शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल

By admin | Updated: May 29, 2016 01:05 IST

किशोर बेडकिहाळ : भाई माधवराव बागल पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर : भाषा, धर्मांतील वैविध्य ही लोकशाहीची ओळख असून, ती कोणत्याही एका व्यक्तिमत्त्वावर अवलंबून नाही; पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकच अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो लोकशाहीच्या अंतास कारणीभूत ठरणार आहे. लोकशाहीची हुकूमशाहीकडे संक्रमणावस्था सुरू असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले. भाई माधवराव बागल यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ किशोर बेडकिहाळ यांना प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते. बेडकिहाळ म्हणाले, केंद्रातील सत्तेचा अजेंडा हिंदुत्ववादाचा असल्याने कल्याणकारी लोकशाहीत अडथळे निर्माण होत आहेत. चौसाळकर म्हणाले, लोकशाहीपुढे विशिष्ट विचारांच्या शक्तीने आव्हान उभे केले आहे. विचारांचा पुढील संघर्ष लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच केला जाईल. जागतिकीकरणामुळे बंदिस्त झालेल्या समाजाला परिवर्तनाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी समाजवादी विचारांची जरुरी आहे. जितेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य. टी. एस. पाटील यांनी गौरवपत्र वाचन केले. अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांनी आभार मानले. दरम्यान, बागल विद्यापीठातर्फे शाहू मिलसमोरील भाई बागल यांच्या पुतळ्यास उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. (प्रतिनिधी)