शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:55 IST

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शाहू छत्रपती यांनी मंगळवारी दिला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात उद्या, गुरुवारी होणाऱ्या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी ...

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शाहू छत्रपती यांनी मंगळवारी दिला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात उद्या, गुरुवारी होणाऱ्या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक व पोलीस अधिकारी यांची बैठक बोलावलेली होती. त्याप्रसंगी शाहू छत्रपती बोलत होते. हा बंद कोल्हापूरच्या जनतेने अत्यंत शांततेत व सामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही या पद्धतीने पार पाडावा, असे आवाहन सकल मराठा समाज व जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.शाहू छत्रपती म्हणाले, उद्याचा बंद शांततेत होईल, असा विश्वास आहे. सर्वांच्या सहकार्याने हे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय नोकरभरती करणार नाही, यासह अन्य मागण्यांबाबतही सकारात्मक आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांच्या बोलण्यावर समाजातील लोकांचा विश्वास नाही. शासनाने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत आरक्षण मिळतनाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, तमिळनाडूच्या धर्तीवर परिशिष्ट ९ प्रमाणे महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण देता येईल. त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. शासनाने ते त्वरित द्यावे.मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, आंदोलनास सर्व बाजूंनी पाठिंबा आहे. काही समाजकंटक घुसणार असतील तर त्यांची माहिती व सूचना आम्हालाही द्या. मराठा बांधवाने आजपर्यंत लाखोंचे मोर्चे शांततेत काढलेआहेत. गुरुवारचा बंदही शांततेतच होईल.इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसलेल्यांवर आमचा विश्वास नाही. चार वर्षांपूर्वी त्यांनीच आरक्षणाचे गाजर दाखविले; पण पदरी फसवणूकच पडली. आझाद मैदानातील मोर्चात तर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. शांततेत आंदोलन करणाºया आंदोलकांवर पोलीस गंभीर गुन्हे दाखल करीत आहेत. आंदोलन शांततेत सुरू असताना पोलीस जबरदस्ती का करत आहेत? जितके मराठ्यांना दाबाल, तितके ते उसळतील. मागासवर्ग आयोगाकडून नकारात्मक अहवाल आल्यास शासन काय करणार, असा सवालही त्यांनी उठविला.यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे , दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, अनिल घाटगे, सचिन तोडकर, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, बाबा पार्टे, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते.