शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

समाजातील नवसमस्यांच्या मुद्द्यांवर चळवळी उभ्या राहतात : भारती पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:17 IST

१९८०-९० च्या दशकानंतरच्या चळवळींतील मागण्या या खास करून सरकारला जबाबदार व पारदर्शक बनविण्यास भाग पाडण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. समाजातील या चळवळी नवसमस्यांच्या मुद्द्यांवर निर्माण होतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती पाटील यांनी केले.

ठळक मुद्देविवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र व इतिहास विभागात आंतरराष्ट्रीय परिषद‘आयुषी’ आंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेचे प्रकाशन ‘मानवविद्या व विज्ञानातील सद्य:स्थितीतील चळवळीचे नवे प्रवाह’ या विषयावर आंतरराष्ट्रीय विद्याशाखीय चर्चासत्र

कोल्हापूर : देश व विदेशांत आज नवनव्या चळवळी निर्माण होत आहेत. जगभरातील या चळवळींना बराच मोठा इतिहास आहे. पूर्वी या सामाजिक चळवळी आर्थिक संसाधनांच्या मागण्यांसाठी निगडित होत्या; परंतु १९८०-९० च्या दशकानंतरच्या चळवळींतील मागण्या या खास करून सरकारला जबाबदार व पारदर्शक बनविण्यास भाग पाडण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. समाजातील या चळवळी नवसमस्यांच्या मुद्द्यांवर निर्माण होतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती पाटील यांनी केले.

विवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र व इतिहास विभागात आयोजित ‘मानवविद्या व विज्ञानातील सद्य:स्थितीतील चळवळीचे नवे प्रवाह’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय विद्याशाखीय चर्चासत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे होत्या.

पाटील म्हणाले, देशात नर्मदा बचाव, भ्रष्टाचारमुक्त भारत, निर्भया अशा चळवळींपासून फेरीवाले, अंगणवाडी शिक्षिका व दलित आदिवासी चळवळींचे प्रश्नही पुढे येत आहेत. या चळवळी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, समाज संघटन करतात व चळवळीचा एक नवा विषय, विचार लोकांच्या मनात पेरून जातात, म्हणून या चळवळींना महत्त्व आहे.

डॉ. एस. आर. कट्टीमणी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. प्रा. एस. ए. फराकटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चर्चासत्राचे प्रमुख समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. ए. पवार यांनी काम पाहिले.

चर्चासत्राचे समन्वयक व इतिहास विभागप्रमुख डॉ. एस. एम. घोरपडे यांनी मानले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये देश-विदेशांतील संशोधकांनी लिहिलेल्या ‘आयुषी’ आंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी विदेशातील अभ्यासक रोनाल्डो बिटुका यांनी आपले सामाजिक चळवळीविषयीचे विचार व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी फिलिक्स माकोरी आसान्दा, फ्रिडा मोरा ओम्वेंगा, एस्थर केरुलो ओएंगा, मोझेझ न्योरोबो न्यामोंगो, आयवी नोनुके हे विदेशांतील अभ्यासक उपस्थित होते. देशातील व शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शोधनिबंध वाचन, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.