शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

चकोते ग्रुपची कार्पोरेट जगताकडे वाटचाल

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

एक अनोखा उपक्रम : अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिनी ३०० बसस्थानके होणार स्वच्छ

जयसिंगपूर : ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करून बेकरीला औद्योगिक दर्जा देऊन रोजगार निर्माण करून देणाऱ्या चकोते ग्रुपची कार्पोरेट जगताकडे वाटचाल सुरू आहे. चकोते ग्रुपची उत्पादने महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांत लोकप्रिय बनली आहेत. ग्रामीण उद्योजक तरुणांना प्रेरणास्थान ठरलेले चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज, गणेश बेकरी नांदणीचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांचा आज, मंगळवारी ४१ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविण्याचा संकल्प चकोते यांनी केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत चकोते ग्रुपकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत एकाच दिवशी ३०० बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. गेल्या २५ वर्षांत सामाजिक नीतीमूल्ये जपत चकोते ग्रुपने विकासाच्या वाटेवर दमदार पाऊल टाकले आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्र प्रदेश या चार राज्यांत गणेश बेकरीची उत्पादने पोहोचली असून, नांदणी व लातूर येथे दोन युनिट उभारण्यात आले आहेत. ‘आयएसओ’ मानांकन मिळालेल्या बेकरीचे उत्पादन आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन अण्णासाहेब चकोते यांची पुन्हा ‘आॅल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन दिल्ली’ या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली आहे. सामाजिक बांधीलकीतून विविध उपक्रम या उद्योग समूहामार्फत राबविले जातात. शैक्षणिक उपक्रमातून ग्रामीण मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून इंग्लिश स्कूलची स्थापना करून ज्ञानदानाच्या कार्यातून वेगळेपण निर्माण केले आहे. चकोते ग्रुपने २०१३ च्या भीषण दुष्काळात सांगली जिल्ह्यातील डफळापूर हे गाव पाणी व चाऱ्यासाठी दत्तक घेऊन सामाजिक बांधीलकी जपली होती. उद्योगातील यशस्वी वाटचालीबरोबर सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य ते मोठ्या जोमाने करीत आहेत. सामाजिक कार्य करीत असताना प्रत्येक वाढदिनी एक नवीन विधायक व समाजाला दिशा देणारा उपक्रम राबविण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली आहे. विविध कार्यक्रमयावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेला ‘स्वच्छ भारत अभियान’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिनी महाराष्ट्र व सीमाभागातील २४ जिल्ह्यातील ३०० बसस्थानकांवर सकाळी आठ ते दहा या वेळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये चकोते ग्रुपचे जवळपास दहा हजार लोक सहभागी होणार असून, हे अभियान यशस्वी करण्यासाठी ३०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याचबरोबर रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, फळेवाटप, रस्ता लोकार्पण कार्यक्रम, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.सामाजिकतेचा पैलूकेवळ जिद्दीच्या जोरावर गणेश बेकरीची सुरुवात करणाऱ्या अण्णासाहेब चकोते यांचा प्रवास नवोदित उद्योजकांना प्रेरणादायी ठरला आहे. महाराष्ट्र व सीमाभागातील ३०० बसस्थानके चकाचक करून त्यांच्या सामाजिकतेचा आणखी एक पैलू या निमित्ताने पुढे येणार आहे. ‘करूया स्वच्छता, जपूया आरोग्य, घडवूया स्वच्छ भारत’ हा नारा राज्यात आदर्शवत ठरणार आहे.