शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

साताऱ्याच्या नेत्यांची मुंबईत रणनीती

By admin | Updated: July 25, 2014 22:15 IST

संपर्कावर भर: मेळावे अन् बैठकांमधून लावली जातेय फिल्डिंग

सातारा : विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुंबईतील मतदारांसाठी आतापासूनच आपली फिल्डिंग लावली आहे. सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी आणि सातारा तालुक्यांतील मुंबईकरांसाठी पाचच दिवसांपूर्वी मेळावा घेतला. ‘कऱ्हाड दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावायला निघालेल्या डॉ. अतुल भोसले यांनीही मुंबई येथे मेळावा घेऊन आपली भूमिका मांडली आहे. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, पाटण, सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतील लाखो मतदार नोकरी तसेच व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्य करून आहेत. कऱ्हाड दक्षिण, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघांतील बहुसंख्य मतदार उदरनिर्वाहासाठी मुंबईत तसेच आजूबाजूच्या उपनगरांत आहेत. परिणामी मुंबईतील मतदार अनेकांच्या विजयाला हातभार लावतो. यामध्ये माथाडी कामगार, कापड मार्केट आणि बेकरी व्यवसायात कामगार अधिक आहेत. त्यामुळे येथील मतदार नेहमीच प्रभावशाली ठरण्याबरोबरच अनेकांच्या विजयाला हातभार लावण्यास उपयुक्त ठरले आहेत.मुंबईमध्ये आजमितीस प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र मंडळे असून, त्या कार्यक्रमांनाही इच्छुक उमेदवार आणि आमदार हजेरी लावू लागले आहेत. कोणत्या उपनगरात किती मतदान आहे, याचीही नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. आपले किती, विरोधक किती याचेही संकलन केले जाऊ लागले आहे.माण विधानसभा मतदार संघातील अनेक मतदार चांदीच्या कामानिमित्त चेन्नई आणि कर्नाटकमध्ये आहेत. त्यांच्यासाठीही येथील इच्छुक अनेकदा मेळावे घेतात. त्यांनीही येथे स्वतंत्र मंडळे स्थापन केली आहेत. त्याच्या वर्धापन दिन अथवा नवीन शाखा उद्घाटनासाठीही स्थानिक नेतेमंडळी अथवा आमदारांना बोलविले जाते. माणमधील अनेक मंडळी मुंबईत रंगकामगार आहे. म्हणूनच संबंधित इच्छुकांनी आतापासूच मुंबईतील मतदारांसाठी फिल्डिंग लावली आहे.(प्रतिनिधी)खर्चाचे गणित मुंबईतील मतदारांना मतदान आहे, तेथेपर्यंत आणणे आणि त्यांना पुन्हा मुंबईत सोडणे ही कामे खूप खर्चिक असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनांची अथवा ट्रॅव्हलसची व्यवस्था करावी लागते. त्याचा खर्च किती येईल, याचाही आराखडा बनविण्याची कामे आत्तापासून सुरुवात झाली आहेत.