शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

मुंबईच्या पावसाचा कोल्हापूरच्या प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:19 IST

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे

ठळक मुद्दे महालक्ष्मी एक्स्प्रेससह लक्झरी बसेस रद्द : प्रवाशांचे हाल मुंबईहूनसुद्धा कोल्हापूरला एकही गाडी निघालेली नाही. खासगी लक्झरी बस वाहतूक चालकांनी मात्र मुंबईला जाणाºया अनेक बसेस रद्द केल्या.

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी रात्री येथून मुंबईला जाणाºया महालक्ष्मी एक्स्प्रेस या रेल्वेसह अनेक खासगी लक्झरी बसेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयांतील कर्मचाºयांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग घडले.

कोल्हापूरहून मुंबईला रोज रात्री साडेआठ वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे जाते; तर त्याच वेळी ती मुंबईतील ‘सीएसटी’वरून कोल्हापूरला निघते; परंतु या दोन्ही गाड्या अचानक रद्द करण्यात आल्या. कोल्हापुरातून रात्री साडेदहा वाजता स'ाद्री एक्स्प्रेस मुंबईला जाते. त्या गाडीबाबत मात्र रेल्वेस्थानकाला काहीच सूचना न मिळाल्याने ती नेहमीप्रमाणे सोडण्यात आली.

महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एस.टी. महामंडळाला कळवून एस. टी. बससेवा देता येते का पहा, म्हणून कळविले. त्यानुसार कोल्हापूर आगाराच्या चार बसेस रात्री आठ नंतर रेल्वेस्थानकावर लावण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांना फारसे प्रवासी मिळाले नाहीत. एस.टी.तर्फे रात्री इसापूर-मुंबई व कडगाव मुंबई या दोन बसगाड्या सोडण्यात आल्याचे मध्यवर्ती बसस्थानकावरून सांगण्यात आले.खासगी लक्झरी बस वाहतूक चालकांनी मात्र मुंबईला जाणाºया अनेक बसेस रद्द केल्या.

नाकोडा, घाटगे-पाटील, हमसफर, आदी ट्रॅव्हल्समधून गाड्या रद्द केल्याचे सांगण्यात आले; तर कोंडूसकर ट्रॅव्हल्सने त्यांच्या चार बसगाड्या सायनपर्यंत सोडल्या आहेत. मुंबईत साचलेले पाणी आणि राष्टÑीय महामार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी मुंबईला गाड्या सोडणे रद्द केले. तसेच मुंबईहूनसुद्धा कोल्हापूरला एकही गाडी निघालेली नाही. बस तसेच रेल्वे वाहतूक रद्द झाल्यामुळे प्रवासी वर्गाची मात्र मोठी गैरसोय झाली.

आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी मात्र गाड्या रद्द करू नका म्हणून रात्री काही ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयात वाद घातले. कुठे अडकून पडायचे तेथे पडू; पण तुम्ही बसेस सोडा म्हणून प्रवाशांनी आग्रह धरला; तर मुंबई शहरात वाहनांना प्रवेशबंदी केली असल्याने आपण बसेस सोडू शकत नाही, असे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वादावादीचे प्रसंग घडत होते.