शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

प्रदूषण रोखण्याच्या कामांना महापालिकेचे आता प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 01:04 IST

शहर प्रदूषण प्रश्न : बापट कॅम्प नाल्याचे काम आठ दिवसांत सुरू करणार

कोल्हापूर : रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी उच्च न्यायालय, तसेच राष्ट्रीय हरित लवादाने टोकदार अंकुश लावल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने प्रदूषण रोखण्याच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. येत्या आठ दिवसांत बापट कॅम्प येथील नाला अडविण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे, तर कसबा बावडा येथील छत्रपती नाल्यावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याकरिता जागा संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळून नदीचे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत होत्या. इचलकरंजी शहरात काविळीसह अन्य साथींचे आजार पसरले होते. तरीही महानगरपालिका प्रशासन केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देत आपली जबाबदारी टाळत होती; परंतु गेल्या काही वर्षांत पंचगंगा नदी, तसेच रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा वाद हा उच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या कक्षात पोहोचल्यानंतर महानगरपालिका प्रशासनास खडे बोल सुनावण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम चांगलाच झाला असून, राज्य सरकारनेही अमृत योजनेतून ७२ कोटी ४७ लाखांचा निधी महापालिकेस दिला आहे. जयंती नाला पूर्णपणे रोखण्यास प्रशासनास यश आले असून, दुधाळी नालाही अडविण्याचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल. सध्या हे काम ७0 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता लाईन बाजार येथील छत्रपती नाला, तर बापट कॅम्प येथील नाला रोखण्याच्या कामास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. बापट कॅम्प नाला अडविणे तेथून पाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणे या कामाची सुरुवात येत्या आठ दिवसांत होणार आहे. या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने काम केले नाही म्हणून फेरनिविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. ५अशी होईल सांडपाण्यावर प्रक्रिया दुधाळी नाला अडवून त्यातील सांडपाण्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून पुन्हा नदीत ते सोडले जाणार आहे. बापट कॅम्प तसेच लाईन बाजार येथील नाल्यांचे सांडपाणी बंधारे व पंप हाऊस बांधून तेथून ते उचलले जाईल आणि हेच सांडपाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे आणले जाणार आहे. कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता ७५ एमएलडी इतकी असून, सध्या केंद्राकडे जयंती नाल्यातील ४० एमएलडी सांडपाणी वळविण्यात आले आहे.जागा संपादनाची प्रक्रिया सुरूलाईन बाजार येथील छत्रपती नाला अडविण्याकरिता जागा संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रि.स.नं. ९७२, ९७३ व ९५७ पैकी लगतच्या जागेतून येणारा हा नाला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून अडविला जाणार आहे. त्याकरिता २८७३ चौरस मीटर इतकी जागा संपादन करावी लागणार आहे. ना विकास व हरित क्षेत्रात असलेली ही जागा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या ‘कलम ३७’ प्रमाणे विकास आराखड्यात आरक्षित करणे आवश्यक आहे म्हणून तशी प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यासंदर्भात होणाऱ्या फेरबदलांबाबत काही सूचना व हरकती असल्यास त्या एक महिन्याच्या आत देण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.