबाबदारी टाळत होती; परंतु गेल्या काही वर्षांत पंचगंगा नदी, तसेच रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा वाद हा उच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या कक्षात पोहोचल्यानंतर महानगरपालिका प्रशासनास खडे बोल सुनावण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम चांगलाच झाला असून, राज्य सरकारनेही अमृत योजनेतून ७२ कोटी ४७ लाखांचा निधी महापालिकेस दिला आहे. जयंती नाला पूर्णपणे रोखण्यास प्रशासनास यश आले असून, दुधाळी नालाही अडविण्याचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल. सध्या हे काम ७0 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता लाईन बाजार येथील छत्रपती नाला, तर बापट कॅम्प येथील नाला रोखण्याच्या कामास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. बापट कॅम्प नाला अडविणे तेथून पाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणे या कामाची सुरुवात येत्या आठ दिवसांत होणार आहे. या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने काम केले नाही म्हणून फेरनिविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. ५अशी होईल सांडपाण्यावर प्रक्रिया दुधाळी नाला अडवून त्यातील सांडपाण्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून पुन्हा नदीत ते सोडले जाणार आहे. बापट कॅम्प तसेच लाईन बाजार येथील नाल्यांचे सांडपाणी बंधारे व पंप हाऊस बांधून तेथून ते उचलले जाईल आणि हेच सांडपाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे आणले जाणार आहे. कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता ७५ एमएलडी इतकी असून, सध्या केंद्राकडे जयंती नाल्यातील ४० एमएलडी सांडपाणी वळविण्यात आले आहे.जागा संपादनाची प्रक्रिया सुरूलाईन बाजार येथील छत्रपती नाला अडविण्याकरिता जागा संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रि.स.नं. ९७२, ९७३ व ९५७ पैकी लगतच्या जागेतून येणारा हा नाला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून अडविला जाणार आहे. त्याकरिता २८७३ चौरस मीटर इतकी जागा संपादन करावी लागणार आहे. ना विकास व हरित क्षेत्रात असलेली ही जागा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या ‘कलम ३७’ प्रमाणे विकास आराखड्यात आरक्षित करणे आवश्यक आहे म्हणून तशी प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यासंदर्भात होणाऱ्या फेरबदलांबाबत काही सूचना व हरकती असल्यास त्या एक महिन्याच्या आत देण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.