शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

इतिहासाचे विविधांगी पुनर्लेखन गरजेचे

By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST

नारायण भोसले : शहाजी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र; शोधनिबंध सादर

कोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या बहुजन समाजातील अनेक नायकांचा उल्लेख इतिहासात आढळत नाही. या उपेक्षित नायकांना प्रकाशात आणण्यासाठी इतिहासाचा पुनर्विचार आणि पुनर्लेखन करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रा. डॉ. नारायण भोसले यांनी केले. येथील शहाजी महाविद्यालयात ‘पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ : पुनर्विचार व पुनर्लेखन’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. भोसले म्हणाले, कोणताही इतिहास स्थिर नसतो. इतिहास लिहणाऱ्यांचा धर्म, जात, पंथ आणि प्रदेश यांचाही इतिहास लेखनावर प्रभाव पडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले यांची प्रतिमा कधीही राष्ट्रवादी म्हणून समोर आणली गेली नाही. इतिहास हा केवळ विशिष्ट पक्ष आणि विशिष्ट समूहांभोवतीच केंद्रित राहिला. त्यामुळे इतिहासाबाबत ज्या ज्या नवीन गोष्टी आणि पुरावे समोर येत आहेत, त्यांच्या आधारे इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे डॉ. अवनीश पाटील म्हणाले, इतिहास लिहिताना जबाबदारीचे भानही इतिहास लेखकांनी जपले पाहिजे. ऐतिहासिक संदर्भांची दुसरी बाजूही तपासली पाहिजे. यावेळी पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीची सखोल माहिती दिली. या चर्चासत्रात ८० संशोधकांनी विविध विषयांवरील इतिहासावरील ८० शोधनिबंध सादर केले. संस्थेचे मानद सचिव चंद्रकांत बोंद्रे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डी. आर. मोरे, उपप्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मदन बोडके, रवींद्र भोसले, तसेच इतिहास विभागाचे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते. सुरेश शिखरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले. डॉ. सरोज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राज बिरजे यांनी आभार मानले.