शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

‘वाल्मीकी म्हेत्तर’ची परिवर्तनाकडे वाटचाल

By admin | Updated: October 25, 2015 23:30 IST

छत्रपती राजाराम महाराजांकडून आश्रय : जुनाट रूढी-परंपरांना मूठमाती देत नवनिर्मितीसाठी धडपड

राजाराम लोंढे - कोल्हापूर -पिढ्यान्पिढ्या साफसफाई करणारा कोल्हापूरचा ‘वाल्मीकी म्हेत्तर’ समाज परिवर्तनाकडे वाटचाल करीत आहे. पारंपरिक काम करताना प्रबोधनातून समाजाला शिक्षणप्रवाहात आणले जात आहे. मागासलेपणाचा डाग शिक्षणातूनच पुसला जाऊ शकतो, असा विश्वास या समाजाला आहे. सर्व सण, उत्सव अगदी आपलेपणाने साजरे करताना जुनाट रूढी-परंपरांना मूठमाती देण्याचे काम या समाजाने केल्याने खऱ्या अर्थाने या समाजाची नवनिर्मितीसाठी धडपड सुरू आहे. ‘वाल्मीकी म्हेत्तर’ समाज हा मूळचा जयपूर, राजस्थानमधील आहे. पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने हा समाज राजस्थानमधून पंढरपुरात आला. तिथे राहून तो साफसफाईचे काम करू लागला. कोल्हापुरात प्लेगची साथ आल्यानंतर येथील सफाई कामगारांनी मैला सफाईच्या कामाला नकार दिला होता. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांनी साफसफाईसाठी या समाजातील काही लोकांना कोल्हापुरात आणले. लक्ष्मीपुरी येथे त्यांना जागा देऊन कायमस्वरूपी निवारा दिला. तेव्हापासून हा समाज जिल्ह्यातील विविध ठिकाणी वास्तव्यास आहे. कोल्हापूर शहरात संभाजीनगर, लाईन बझारासह जिल्ह्यात साधारणत: वीस हजार लोकसंख्या या समाजाची आहे. या समाजाच्या वतीने वर्षभरात धर्मगुरू महर्षी नवल यांची जयंती, वाल्मीकी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राजर्षी शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. श्रावण महिन्यात भगवानवीर गोगादेव जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. संभाजीनगर येथील समाजमंदिरात सासनकाठी उभारली जाते. समाजातील तरुण श्रावणातील २१ दिवस कडक उपवास करतात. या काळात समाजातील चाळीस ते पन्नास तरुण दाढी करीत नाहीत, पायांत चपला वापरत नाहीत, महिलांनी शिजविलेले जेवण खात नाहीत. दिवसभर ते पूजा, भजन, कीर्तनात रंगून जातात. शेवटच्या दिवशी सासनकाठीसह मोठी मिरवणूक काढली जाते. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील समाज सहभागी होतो. त्याच दिवशी महाप्रसादाचे आयोजनही केले जाते. समाजात लग्न ठरविताना हुंडा मागितला अथवा दिलाही जात नाही. हुंडामागणीचा प्रकार कोठे होत असेल तर लगेच म्हेत्तर सकल पंचायतीच्या माध्यमातून त्यावर निर्बंध आणले जातात. काही कारणाने कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला तर तो सकल पंचायतीच्या माध्यमातून लगेच मिटविला जातो. अपघाताने एखाद्या महिलेला विधवा होण्याची वेळ आली तर तिच्या इच्छेनुसार पुनर्विवाह करून दिला जातो. म्हेत्तर समाजातील यासह इतर परंपरा अन्य समाजाच्या दृष्टीने आदर्शवत मानल्या जातात.कोल्हापूर जिल्हा म्हेत्तर सकल पंचायत कार्यकारिणीके. पी. पचरवाल, राजू चंडाले, सुरेश आदिवाल, जयवंत गोडाळे, रामस्वरूप पटोणे, शिवाजी पटोणे, खैराती ढढोरे, सुभाष खरारे, राजू सांगरे, विजय कराले, सुनील लोट.एकही उच्चशिक्षित नाहीसमाजातील तरुणांनी पारंपरिक सफाईच्या कामाशिवाय इतर गोष्टींकडे लक्ष न दिल्याने समाजात शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा आला आहे. परिणामी एकही इंजिनिअर, वकील, आदी उच्च शिक्षण घेतलेला तरुण नाही; पण सध्या समाजात बऱ्यापैकी जागृती झाल्याने शिक्षणाबाबतचे मन परिवर्तन होण्यास मदत झाली आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत!शासनाकडून भ्रूणहत्येबाबत प्रबोधन व जागृती सुरू आहे; पण ‘वाल्मीकी’ समाजात गेल्या अनेक वर्षांपासून मुलगीचा जन्म शुभ मानला जातो. मुलगी झाली की तिचे स्वागत केले जाते. दाखल्यासाठी अडचणींचा डोंगरआर्थिक टंचाईमुळे मुळात हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात जाऊ पाहत आहे. त्यासाठी त्यांना जातीच्या दाखल्यांची गरज आहे. हा समाज ‘अनुसूचित जाती’ या प्रवर्गात येतो; पण दाखल्यासाठी १९५० पूर्वीचा रहिवासी असल्याचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड लागते. अद्याप ८० टक्के समाज महापालिकेच्या मालकीच्या व भाड्याच्या खोल्यांत राहत असल्याने दाखल्याबाबत तो काहीच पुरावे देऊ शकत नाही.