शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

समाजातील नवसमस्यांच्या मुद्द्यांवर चळवळी उभ्या राहतात : भारती पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:17 IST

१९८०-९० च्या दशकानंतरच्या चळवळींतील मागण्या या खास करून सरकारला जबाबदार व पारदर्शक बनविण्यास भाग पाडण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. समाजातील या चळवळी नवसमस्यांच्या मुद्द्यांवर निर्माण होतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती पाटील यांनी केले.

ठळक मुद्देविवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र व इतिहास विभागात आंतरराष्ट्रीय परिषद‘आयुषी’ आंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेचे प्रकाशन ‘मानवविद्या व विज्ञानातील सद्य:स्थितीतील चळवळीचे नवे प्रवाह’ या विषयावर आंतरराष्ट्रीय विद्याशाखीय चर्चासत्र

कोल्हापूर : देश व विदेशांत आज नवनव्या चळवळी निर्माण होत आहेत. जगभरातील या चळवळींना बराच मोठा इतिहास आहे. पूर्वी या सामाजिक चळवळी आर्थिक संसाधनांच्या मागण्यांसाठी निगडित होत्या; परंतु १९८०-९० च्या दशकानंतरच्या चळवळींतील मागण्या या खास करून सरकारला जबाबदार व पारदर्शक बनविण्यास भाग पाडण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. समाजातील या चळवळी नवसमस्यांच्या मुद्द्यांवर निर्माण होतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती पाटील यांनी केले.

विवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र व इतिहास विभागात आयोजित ‘मानवविद्या व विज्ञानातील सद्य:स्थितीतील चळवळीचे नवे प्रवाह’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय विद्याशाखीय चर्चासत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे होत्या.

पाटील म्हणाले, देशात नर्मदा बचाव, भ्रष्टाचारमुक्त भारत, निर्भया अशा चळवळींपासून फेरीवाले, अंगणवाडी शिक्षिका व दलित आदिवासी चळवळींचे प्रश्नही पुढे येत आहेत. या चळवळी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, समाज संघटन करतात व चळवळीचा एक नवा विषय, विचार लोकांच्या मनात पेरून जातात, म्हणून या चळवळींना महत्त्व आहे.

डॉ. एस. आर. कट्टीमणी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. प्रा. एस. ए. फराकटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चर्चासत्राचे प्रमुख समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. ए. पवार यांनी काम पाहिले.

चर्चासत्राचे समन्वयक व इतिहास विभागप्रमुख डॉ. एस. एम. घोरपडे यांनी मानले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये देश-विदेशांतील संशोधकांनी लिहिलेल्या ‘आयुषी’ आंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी विदेशातील अभ्यासक रोनाल्डो बिटुका यांनी आपले सामाजिक चळवळीविषयीचे विचार व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी फिलिक्स माकोरी आसान्दा, फ्रिडा मोरा ओम्वेंगा, एस्थर केरुलो ओएंगा, मोझेझ न्योरोबो न्यामोंगो, आयवी नोनुके हे विदेशांतील अभ्यासक उपस्थित होते. देशातील व शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शोधनिबंध वाचन, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.