शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’ची निवडणूक घेण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात कोल्हापूर मनपा व त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. तत्पूर्वी ‘राजाराम’ची निवडणूक घेण्यासाठी विरोधी आघाडी प्रयत्नशील आहे. कराडच्या ‘कृष्णा’ साखर कारखान्याच्या धर्तीवर न्यायालयात जाऊन जुलैपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता येईल, का याची चाचपणी सुरू आहे.

विधानपरिषद, लोकसभा, विधानसभेनंतर ‘गोकुळ’ ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली हाेती. ‘गोकुळ’मध्ये त्यांनी मोट बांधून तेही पदरात पाडून घेतले. ‘गोकुळ’ची बांधणी करताना ‘राजाराम’ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नेत्यांना सोबत ठेवण्याची मुत्सद्दीगिरी त्यांनी दाखवून दिली. ‘गोकुळ’मधील नेत्यांची मोट ‘राजाराम’मध्ये पुढे कायम ठेवून कारखाना ताब्यात घेण्यासाठी मंत्री पाटील यांचे प्रयत्न आहेत. कोरोनामुळे राज्य शासनाने ऑगस्ट २०२१ पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे आता निवडणूक घ्यायच्या झाल्यास न्यायालयातूनच यावे लागणार आहे. ‘कृष्णा’ कारखान्याचे ४६ हजार सभासद आहेत, त्याच पार्श्वभूमीवर ‘राजाराम’ची निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल करायची आणि जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.

वाढीव सभासदांचा विषय न्यायालयात प्रलंबित

‘राजाराम’च्या १३४६ वाढीव सभासदाचा वाद उच्च न्यायालयात आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक (साखर) व सहकार मंत्र्यांनी हे सभासद रद्द केले आहेत. त्याविरोधात सत्तारूढ गटाने याचिका दाखल करत वाढीव सभासदांचा निकाल होईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी मागणी केली. मात्र ही याचिका अद्याप प्रलंबित आहे.

माने यांच्या राजीनाम्याने निवडणुकीचे संकेत

‘राजाराम’चे अध्यक्ष सर्जेराव माने यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीच्या चर्चेला पुन्हा जाेर धरला आहे. निवडणूक कधीही लागू शकते, ऐन निवडणुकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन दुसरा विचार केला तर तो सभासदांच्या पचनी पडणार नाही, यासाठीच निवडणुकीचा अंदाज घेऊनच माने यांनी राजीनामा दिल्याची सध्या चर्चा आहे.

सत्तारूढ गटाकडून साधव हालचाली

‘गोकुळ’ची सत्ता हातातून गेल्यानंतर महादेवराव महाडीक यांनी ‘राजाराम’बाबत फार सावध हालचाली सुरू केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम ठेवण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यासाठी विविध कारणाने नाराजी झालेल्या जुन्या मंडळींना सोबत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावनिहाय सभासदांशी संपर्कावर त्यांनी भर दिला आहे.

दृष्टिक्षेपात ‘राजाराम’- कार्यक्षेत्र - हातकणंगले, करवीर, राधानगरी, गगनबावडा, कागल, पन्हाळा, शाहूवाडी.

गावे - १२२

सभासद- ‘अ’ वर्ग : १७३०२

‘ब’ वर्ग सहकारी संस्था : १४३

ऊस गाळप- ४ लाख १० हजार ८८८ टन

संचालक संख्या - १८, तज्ज्ञ संचालक -२, कार्यलक्षी संचालक-१.

सत्ता - तीस वर्षे महादेवराव महाडीक यांची एकहाती सत्ता