शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

महापालिका : नेत्यांची फूस; ‘कारभारी’ सुटले बेफाम; सभेत होणार हातघाई

By admin | Updated: September 26, 2016 00:55 IST

महापालिका : नेत्यांची फूस; ‘कारभारी’ सुटले बेफाम; सभेत होणार हातघाई

तानाजी पोवार ल्ल कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील नेत्यांतील टोकाचा संघर्ष आता महापालिकेतील दोन्हीही आघाड्यांतून दिसून येत आहे. आघाडी नेत्यांनी ‘कारभाऱ्यां’ना फूस लावणे सोडून त्यांना वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा लवकरच दोन्हीही आघाडीत हे प्रकरण हातघाईवर येण्यास वेळ लागणार नाही. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळपट्टीला हात घालण्यापर्यंत या ‘कारभाऱ्यां’ची मजल गेली आहे. महापालिकेत शहराचा विकास करण्यासाठी पाठविलेल्या या नगरसेवकांकडून आता विकासापेक्षा कुरघोडीचे राजकारण केले जाऊ लागल्याने संपूर्ण शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे विकासकामांबाबत कोल्हापूर राज्यात पाठीमागे पडू लागले आहे. महापालिकेत सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. विकासकामांपेक्षा कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. राजकारणात महाडिक-पाटील यांच्यातील संघर्ष महापालिकेतील आघाड्यांतून बाहेर येऊ लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी काठावर बहुमत घेऊन विराजमान असताना विरोधी भाजप-ताराराणी आघाडीनेही राज्यातील सत्तेच्या जोरावर विकासनिधींचा सपाटा लावला आहे; पण नेत्यांतील राजकारणाचे पडसाद आता महापालिकेच्या आघाडीत उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांतील काही कारभाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबावतंत्र टाकून सुरू केलेल्या कार्यपद्धतीला विरोधी आघाडीने थेट विरोध करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीत नगरसेवकांत टोकाच संघर्ष सुरू झाला आहे. या राजकीय संघर्षात काही अधिकाऱ्यांचीही पिळवणूक सुरू आहे. नगरसेवकांचा विकासकामांऐवजी कुरघोडीमध्येच वेळ जाऊ लागला आहे, त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर फेकण्यापासून, अपहरण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळ्याला हात घालण्यापर्यंत या ‘कारभाऱ्यां’ची मजल गेली आहे, नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात दरी निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ही वेळ येत असल्याने कनिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांची अवस्था कल्पनेपलीकडे झाली आहे, त्यामुळे सेवानिवृत्ती, बदलीची अनेकांना घाई लागली आहे. दोन आघाड्यांतील वाद आता चांगलाच भडकला आहे. विकासकामांत कोल्हापूर पिछाडीवर वाद आणि आघाड्यांतील कुरघोडीमुळे ‘कारभारी’ प्रशासनावर दबाव टाकून आपली ‘काही’ कामे करून घेत आहेत. त्यातच दोन्हीही आघाडीतील वादामुळे शहराचा विकास खुंटत आहे. वर्षभरात एकही मोठे विकासकाम मंजूर झालेले नाही तर कचरा, वीज निर्मिती, कत्तलखाना, पाटणकर हायस्कूल व टाकाळा येथील जागेत व्यापारी संकुलवजा पार्किंग, पाणी योजना आदी कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे यापूर्वी मुंबई, पुणे पाठोपाठ कोल्हापूरचा विकासात नंबर लागत होता, पण आता विकासात नाशिक आणि औरंगाबादनेही कोल्हापूरला मागे टाकले आहे.