शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

संघटनेने तोडफोड करण्यापेक्षा मोर्चे काढावेत : चंद्रकांतदादा

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

‘एफआरपी’ न देणाऱ्यांची गोदामे सील करण्याचा इशारा

कोल्हापूर : ऊसदराबाबत कायद्याच्या चाकोरीत राहून कारवाई सुरू आहे. उद्या, मंगळवारपासून कारखान्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांशी आयुक्त चर्चा करणार असून, ‘एफआरपी’प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांची साखरेची गोदामे सील करून शेतकऱ्यांचे पैसे भागवू, असा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, सोमवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला. शेतकरी संघटनांनी ऊसदरासाठी आक्रमक भूमिका घ्यावी; पण शासकीय कार्यालये टार्गेट करू नयेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘एफआरपी’बाबत विभागीय आयुक्तांनी कारखान्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यावर त्यांचे म्हणणे घेतले आहे. आता आयुक्तांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यावर उद्यापासून दररोज कारखान्यांच्या प्रतिनिधींना बोलावूनघेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. तोपर्यंत पैसे नाहीच दिले तर साखरेची गोदामे सील करून शेतकऱ्यांचे पैसे देण्यास आम्ही बांधिल आहोत. परंतु, तशी वेळ येणार नाही. घाई-गडबडीने घेतलेले निर्णय न्यायालयात टिकत नसल्याने कायद्याच्या चौकटीत बसून कार्यवाही सुरू आहे. कोल्हापुरातील कारखाने ओढाताण करून पैसे देतात, मग सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांतील कारखान्यांना काय होते? अशी विचारणाही मंत्री पाटील यांनी केली. ऊसदराबाबत आंदोलन करणे शेतकरी संघटनेचा हक्क आहे. मोर्चे, उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणा; पण शासकीय कार्यालयांचे नुकसान करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोंडी कराल, तर थेट कारवाई!दोन्ही कॉँग्रेस कारखानदार असल्याने ‘एफआरपी’ न देऊन सरकारची कोंडी करीत आहेत का? या प्रश्नावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, कोंडी करण्याचे हे मैदान नाही. विरोधकांना कोंडी करायची असल्यास खुल्या मैदानात यावे. कोंडी करण्याचे धाडस कोणी करीत असेल, तर थेट कारवाई केली जाईल. मूल्यांकन पारदर्शकचबाजारातील साखरेच्या दरावरच शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यांकन ठरविले जाते. यासाठी ‘एफआरपी’ अर्थसाहाय्य योजनेचा प्रस्ताव होता; पण यामध्ये संचालकांना बांधून घेतले जाणार असल्याने ही योजना स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती राज्य बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी दिली.