शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

महावितरणने तोडली ३२ गावांची वीज

By admin | Updated: October 4, 2015 00:35 IST

थकबाकीसाठी कारवाई : पाणीपुरवठ्याची पावणेपाच कोटींची थकबाकी

राजाराम लोंढे / कोल्हापूर ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या पावणेपाच कोटींच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीने ३२ गावांतील वीजजोडण्या तोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कोल्हापूर ग्रामीण भाग १ मधील ३१ योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे. जिल्ह्णातील १०४४ पाणीपुरवठा योजना थकीत असून कोल्हापूर ग्रामीण भाग २ मधील गावांचा सर्वाधिक समावेश आहे. पाणीपुरवठा विभाग हा ग्रामपंचायतींची डोकेदुखी ठरू लागला आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे पाणीपुरवठ्याची बिले भरमसाट येऊ लागली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांपासून दीड लाखापर्यंत महिन्याला विजेचे बिल येत असल्याने ग्रामपंचायतींचा ताळेबंद कोलमडला आहे. आॅगस्ट २०१५ अखेर जिल्ह्णातील १०४४ पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ७१ लाख १८ हजारांची थकबाकी आहे. गडहिंग्लज विभागातील २३६ योजनांकडे ७२ लाख ६० हजार थकबाकीपैकी २१ योजनांनी १ लाख रुपये भरले आहेत. कोल्हापूर ग्रामीण १ विभागाकडील २९४ योजनांकडे १ कोटी १४ लाखांपैकी ४३ योजनांनी ४ लाख १७ हजार रुपये भरले आहेत. उर्वरित ग्रामीण २ कडील ३२९ योजनांकडे २ कोटी ७८ लाख, जयसिंगपूर विभागातील १०१ योजनांकडे ६७ लाख ६७ हजार, इचलकरंजीमधील ६७ योजनांकडे ८ लाख १० हजार, कोल्हापूर शहर विभागाकडील १७ योजनांकडे ९४ हजारांची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी ग्रामपंचायतींना नोटिसा काढूनही बिल भरले नसल्याने महावितरणने थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जयसिंगपूर विभागातील एक, तर कोल्हापूर ग्रामीण भाग १ मधील ३१ अशा ३२ योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे.