शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने तोडली ३२ गावांची वीज

By admin | Updated: October 4, 2015 00:35 IST

थकबाकीसाठी कारवाई : पाणीपुरवठ्याची पावणेपाच कोटींची थकबाकी

राजाराम लोंढे / कोल्हापूर ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या पावणेपाच कोटींच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीने ३२ गावांतील वीजजोडण्या तोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कोल्हापूर ग्रामीण भाग १ मधील ३१ योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे. जिल्ह्णातील १०४४ पाणीपुरवठा योजना थकीत असून कोल्हापूर ग्रामीण भाग २ मधील गावांचा सर्वाधिक समावेश आहे. पाणीपुरवठा विभाग हा ग्रामपंचायतींची डोकेदुखी ठरू लागला आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे पाणीपुरवठ्याची बिले भरमसाट येऊ लागली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांपासून दीड लाखापर्यंत महिन्याला विजेचे बिल येत असल्याने ग्रामपंचायतींचा ताळेबंद कोलमडला आहे. आॅगस्ट २०१५ अखेर जिल्ह्णातील १०४४ पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ७१ लाख १८ हजारांची थकबाकी आहे. गडहिंग्लज विभागातील २३६ योजनांकडे ७२ लाख ६० हजार थकबाकीपैकी २१ योजनांनी १ लाख रुपये भरले आहेत. कोल्हापूर ग्रामीण १ विभागाकडील २९४ योजनांकडे १ कोटी १४ लाखांपैकी ४३ योजनांनी ४ लाख १७ हजार रुपये भरले आहेत. उर्वरित ग्रामीण २ कडील ३२९ योजनांकडे २ कोटी ७८ लाख, जयसिंगपूर विभागातील १०१ योजनांकडे ६७ लाख ६७ हजार, इचलकरंजीमधील ६७ योजनांकडे ८ लाख १० हजार, कोल्हापूर शहर विभागाकडील १७ योजनांकडे ९४ हजारांची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी ग्रामपंचायतींना नोटिसा काढूनही बिल भरले नसल्याने महावितरणने थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जयसिंगपूर विभागातील एक, तर कोल्हापूर ग्रामीण भाग १ मधील ३१ अशा ३२ योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे.