शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

हद्दवाढीची वाट बिकट

By admin | Updated: June 5, 2014 01:26 IST

जिल्हा प्रशासनाचाच खो : कारण नसताना अभिप्रायात मुद्दे घुसडले ?

संतोष पाटील ल्ल कोल्हापूर राज्याच्या प्रधान सचिवांच्या लेखी सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेकडे मागितलेल्या अभिप्रायामध्ये हद्दवाढीसंदर्भात कांही नकारात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत. दोन्ही एमआयडीसींचा समावेशास विरोध व एलबीटीसह करप्रणालीचे धोरण ठरविण्याबाबतचे मुद्दे उपस्थित करून जिल्हा प्रशासनच हद्दवाढीला ‘खो’ घालत असल्याची चर्चा महापालिकेत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी अभिप्राय म्हणजे हद्दवाढीस मंजुरी नव्हे. याबाबत सर्वस्वी निर्णय शासनस्तरावरच होणार असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाची तटस्थ भूमिका असल्याचे मत ‘लोकमत’कडे व्यक्त केले. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जुलै २०१४ पर्यंत कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिल्याने त्या अनुषंगाने शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व नगररचना विभागाने महापालिकेकडे काही मुद्द्यांवर अभिप्राय मागितला आहे. दोन्ही विभागांनी सुचविलेल्या अभिप्रायांवर उत्तर देण्यासाठी महापालिकेत यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यानंतर शासनाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव मुख्य सचिवांमार्फत सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्र पाठवून महापालिकेला शहरात समाविष्ट होण्यास औद्योगिक वसाहतींचा विरोध आहे, येथील एलबीटीसह इतर करांचा प्रश्नांबाबत धोरण निश्चित करण्याची सूचना केली आहे. हद्दवाढीसाठी नव्याने गावांचा समावेश करताना अकृषक घटकांची संख्या हा महत्त्वाचा निक ष मानला जातो. महापालिकेने केलेल्या सर्व्हेनुसार संभाव्य समाविष्ट होणार्‍या गावांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक अकृषक लोकसंख्या आहे. हद्दवाढीसाठीचे आवश्यक असलेले निकषांवर भर न देता गावांचा थकीत महसूल कोण देणार, याची चिंता जिल्हा प्रशासनास सतावत आहे. वास्तविक गावे समाविष्ट झाल्यानंतर महसुलीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यापूर्वीची थकबाकीची जबाबदारी महापालिका कशी घेणार, असा सवाल महापालिकेतर्फे उपस्थित केला जात आहे. राज्य शासन हद्दवाढीस अनुकूल आहे, मात्र जिल्हा प्रशासनास महापालिकेकडून चुकीची माहिती सादर केल्यास हद्दवाढ पुन्हा लांबणीवर पडू शकते. न्यायालयाने यापूर्वीच दिलेल्या आदेशात, शहरात समाविष्ट होणार्‍या गावांची इच्छा असो वा नसो, राज्य शासन विशेष अधिकार वापरून अंतिम निर्णय घ्यावा, यासाठी गावांच्या ‘ना हरकत’ दाखल्यांची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. हद्दवाढीचे कोल्हापूकरकरांचे स्वप्न दृष्टिक्षेपात आहे, अशावेळी प्रशासकीय कचाट्यामुळे याचा भंग होऊ नये, यासाठी महापालिका पुणे व ठाणे महापालिकेच्या हद्दवाढीच्या निकषांचा अभ्यास करून अभिप्राय सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.