शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मुंबईच्या पावसाचा कोल्हापूरच्या प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:19 IST

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे

ठळक मुद्दे महालक्ष्मी एक्स्प्रेससह लक्झरी बसेस रद्द : प्रवाशांचे हाल मुंबईहूनसुद्धा कोल्हापूरला एकही गाडी निघालेली नाही. खासगी लक्झरी बस वाहतूक चालकांनी मात्र मुंबईला जाणाºया अनेक बसेस रद्द केल्या.

कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी रात्री येथून मुंबईला जाणाºया महालक्ष्मी एक्स्प्रेस या रेल्वेसह अनेक खासगी लक्झरी बसेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयांतील कर्मचाºयांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग घडले.

कोल्हापूरहून मुंबईला रोज रात्री साडेआठ वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे जाते; तर त्याच वेळी ती मुंबईतील ‘सीएसटी’वरून कोल्हापूरला निघते; परंतु या दोन्ही गाड्या अचानक रद्द करण्यात आल्या. कोल्हापुरातून रात्री साडेदहा वाजता स'ाद्री एक्स्प्रेस मुंबईला जाते. त्या गाडीबाबत मात्र रेल्वेस्थानकाला काहीच सूचना न मिळाल्याने ती नेहमीप्रमाणे सोडण्यात आली.

महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एस.टी. महामंडळाला कळवून एस. टी. बससेवा देता येते का पहा, म्हणून कळविले. त्यानुसार कोल्हापूर आगाराच्या चार बसेस रात्री आठ नंतर रेल्वेस्थानकावर लावण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांना फारसे प्रवासी मिळाले नाहीत. एस.टी.तर्फे रात्री इसापूर-मुंबई व कडगाव मुंबई या दोन बसगाड्या सोडण्यात आल्याचे मध्यवर्ती बसस्थानकावरून सांगण्यात आले.खासगी लक्झरी बस वाहतूक चालकांनी मात्र मुंबईला जाणाºया अनेक बसेस रद्द केल्या.

नाकोडा, घाटगे-पाटील, हमसफर, आदी ट्रॅव्हल्समधून गाड्या रद्द केल्याचे सांगण्यात आले; तर कोंडूसकर ट्रॅव्हल्सने त्यांच्या चार बसगाड्या सायनपर्यंत सोडल्या आहेत. मुंबईत साचलेले पाणी आणि राष्टÑीय महामार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी मुंबईला गाड्या सोडणे रद्द केले. तसेच मुंबईहूनसुद्धा कोल्हापूरला एकही गाडी निघालेली नाही. बस तसेच रेल्वे वाहतूक रद्द झाल्यामुळे प्रवासी वर्गाची मात्र मोठी गैरसोय झाली.

आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी मात्र गाड्या रद्द करू नका म्हणून रात्री काही ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या कार्यालयात वाद घातले. कुठे अडकून पडायचे तेथे पडू; पण तुम्ही बसेस सोडा म्हणून प्रवाशांनी आग्रह धरला; तर मुंबई शहरात वाहनांना प्रवेशबंदी केली असल्याने आपण बसेस सोडू शकत नाही, असे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वादावादीचे प्रसंग घडत होते.