शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

केंद्राकडून महापालिकेचा गौरव

By admin | Updated: December 23, 2016 00:44 IST

हागणदारीमुक्त शहर म्हणून मान्यता : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेस गुरुवारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वच्छता प्रमाणपत्र देण्यात आले. स्वच्छता प्रमाणपत्र महापालिकेच्यावतीने आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वीकारले. नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम पार पडला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून महापौर हसिना फरास व आयुक्त पी. शिवशंकर यांना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. महापौर काही कारणांनी या कार्यक्रमास जाऊ शकल्या नाहीत; पण आयुक्त शिवशंकर यांनी उपस्थिती लावून प्रमाणपत्राचा स्वीकार केला. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. याबाबत राज्य तसेच केंद्र शासनाच्या समितीमार्फत कोल्हापूर शहराची आॅक्टोबरमध्ये पाहणी करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत चांगले काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता. तसेच हागणदारीमुक्त शहर व सेफ सिटी प्रकल्पासाठी कोल्हापूर महापालिकेस राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच स्मार्ट सिटी अवॉर्डने हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले होते.हागणदारीमुक्त शहर होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक, सामुदायिक व पे अँड यूज तत्त्वावरील शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. तसेच खराब व नादुरुस्त शौचालये दुरुस्त करण्यात आली. झोपडपट्टी भागामध्ये खासगी संस्थांच्या सहभागातून तयार शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये, म्हणून विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर...अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर... महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यावर नेहमीच टीका होत असते. परंतु, मनावर घेऊन जाणीवपूर्वक काम केले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे केंद्र शासनाकडून झालेला हा गौरव आहे. हागणदारीमुक्त शहर अभियान राबविताना मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचाऱ्यांनी सहा महिने दररोजच्या कामाव्यतिरिक्त रात्री, तसेच पहाटेच्यावेळी अतिरिक्त काम करून संपूर्ण शहरात मुक्तीचे अभियान राबविले. देशभरात राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त केल्याबद्दल केंद्र सरकारतर्फे गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. आयुक्त पी. शिवशंकर यांनी हा गौरव स्वीकारला. यावेळी केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड उपस्थित होते.