शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहतुकीचा खासगी ठेका देण्याच्या हालचाली

By admin | Updated: January 6, 2015 00:46 IST

वाहतूक सुरक्षा कायद्यात दुरुस्ती : नवीन कायद्यास एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध

मिरज : केंद्र शासनाच्या नवा रस्ते वाहतूक सुरक्षा कायदा २०१४ या नव्या विधेयकात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका यांच्या भौगोलिक क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीसाठी निविदा काढून प्रवासी वाहतुकीचा ठेका खासगी ठेकेदारांना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रवासी वाहनांच्या अपघाताबद्दल चालकांना दंड व शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरीसाठी येणाऱ्या नवीन विधेयकास एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. नव्या विधेयकात एसटी महामंडळाचे कंबरडे मोडणाऱ्या तरतुदी आहेत. त्याचा एसटीसह मुंबई बीएसटी, पुण्याची पीएमटी, पिंपरी चिंचवडची पीसीएमटी याशिवाय टॅक्सी, रिक्षाच्या प्रवासी वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. देशातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक मंडळे व संस्था पूर्णपणे मोडीत जाऊन प्रवासी वाहतूक व्यवसायात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने प्रवाशांना फटका बसणार आहे. वाहतूक कर्मचारी व त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. विधेयकातील तरतुदीचे प्रवाशांनाही त्याचे चटके बसणार आहेत. नवीन विधेयकात जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका यांच्या भौगोलिक क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीसाठी निविदा काढण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्या क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीचा ठेका खासगी धन-दांडग्यांना देण्यात येणार आहे. श्रीमंत ठेकेदारांनी मोठी बोली लावून ठेका घेतल्याने एसटीसारख्या संस्था बंद पडून प्रवासी वाहतुकीची मक्तेदारी निर्माण होणार असल्याची भीती एसटी कामगार संघटनेने व्यक्त केली आहे. पूर्णपणे खासगीकरण झाल्याने एसटीचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. खासगी वाहतूक ठेकेदार हा प्रवासी वाहतूक सामाजिक बांधिलकीऐवजी अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न करतील. प्रवासी भाडे तो मनमानी पध्दतीने आकारून सर्वसामान्य प्रवाशांची लूट करतील, अशीही भीती आहे. राज्यात एसटी महामंडळास फक्त टप्पा वाहतूक करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. एसटी ग्रामीण भागात व दुर्गम भागात प्रवाशांची सोय करत आहे. प्रवासी सवलत देते. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, अंध अपंग आदींना विविध प्रकारच्या २३ सवलती मिळतात. या सवलती खासगी ठेकेदारांकडून बंद होणार आहेत. दुर्गम व ग्रामीण भागातील जनतेचे वाहतूक ठेकेदार शोषण करणार आहेत. खासगीकरणापासून प्रवासी जनता व कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनेने विधेयकाला विरोध केला आहे. नव्या विधेयकात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांना अपघाताबद्दल अत्यंत जाचक व कष्टप्राय दंड व शिक्षा तरतुदी केलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात वाहनांना चालकच मिळणे कठीण होणार आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये हे वाहतूक विधेयक मांडता आले नसल्याने मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होण्याची शक्यता आहे. विधेयकाच्या विरोधात दिल्लीत राज्यातील हजारो परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. (वार्ताहर)खासगी वाहनांचा वापर कमी करण्याची मागणीप्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचा वापर करून व खासगी वाहनांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची साधने उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या विधेयकाचा फेरविचार करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बिराज साळुंखे यांनी केली आहे.