शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मुंबई क्राईम ब्रँचचे पथक रिकाम्या हाताने परतले

By admin | Updated: March 1, 2015 00:36 IST

पानसरे हत्या प्रकरण : तपासाबाबत गोपनीयता

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापुरात तळ ठोकून बसलेले मुंबई क्राईम ब्रँचचे पथक अखेर धागेदोरे न मिळाल्याने रिकाम्या हाताने मुंबईला परतले. आतापर्यंत हाती लागलेल्या माहितीची कोल्हापूर पोलीस अतिशय बारकाईने व तांत्रिकदृष्ट्या खात्री करीत आहेत. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने पोलिसांनी सुरुवातीपासून तपासाबाबत गोपनीयता पाळली आहे. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबने केलेल्या तपासणीत पानसरे व त्यांच्या पत्नीवर मारेकऱ्यांनी दोन पिस्तुलांतून पाच गोळ्या झाडल्या गेल्याचे उघड झाले आहे. या तपासणीचा अहवाल अद्याप कोल्हापूर पोलिसांना प्राप्त झाला नसल्याचे तपास अधिकारी अंकित गोयल यांनी सांगितले. पानसरे यांच्यावरील हत्येच्या तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाचजणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडून माहिती घेतली. रुग्णालयामध्येही जाऊन त्यांनी पानसरे दाम्पत्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्यांनी तपासाला सुरुवात केली. सलग आठ दिवस हे पथक कोल्हापुरात तळ ठोकून होते. या कालावधीत कोणतेच धागेदोरे हाती न लागल्याने ते माघारी मुंबईला परतले. पानसरे यांच्या नातेवाइकांसह त्यांच्या घराशेजारील लोक, सामाजिक, राजकीय संस्थांचे कार्यकर्ते अशा सुमारे २५० पेक्षा जास्त लोकांचे जबाब आतापर्यंत नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे. पुणे फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी प्रत्यक्ष येऊन पंचनामा केला होता. त्या अहवालात मारेकऱ्यांनी दोन पिस्तुलांतून पाच गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा अहवाल अद्याप कोल्हापूर पोलिसांना मिळालेला नाही.