शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

पाच दिवसांच्या आठवड्यासाठी पुन्हा हालचाली

By admin | Updated: July 25, 2016 00:58 IST

कर्मचारी संघटनेचा पाठपुरावा : मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; पुढील महिन्यापासून अंमलबजावणी शक्य

प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा होण्याकरिता कर्मचारी संघटनेकडून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये यावर सकारात्मक चर्चा होऊन पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाचा आठवडा हा पाच दिवसांचा असावा, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. प्रसंगी सनदशीर मार्गाने आंदोलनही केले जात आहे. गत अधिवेशनामध्येही हा विषय चर्चेत आला होता. परंतु कोणताही निर्णय होऊ शकला नाही. परंतु संघटनेने पाठपुरावा कायम सुरू ठेवला आहे. दोन दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांची भेट घेऊन आम्ही दिलेल्या प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा केली. यावर मुख्य सचिवांनी हा प्रस्ताव आपण पाहिला असून, त्याचा अभ्यासही केला आहे. या प्रस्तावाबाबत आपण सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाची मागणी केल्यावर तो त्यांच्याकडे सादर केला जाणार आहे. यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो, असे उत्तर दिले आहे. तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही यासंदर्भात संघटनेतर्फे पत्र दिले आहे. तेही सकारात्मक असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. संघटनेकडून येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये यावर चर्चा होऊन पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणीची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा असावा, या मागणीसाठी शासनाशी लढा सुरू आहे. वेळोवेळी आंदोलने व चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या मुद्यावर राज्याचे अर्थमंत्री व मुख्य सचिव यांची भेट घेण्यात आली असून, ते सकारात्मक आहेत. तरीही याबाबत निर्णय घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्र दिले जाणार आहे. - अनिल लवेकर, सहसचिव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना. प्रस्तावाने शासनाचे कोट्यवधी रुपये वाचणार... पाच आठवड्यांच्या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांना दररोज ४५ मिनिटे जादा काम करावे लागणार आहे. सध्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी शासकीय कार्यालये बंद असतात, ती या प्रस्तावानुसार चारही शनिवारी बंद राहतील. एक दिवसाची कार्यालयातील वीज, पाणी बिलाची बचत होईल. त्याचबरोबर शासकीय वाहनांबरोबरच कर्मचारी वापरत असलेल्या वाहनांचाही वापर कमी होऊन पर्यायाने डिझेल व पेट्रोलचीही बचत होईल. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाचतील, असे संघटनेचे म्हणणे आहे.