शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

केंद्राकडून महापालिकेचा गौरव

By admin | Updated: December 23, 2016 00:44 IST

हागणदारीमुक्त शहर म्हणून मान्यता : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेस गुरुवारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वच्छता प्रमाणपत्र देण्यात आले. स्वच्छता प्रमाणपत्र महापालिकेच्यावतीने आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वीकारले. नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम पार पडला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून महापौर हसिना फरास व आयुक्त पी. शिवशंकर यांना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. महापौर काही कारणांनी या कार्यक्रमास जाऊ शकल्या नाहीत; पण आयुक्त शिवशंकर यांनी उपस्थिती लावून प्रमाणपत्राचा स्वीकार केला. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. याबाबत राज्य तसेच केंद्र शासनाच्या समितीमार्फत कोल्हापूर शहराची आॅक्टोबरमध्ये पाहणी करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत चांगले काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता. तसेच हागणदारीमुक्त शहर व सेफ सिटी प्रकल्पासाठी कोल्हापूर महापालिकेस राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच स्मार्ट सिटी अवॉर्डने हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले होते.हागणदारीमुक्त शहर होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक, सामुदायिक व पे अँड यूज तत्त्वावरील शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. तसेच खराब व नादुरुस्त शौचालये दुरुस्त करण्यात आली. झोपडपट्टी भागामध्ये खासगी संस्थांच्या सहभागातून तयार शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये, म्हणून विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर...अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर... महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यावर नेहमीच टीका होत असते. परंतु, मनावर घेऊन जाणीवपूर्वक काम केले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे केंद्र शासनाकडून झालेला हा गौरव आहे. हागणदारीमुक्त शहर अभियान राबविताना मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचाऱ्यांनी सहा महिने दररोजच्या कामाव्यतिरिक्त रात्री, तसेच पहाटेच्यावेळी अतिरिक्त काम करून संपूर्ण शहरात मुक्तीचे अभियान राबविले. देशभरात राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त केल्याबद्दल केंद्र सरकारतर्फे गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. आयुक्त पी. शिवशंकर यांनी हा गौरव स्वीकारला. यावेळी केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड उपस्थित होते.