शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

मुंबई-बंगलोर कॉरिडॉर प्रश्नी उद्योजक शांत का?

By admin | Updated: March 13, 2016 01:09 IST

सतेज पाटील यांची विचारणा : कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत

कोल्हापूर : मुंबई - बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळल्याने त्याचा येथील विकासाला मोठा फटका बसणार आहे. आम्ही सत्तेत असताना वीज दरवाढीच्या मुद्द्यावरून लढा उभारणारे कोल्हापूरचे उद्योजक हे कॉरिडॉरच्या प्रश्नाबाबत आता का शांत बसले आहेत, असा प्रश्न मला पडला आहे. या कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी या कॉरिडॉरमधील कोल्हापूरचा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यातील विजेचे दर अधिक असल्याच्या कारणावरून आम्ही सत्तेत असताना कोल्हापूरच्या उद्योजकांनी लढा उभारला. सकारात्मक निर्णयासाठी मी स्वत: त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती; पण यानंतर नवे सरकार आले. सरकार येऊन दीड वर्ष झाली तरी विजेचे दर काही कमी झालेले नाहीत. यातच आता भाजप सरकारने मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. त्याचा येथील औद्योगिक विकासाला मोठा फटका बसणार आहे. याबाबत मी आवाज उठविला; पण, अजूनही जिल्ह्णातील एकाही औद्योगिक संघटनेने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. शिवाय या संघटनेचे कोणतेही पदाधिकारी मला या प्रश्नाबाबत भेटायला आले नाहीत. औद्योगिक विकासाला मारक ठरणारा निर्णय असूनही उद्योजक अजूनही का शांत आहेत, हा मला प्रश्न पडला आहे. कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. पण व्यापारी, उद्योजक, आदी सर्व घटकांनी सामूहिकपणे आवाज उठवून सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.’ ते म्हणाले,‘या निर्णयाचा फटका कोल्हापूरच्या विकासावर दूरगामी होणार आहे. विकासाच्या सगळ््या प्रक्रियेतून कोल्हापूर बाजूला पडेल. कोल्हापूरला वगळले जाते आणि त्याचवेळेला सांगली,साताऱ्याचा समावेश केला जातो. कोल्हापूरात जागा उपलब्ध नाहीत असे तकलादू कारण दिले जाते. परंतू कोल्हापूरात अगोदरच चांगले औद्योगिक जाळे तयार झाले आहे. कॉरिडॉरमध्ये समावेश झाल्यास विमानतळ, रेल्वे सेवेचे विस्तारीकरण होईल. देशाच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये या शहराला महत्व येईल. अगोदरच आपला स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेला नाही. आता कॉरिडॉरमधूनही बाजूला गेल्यास होणारे परिणाम गंभीर असतील. म्हणून सर्वच घटकांना त्याचे गांभीर्य वाटले पाहिजे.’ महानगरपालिकेचे मोबाईल अ‍ॅप आम्ही दिलेल्या वचननाम्यानुसार कोल्हापूरच्या विकासाला बळ देणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, शहरवासीयांना पाणी, रस्ते, आदी स्वरूपांतील चांगल्या सुविधा दिल्या जातील. याअंतर्गत लवकरच महापालिकेचे मोबाईल अ‍ॅप सुरू केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम, योजना राबविल्या जातील.(प्रतिनिधी)