शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘वाल्मीकी म्हेत्तर’ची परिवर्तनाकडे वाटचाल

By admin | Updated: October 25, 2015 23:30 IST

छत्रपती राजाराम महाराजांकडून आश्रय : जुनाट रूढी-परंपरांना मूठमाती देत नवनिर्मितीसाठी धडपड

राजाराम लोंढे - कोल्हापूर -पिढ्यान्पिढ्या साफसफाई करणारा कोल्हापूरचा ‘वाल्मीकी म्हेत्तर’ समाज परिवर्तनाकडे वाटचाल करीत आहे. पारंपरिक काम करताना प्रबोधनातून समाजाला शिक्षणप्रवाहात आणले जात आहे. मागासलेपणाचा डाग शिक्षणातूनच पुसला जाऊ शकतो, असा विश्वास या समाजाला आहे. सर्व सण, उत्सव अगदी आपलेपणाने साजरे करताना जुनाट रूढी-परंपरांना मूठमाती देण्याचे काम या समाजाने केल्याने खऱ्या अर्थाने या समाजाची नवनिर्मितीसाठी धडपड सुरू आहे. ‘वाल्मीकी म्हेत्तर’ समाज हा मूळचा जयपूर, राजस्थानमधील आहे. पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने हा समाज राजस्थानमधून पंढरपुरात आला. तिथे राहून तो साफसफाईचे काम करू लागला. कोल्हापुरात प्लेगची साथ आल्यानंतर येथील सफाई कामगारांनी मैला सफाईच्या कामाला नकार दिला होता. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांनी साफसफाईसाठी या समाजातील काही लोकांना कोल्हापुरात आणले. लक्ष्मीपुरी येथे त्यांना जागा देऊन कायमस्वरूपी निवारा दिला. तेव्हापासून हा समाज जिल्ह्यातील विविध ठिकाणी वास्तव्यास आहे. कोल्हापूर शहरात संभाजीनगर, लाईन बझारासह जिल्ह्यात साधारणत: वीस हजार लोकसंख्या या समाजाची आहे. या समाजाच्या वतीने वर्षभरात धर्मगुरू महर्षी नवल यांची जयंती, वाल्मीकी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राजर्षी शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. श्रावण महिन्यात भगवानवीर गोगादेव जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. संभाजीनगर येथील समाजमंदिरात सासनकाठी उभारली जाते. समाजातील तरुण श्रावणातील २१ दिवस कडक उपवास करतात. या काळात समाजातील चाळीस ते पन्नास तरुण दाढी करीत नाहीत, पायांत चपला वापरत नाहीत, महिलांनी शिजविलेले जेवण खात नाहीत. दिवसभर ते पूजा, भजन, कीर्तनात रंगून जातात. शेवटच्या दिवशी सासनकाठीसह मोठी मिरवणूक काढली जाते. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील समाज सहभागी होतो. त्याच दिवशी महाप्रसादाचे आयोजनही केले जाते. समाजात लग्न ठरविताना हुंडा मागितला अथवा दिलाही जात नाही. हुंडामागणीचा प्रकार कोठे होत असेल तर लगेच म्हेत्तर सकल पंचायतीच्या माध्यमातून त्यावर निर्बंध आणले जातात. काही कारणाने कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला तर तो सकल पंचायतीच्या माध्यमातून लगेच मिटविला जातो. अपघाताने एखाद्या महिलेला विधवा होण्याची वेळ आली तर तिच्या इच्छेनुसार पुनर्विवाह करून दिला जातो. म्हेत्तर समाजातील यासह इतर परंपरा अन्य समाजाच्या दृष्टीने आदर्शवत मानल्या जातात.कोल्हापूर जिल्हा म्हेत्तर सकल पंचायत कार्यकारिणीके. पी. पचरवाल, राजू चंडाले, सुरेश आदिवाल, जयवंत गोडाळे, रामस्वरूप पटोणे, शिवाजी पटोणे, खैराती ढढोरे, सुभाष खरारे, राजू सांगरे, विजय कराले, सुनील लोट.एकही उच्चशिक्षित नाहीसमाजातील तरुणांनी पारंपरिक सफाईच्या कामाशिवाय इतर गोष्टींकडे लक्ष न दिल्याने समाजात शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा आला आहे. परिणामी एकही इंजिनिअर, वकील, आदी उच्च शिक्षण घेतलेला तरुण नाही; पण सध्या समाजात बऱ्यापैकी जागृती झाल्याने शिक्षणाबाबतचे मन परिवर्तन होण्यास मदत झाली आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत!शासनाकडून भ्रूणहत्येबाबत प्रबोधन व जागृती सुरू आहे; पण ‘वाल्मीकी’ समाजात गेल्या अनेक वर्षांपासून मुलगीचा जन्म शुभ मानला जातो. मुलगी झाली की तिचे स्वागत केले जाते. दाखल्यासाठी अडचणींचा डोंगरआर्थिक टंचाईमुळे मुळात हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात जाऊ पाहत आहे. त्यासाठी त्यांना जातीच्या दाखल्यांची गरज आहे. हा समाज ‘अनुसूचित जाती’ या प्रवर्गात येतो; पण दाखल्यासाठी १९५० पूर्वीचा रहिवासी असल्याचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड लागते. अद्याप ८० टक्के समाज महापालिकेच्या मालकीच्या व भाड्याच्या खोल्यांत राहत असल्याने दाखल्याबाबत तो काहीच पुरावे देऊ शकत नाही.