शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

मुंबई-बंगलोर कॉरिडॉर प्रश्नी उद्योजक शांत का?

By admin | Updated: March 13, 2016 01:09 IST

सतेज पाटील यांची विचारणा : कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत

कोल्हापूर : मुंबई - बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळल्याने त्याचा येथील विकासाला मोठा फटका बसणार आहे. आम्ही सत्तेत असताना वीज दरवाढीच्या मुद्द्यावरून लढा उभारणारे कोल्हापूरचे उद्योजक हे कॉरिडॉरच्या प्रश्नाबाबत आता का शांत बसले आहेत, असा प्रश्न मला पडला आहे. या कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी या कॉरिडॉरमधील कोल्हापूरचा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यातील विजेचे दर अधिक असल्याच्या कारणावरून आम्ही सत्तेत असताना कोल्हापूरच्या उद्योजकांनी लढा उभारला. सकारात्मक निर्णयासाठी मी स्वत: त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती; पण यानंतर नवे सरकार आले. सरकार येऊन दीड वर्ष झाली तरी विजेचे दर काही कमी झालेले नाहीत. यातच आता भाजप सरकारने मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. त्याचा येथील औद्योगिक विकासाला मोठा फटका बसणार आहे. याबाबत मी आवाज उठविला; पण, अजूनही जिल्ह्णातील एकाही औद्योगिक संघटनेने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. शिवाय या संघटनेचे कोणतेही पदाधिकारी मला या प्रश्नाबाबत भेटायला आले नाहीत. औद्योगिक विकासाला मारक ठरणारा निर्णय असूनही उद्योजक अजूनही का शांत आहेत, हा मला प्रश्न पडला आहे. कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. पण व्यापारी, उद्योजक, आदी सर्व घटकांनी सामूहिकपणे आवाज उठवून सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.’ ते म्हणाले,‘या निर्णयाचा फटका कोल्हापूरच्या विकासावर दूरगामी होणार आहे. विकासाच्या सगळ््या प्रक्रियेतून कोल्हापूर बाजूला पडेल. कोल्हापूरला वगळले जाते आणि त्याचवेळेला सांगली,साताऱ्याचा समावेश केला जातो. कोल्हापूरात जागा उपलब्ध नाहीत असे तकलादू कारण दिले जाते. परंतू कोल्हापूरात अगोदरच चांगले औद्योगिक जाळे तयार झाले आहे. कॉरिडॉरमध्ये समावेश झाल्यास विमानतळ, रेल्वे सेवेचे विस्तारीकरण होईल. देशाच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये या शहराला महत्व येईल. अगोदरच आपला स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेला नाही. आता कॉरिडॉरमधूनही बाजूला गेल्यास होणारे परिणाम गंभीर असतील. म्हणून सर्वच घटकांना त्याचे गांभीर्य वाटले पाहिजे.’ महानगरपालिकेचे मोबाईल अ‍ॅप आम्ही दिलेल्या वचननाम्यानुसार कोल्हापूरच्या विकासाला बळ देणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, शहरवासीयांना पाणी, रस्ते, आदी स्वरूपांतील चांगल्या सुविधा दिल्या जातील. याअंतर्गत लवकरच महापालिकेचे मोबाईल अ‍ॅप सुरू केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम, योजना राबविल्या जातील.(प्रतिनिधी)