शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

मनपाच्या पाणी टँकरला गळती

By admin | Updated: January 7, 2015 23:53 IST

नासाडी : टँकरची दुरवस्था, डागडुजी आणि नूतनीकरणाची गरज

कोल्हापूर : शहरवासीयांसाठी उपसा करण्यात येणाऱ्या एकूण पाण्यापैकी ३० टक्के पाणी गळक्या पाईपमुळे गटारीत वाहून जाते तर घरगुती, व्यावसायिक तसेच क्रीडा कारणासाठी पाणीवहनाचे काम करणाऱ्या महापालिकेच्या टॅँकरला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ‘पाणी वाचवा’चा संदेश देणाऱ्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे.महापालिकेकडून दररोज १२० ते १३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा पंचगंगेतून उपसा केला जातो. मात्र, यातील २५ ते ३० टक्के पाणी पाईपलाईनच्या गळतीमुळे वाया जात असल्याचे चित्र आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा विचार केल्यास या पाण्याची किंमत महिन्याला एक कोटींपेक्षा जास्त भरते. परिणामी, वर्षाला साधारण १० ते १५ कोटी रुपयांची नासाडी गळक्या पाईपलाईनमुळे होत आहे. पाण्याची गळती, दुरुस्ती व त्यामुळे होणारे रस्त्यांचे नुकसान, असे मिळून किमान महिन्याला कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत.गळक्या पाईपलाईनवर सध्या तरी महापालिकेकडे दुरूस्त्या करण्याशिवाय उपाय नाही. एक गळती काढली की दुसऱ्या गळत्या स्वागताला तयार असतात. या गळत्यांमधून पाण्याची नासाडी कमी होते म्हणून की काय महापालिकेला गळणाऱ्या टँकरकडे पाहण्यास वेळ नाही. महापालिकेकडे असणारे सर्वच टॅँकर वयोमानानुसार जुने झाले आहेत. सततच्या वापरामुळे टॅँकरची टाकी गंजली आहे. तसेच त्यांचे आयुष्यमानदेखील संपत आले आहे. गळणाऱ्या टँकरमधून दररोज हजारो लिटर शुद्ध केलेले पाणी वाया जाते. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने टँकरच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)वाहनधारकांची कसरतमहापालिकेचे पाण्याचे टँकर मागणीनुसार शहरभर पाणी पुरविण्याचे काम करत असतात. कसबा बावडा जलशुद्धिकरण केंद्रातून टँकरमध्ये पाणी भरले जाते. गळके टँकर रस्त्यावर पाण्याचा लोंढा सोडत जातात. त्यामुळे रस्त्यांवरही पाणीच पाणी होते.धूळ व टँकरच्या पाण्यामुळे रस्ते निसरडे झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.अपव्ययाचा आकडादररोज उपसा १२० ते १३० दशलक्ष लिटर (एमएलडी) सर्वप्रकारच्या गळतीमुळे दररोज २५ ते ३५ एमएलडी पाण्याची नासाडीवर्षाला गळतीमुळे १० ते १५ कोटी रुपयांची नासाडी दुरुस्तीच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च