शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून महापालिकेचा गौरव

By admin | Updated: December 23, 2016 00:44 IST

हागणदारीमुक्त शहर म्हणून मान्यता : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेस गुरुवारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वच्छता प्रमाणपत्र देण्यात आले. स्वच्छता प्रमाणपत्र महापालिकेच्यावतीने आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वीकारले. नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम पार पडला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून महापौर हसिना फरास व आयुक्त पी. शिवशंकर यांना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. महापौर काही कारणांनी या कार्यक्रमास जाऊ शकल्या नाहीत; पण आयुक्त शिवशंकर यांनी उपस्थिती लावून प्रमाणपत्राचा स्वीकार केला. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. याबाबत राज्य तसेच केंद्र शासनाच्या समितीमार्फत कोल्हापूर शहराची आॅक्टोबरमध्ये पाहणी करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत चांगले काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता. तसेच हागणदारीमुक्त शहर व सेफ सिटी प्रकल्पासाठी कोल्हापूर महापालिकेस राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच स्मार्ट सिटी अवॉर्डने हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले होते.हागणदारीमुक्त शहर होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक, सामुदायिक व पे अँड यूज तत्त्वावरील शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. तसेच खराब व नादुरुस्त शौचालये दुरुस्त करण्यात आली. झोपडपट्टी भागामध्ये खासगी संस्थांच्या सहभागातून तयार शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये, म्हणून विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर...अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर... महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यावर नेहमीच टीका होत असते. परंतु, मनावर घेऊन जाणीवपूर्वक काम केले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे केंद्र शासनाकडून झालेला हा गौरव आहे. हागणदारीमुक्त शहर अभियान राबविताना मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचाऱ्यांनी सहा महिने दररोजच्या कामाव्यतिरिक्त रात्री, तसेच पहाटेच्यावेळी अतिरिक्त काम करून संपूर्ण शहरात मुक्तीचे अभियान राबविले. देशभरात राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त केल्याबद्दल केंद्र सरकारतर्फे गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. आयुक्त पी. शिवशंकर यांनी हा गौरव स्वीकारला. यावेळी केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड उपस्थित होते.