शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

मुंबईच्या पावसाचा कोल्हापूरच्या प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:19 IST

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे

ठळक मुद्दे महालक्ष्मी एक्स्प्रेससह लक्झरी बसेस रद्द : प्रवाशांचे हाल मुंबईहूनसुद्धा कोल्हापूरला एकही गाडी निघालेली नाही. खासगी लक्झरी बस वाहतूक चालकांनी मात्र मुंबईला जाणाºया अनेक बसेस रद्द केल्या.

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी रात्री येथून मुंबईला जाणाºया महालक्ष्मी एक्स्प्रेस या रेल्वेसह अनेक खासगी लक्झरी बसेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयांतील कर्मचाºयांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग घडले.

कोल्हापूरहून मुंबईला रोज रात्री साडेआठ वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे जाते; तर त्याच वेळी ती मुंबईतील ‘सीएसटी’वरून कोल्हापूरला निघते; परंतु या दोन्ही गाड्या अचानक रद्द करण्यात आल्या. कोल्हापुरातून रात्री साडेदहा वाजता स'ाद्री एक्स्प्रेस मुंबईला जाते. त्या गाडीबाबत मात्र रेल्वेस्थानकाला काहीच सूचना न मिळाल्याने ती नेहमीप्रमाणे सोडण्यात आली.

महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एस.टी. महामंडळाला कळवून एस. टी. बससेवा देता येते का पहा, म्हणून कळविले. त्यानुसार कोल्हापूर आगाराच्या चार बसेस रात्री आठ नंतर रेल्वेस्थानकावर लावण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांना फारसे प्रवासी मिळाले नाहीत. एस.टी.तर्फे रात्री इसापूर-मुंबई व कडगाव मुंबई या दोन बसगाड्या सोडण्यात आल्याचे मध्यवर्ती बसस्थानकावरून सांगण्यात आले.खासगी लक्झरी बस वाहतूक चालकांनी मात्र मुंबईला जाणाºया अनेक बसेस रद्द केल्या.

नाकोडा, घाटगे-पाटील, हमसफर, आदी ट्रॅव्हल्समधून गाड्या रद्द केल्याचे सांगण्यात आले; तर कोंडूसकर ट्रॅव्हल्सने त्यांच्या चार बसगाड्या सायनपर्यंत सोडल्या आहेत. मुंबईत साचलेले पाणी आणि राष्टÑीय महामार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी मुंबईला गाड्या सोडणे रद्द केले. तसेच मुंबईहूनसुद्धा कोल्हापूरला एकही गाडी निघालेली नाही. बस तसेच रेल्वे वाहतूक रद्द झाल्यामुळे प्रवासी वर्गाची मात्र मोठी गैरसोय झाली.

आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी मात्र गाड्या रद्द करू नका म्हणून रात्री काही ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयात वाद घातले. कुठे अडकून पडायचे तेथे पडू; पण तुम्ही बसेस सोडा म्हणून प्रवाशांनी आग्रह धरला; तर मुंबई शहरात वाहनांना प्रवेशबंदी केली असल्याने आपण बसेस सोडू शकत नाही, असे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वादावादीचे प्रसंग घडत होते.