शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मुंबई-बंगलोर कॉरिडॉर प्रश्नी उद्योजक शांत का?

By admin | Updated: March 13, 2016 01:09 IST

सतेज पाटील यांची विचारणा : कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत

कोल्हापूर : मुंबई - बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळल्याने त्याचा येथील विकासाला मोठा फटका बसणार आहे. आम्ही सत्तेत असताना वीज दरवाढीच्या मुद्द्यावरून लढा उभारणारे कोल्हापूरचे उद्योजक हे कॉरिडॉरच्या प्रश्नाबाबत आता का शांत बसले आहेत, असा प्रश्न मला पडला आहे. या कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी या कॉरिडॉरमधील कोल्हापूरचा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यातील विजेचे दर अधिक असल्याच्या कारणावरून आम्ही सत्तेत असताना कोल्हापूरच्या उद्योजकांनी लढा उभारला. सकारात्मक निर्णयासाठी मी स्वत: त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती; पण यानंतर नवे सरकार आले. सरकार येऊन दीड वर्ष झाली तरी विजेचे दर काही कमी झालेले नाहीत. यातच आता भाजप सरकारने मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. त्याचा येथील औद्योगिक विकासाला मोठा फटका बसणार आहे. याबाबत मी आवाज उठविला; पण, अजूनही जिल्ह्णातील एकाही औद्योगिक संघटनेने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. शिवाय या संघटनेचे कोणतेही पदाधिकारी मला या प्रश्नाबाबत भेटायला आले नाहीत. औद्योगिक विकासाला मारक ठरणारा निर्णय असूनही उद्योजक अजूनही का शांत आहेत, हा मला प्रश्न पडला आहे. कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. पण व्यापारी, उद्योजक, आदी सर्व घटकांनी सामूहिकपणे आवाज उठवून सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.’ ते म्हणाले,‘या निर्णयाचा फटका कोल्हापूरच्या विकासावर दूरगामी होणार आहे. विकासाच्या सगळ््या प्रक्रियेतून कोल्हापूर बाजूला पडेल. कोल्हापूरला वगळले जाते आणि त्याचवेळेला सांगली,साताऱ्याचा समावेश केला जातो. कोल्हापूरात जागा उपलब्ध नाहीत असे तकलादू कारण दिले जाते. परंतू कोल्हापूरात अगोदरच चांगले औद्योगिक जाळे तयार झाले आहे. कॉरिडॉरमध्ये समावेश झाल्यास विमानतळ, रेल्वे सेवेचे विस्तारीकरण होईल. देशाच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये या शहराला महत्व येईल. अगोदरच आपला स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेला नाही. आता कॉरिडॉरमधूनही बाजूला गेल्यास होणारे परिणाम गंभीर असतील. म्हणून सर्वच घटकांना त्याचे गांभीर्य वाटले पाहिजे.’ महानगरपालिकेचे मोबाईल अ‍ॅप आम्ही दिलेल्या वचननाम्यानुसार कोल्हापूरच्या विकासाला बळ देणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, शहरवासीयांना पाणी, रस्ते, आदी स्वरूपांतील चांगल्या सुविधा दिल्या जातील. याअंतर्गत लवकरच महापालिकेचे मोबाईल अ‍ॅप सुरू केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम, योजना राबविल्या जातील.(प्रतिनिधी)