शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

राज्यातील बहुतांशी ग्रामपंचायती डिजिटल सिग्नेचरबाबत उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर असल्याशिवाय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर असल्याशिवाय कोणालाही रक्कम अदा करता येणार नाही, असे असताना राज्यातील ३४पैकी २५ जिल्ह्यांतील हे काम ५० टक्क्यांपेक्षा पुढे गेलेले नाही. त्यामुळे निधी मिळाला तरी तो खर्च करता येत नसल्याचे चित्र समोर येत आहे.

वित्त आयोगाच्या निधीतून ८० टक्के रक्कम थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झालेली आहे. प्रत्येकी १० टक्के रक्कम ही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना देण्यात आली आहे. परंतु, हे करत असताना केंद्र शासनाने पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम सक्तीची केली आहे. त्यानुसार जोपर्यंत सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर नोंद केली जात नाही, तोपर्यंत ही प्रणाली कार्यरतच होत नाही.

ही प्रणाली सुरू करून वर्ष होऊन गेले. परंतु, त्यातील काही तांत्रिक बाबींची अडचण असल्याने ही प्रणाली सुरूच करता येत नव्हती, असा काहींचा अनुभव आहे. तसेच कोरोना काळात सर्वच ग्रामपंचायतींच्या कामाचे धोरणच बदलल्याने या डिजिटल सिग्नेचर नोंदणीकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींचे जुने हिशेब पूर्ण नसल्याने या प्रक्रियेला विलंब होत आहे. राज्यात निवडक जिल्हे वगळता बहुतांशी जिल्ह्यांत ही प्रक्रिया संथपणाने सुरू आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून विकासकामे करण्यावरही मर्यादा येत आहेत.

चौकट

या जिल्ह्यांचे काम झाले ५० टक्केवर

अहमदनगर, अकोला, धुळे, गडचिरोली, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, सांगली, वर्धा या जिल्ह्यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ५० टक्केहून अधिक ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत करून घेतली आहे. राज्यात धुळे जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, या जिल्ह्याच्या ९९ टक्के ग्रामपंचायतींनी ही प्रणाली नोंद केली आहे. तर जळगाव आणि जालना जिल्ह्यांत हे प्रमाण केवळ ७ टक्क्यांवर आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांचे हे काम २५ टक्क्यांच्या खाली आहे.