शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बालिंगेतील दुर्गंधीयुक्त घनकचरा हलवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

लोकमत न्यू्ज नेटवर्क कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर साचलेला दुर्गंधीयुक्त घनकचरा अखेर ग्रामपंचायतीने हलवला. तिथे साफसफाई ...

लोकमत न्यू्ज नेटवर्क

कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर साचलेला दुर्गंधीयुक्त घनकचरा अखेर ग्रामपंचायतीने हलवला. तिथे साफसफाई करून तिथे पत्रे मारून बंदिस्त केले आहे. बालिंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीला घनकचरा टाकण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्गाशेजारी जागेत गेली अनेक वर्षे घनकचरा टाकला जातो. अलीकडे दोन्ही ग्रामपंचायती अतंर्गत कॉलनी वाढल्याने कचराही वाढला आहे. पावसाळ्यात तर कचरा कुजत असल्याने दुर्गंधी पसरत असते. त्यात या मार्गावरून येणारे जाणारेही येथेच कचरा टाकत असल्याने अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. यासाठी बालिंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीने हा कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता केली आहे. गेली आठ दिवस बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे व सदस्यांनी घनकचऱ्यावर काय मार्ग काढतो येतो, यावर विचार केला. महामार्गाच्या बाजूला पत्रे उभे करून कचरा डेपो बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला. बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई परिसरातील नागरिक येथे कचरा टाकत आहेत, यासाठी पत्रे उभारले असून रस्त्याच्या बाजूला पत्रे लावून परिसर बंधिस्त करणार आहे. गेली दोन दिवस जे.सी.बी. लावून कचरा खाणीत टाकला असून यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य नंदकुमार जांभळे, रंगराव वाडकर, विजय जांभळे, कृष्णात माळी, धनंजय ढेंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न केले.

बाहेरील कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई

या जागेत घन कचरा, मृत जनावरे, खराब अंथरूण, पांघरूण आदी वस्तू राजरोसपणे टाकली जातात. संबधितांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेतला आहे.

कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प

कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्पास पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंजुरी दिली असून सहा महिन्यात या कचऱ्याचा योग्य पध्दतीने विल्हेवाट लागेल. त्याचबरोबर ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून होत असल्याचे सरपंच मयूर जांभळे यांनी सांगितले.