शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या नेत्यांची मुंबईत रणनीती

By admin | Updated: July 25, 2014 22:15 IST

संपर्कावर भर: मेळावे अन् बैठकांमधून लावली जातेय फिल्डिंग

सातारा : विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुंबईतील मतदारांसाठी आतापासूनच आपली फिल्डिंग लावली आहे. सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी आणि सातारा तालुक्यांतील मुंबईकरांसाठी पाचच दिवसांपूर्वी मेळावा घेतला. ‘कऱ्हाड दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावायला निघालेल्या डॉ. अतुल भोसले यांनीही मुंबई येथे मेळावा घेऊन आपली भूमिका मांडली आहे. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, पाटण, सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतील लाखो मतदार नोकरी तसेच व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्य करून आहेत. कऱ्हाड दक्षिण, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघांतील बहुसंख्य मतदार उदरनिर्वाहासाठी मुंबईत तसेच आजूबाजूच्या उपनगरांत आहेत. परिणामी मुंबईतील मतदार अनेकांच्या विजयाला हातभार लावतो. यामध्ये माथाडी कामगार, कापड मार्केट आणि बेकरी व्यवसायात कामगार अधिक आहेत. त्यामुळे येथील मतदार नेहमीच प्रभावशाली ठरण्याबरोबरच अनेकांच्या विजयाला हातभार लावण्यास उपयुक्त ठरले आहेत.मुंबईमध्ये आजमितीस प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र मंडळे असून, त्या कार्यक्रमांनाही इच्छुक उमेदवार आणि आमदार हजेरी लावू लागले आहेत. कोणत्या उपनगरात किती मतदान आहे, याचीही नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. आपले किती, विरोधक किती याचेही संकलन केले जाऊ लागले आहे.माण विधानसभा मतदार संघातील अनेक मतदार चांदीच्या कामानिमित्त चेन्नई आणि कर्नाटकमध्ये आहेत. त्यांच्यासाठीही येथील इच्छुक अनेकदा मेळावे घेतात. त्यांनीही येथे स्वतंत्र मंडळे स्थापन केली आहेत. त्याच्या वर्धापन दिन अथवा नवीन शाखा उद्घाटनासाठीही स्थानिक नेतेमंडळी अथवा आमदारांना बोलविले जाते. माणमधील अनेक मंडळी मुंबईत रंगकामगार आहे. म्हणूनच संबंधित इच्छुकांनी आतापासूच मुंबईतील मतदारांसाठी फिल्डिंग लावली आहे.(प्रतिनिधी)खर्चाचे गणित मुंबईतील मतदारांना मतदान आहे, तेथेपर्यंत आणणे आणि त्यांना पुन्हा मुंबईत सोडणे ही कामे खूप खर्चिक असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनांची अथवा ट्रॅव्हलसची व्यवस्था करावी लागते. त्याचा खर्च किती येईल, याचाही आराखडा बनविण्याची कामे आत्तापासून सुरुवात झाली आहेत.