शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:55 IST

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शाहू छत्रपती यांनी मंगळवारी दिला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात उद्या, गुरुवारी होणाऱ्या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी ...

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शाहू छत्रपती यांनी मंगळवारी दिला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात उद्या, गुरुवारी होणाऱ्या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक व पोलीस अधिकारी यांची बैठक बोलावलेली होती. त्याप्रसंगी शाहू छत्रपती बोलत होते. हा बंद कोल्हापूरच्या जनतेने अत्यंत शांततेत व सामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही या पद्धतीने पार पाडावा, असे आवाहन सकल मराठा समाज व जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.शाहू छत्रपती म्हणाले, उद्याचा बंद शांततेत होईल, असा विश्वास आहे. सर्वांच्या सहकार्याने हे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय नोकरभरती करणार नाही, यासह अन्य मागण्यांबाबतही सकारात्मक आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांच्या बोलण्यावर समाजातील लोकांचा विश्वास नाही. शासनाने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत आरक्षण मिळतनाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, तमिळनाडूच्या धर्तीवर परिशिष्ट ९ प्रमाणे महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण देता येईल. त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. शासनाने ते त्वरित द्यावे.मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, आंदोलनास सर्व बाजूंनी पाठिंबा आहे. काही समाजकंटक घुसणार असतील तर त्यांची माहिती व सूचना आम्हालाही द्या. मराठा बांधवाने आजपर्यंत लाखोंचे मोर्चे शांततेत काढलेआहेत. गुरुवारचा बंदही शांततेतच होईल.इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसलेल्यांवर आमचा विश्वास नाही. चार वर्षांपूर्वी त्यांनीच आरक्षणाचे गाजर दाखविले; पण पदरी फसवणूकच पडली. आझाद मैदानातील मोर्चात तर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. शांततेत आंदोलन करणाºया आंदोलकांवर पोलीस गंभीर गुन्हे दाखल करीत आहेत. आंदोलन शांततेत सुरू असताना पोलीस जबरदस्ती का करत आहेत? जितके मराठ्यांना दाबाल, तितके ते उसळतील. मागासवर्ग आयोगाकडून नकारात्मक अहवाल आल्यास शासन काय करणार, असा सवालही त्यांनी उठविला.यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे , दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, अनिल घाटगे, सचिन तोडकर, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, बाबा पार्टे, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते.