शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

मुंबई आर.सी.एफ. अंतिम फेरीत

By admin | Updated: April 9, 2016 00:56 IST

व्ही.आय.पी. चषक क्रिकेट

कोल्हापूर : फायटर्स स्पोर्टस् क्लब आयोजित व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात आर. सी. एफ. (मुंबई) संघाने हुंडेकरी स्पोर्टस्चा ७ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरी, तर पुण्याच्या प्रथम स्पोर्टस्ने पॅकर्स स्पोर्टस्चा २८३ धावांनी पराभव करीत पुढील फेरी गाठली. शास्त्रीनगर मैदानावर आर.सी.एफ. व हुंडेकरी स्पोर्टस् यांच्यात उपांत्य फेरीतील सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना हुंडेकरी संघाने ३४.४ षटकांत सर्वबाद १२९ धावा केल्या. यामध्ये अजिम काझीने ३३, मुर्तझा ट्रंकवालाने १५, आशिष देशमुखने १३ धावा केल्या. गोलंदाजी करताना आर.सी.एफ.कडून भारतसिंगने ४, अंकुरसिंगने ३, तर विजय पावसेने २ व सुनील चावरे याने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना आर.सी.एफ.ने २२.५ षटकांत ३ बाद १३२ धावा काढून अंतिम फेरी गाठली. यामध्ये सुनील चावरेने नाबाद ४०, तरनजितसिंग धिलॉनने ३३, तर रवी सोळंकीने नाबाद ३२ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये हुंडेकरी संघाकडून अरिफ शेख, अजिम काझी, अभी दुधे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दुसरा सामना शाहूपुरी जिमखाना येथे प्रथम स्पोर्टस् (पुणे) व पॅकर्स क्लब यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना प्रथम स्पोर्टस्ने ४० षटकांत ६ बाद ४४७ धावांचा डोंगर रचला. यामध्ये वृषभ राठोडने ६३ चेंडूंत नाबाद १५८, तर यश नहारनेही त्यास साथ देत ५१ चेंडूंत ११४ धावा केल्या, तर शुभम रांजणे व अमेय सोमण यांनी प्रत्येकी ४६ धावा करीत आपल्या संघाची धावसंख्या ४४७ अशी विशाल केली. ‘पॅकर्स’कडून हर्षल बोरसेने २, तर मनोज लोखंडे, सौरभ श्रींगारे, अनिल पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पॅकर्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ २७ षटकांत १६४ धावांत गुंडाळला. यामध्ये अनिल पाटीलने नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्यास सचिन उपाध्येने २३ व देवेश वराडेने ३४ धावा काढून मोलाची साथ दिली. मात्र, मोठ्या धावसंख्येने होणारा पराभव हे फलंदाज रोखू शकले नाहीत. प्रथम संघाकडून रुपेश पोपेता याने तीन, तर विजय कोहली, हितेश वलुनी, अमेय सोमण, महेश शिंदे, यश नहार, वृषभ राठोड यांनी प्रत्येकी एक बळी घेत पॅकर्सचा संघ १६४ धावांत गारद करीत तब्बल २८३ धावांनी मात केली. सामनावीर म्हणून वृषभ राठोडला गौरविण्यात आले.