शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

राज्यातील बहुतांशी ग्रामपंचायती डिजिटल सिग्नेचरबाबत उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर असल्याशिवाय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर असल्याशिवाय कोणालाही रक्कम अदा करता येणार नाही, असे असताना राज्यातील ३४पैकी २५ जिल्ह्यांतील हे काम ५० टक्क्यांपेक्षा पुढे गेलेले नाही. त्यामुळे निधी मिळाला तरी तो खर्च करता येत नसल्याचे चित्र समोर येत आहे.

वित्त आयोगाच्या निधीतून ८० टक्के रक्कम थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झालेली आहे. प्रत्येकी १० टक्के रक्कम ही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना देण्यात आली आहे. परंतु, हे करत असताना केंद्र शासनाने पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम सक्तीची केली आहे. त्यानुसार जोपर्यंत सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर नोंद केली जात नाही, तोपर्यंत ही प्रणाली कार्यरतच होत नाही.

ही प्रणाली सुरू करून वर्ष होऊन गेले. परंतु, त्यातील काही तांत्रिक बाबींची अडचण असल्याने ही प्रणाली सुरूच करता येत नव्हती, असा काहींचा अनुभव आहे. तसेच कोरोना काळात सर्वच ग्रामपंचायतींच्या कामाचे धोरणच बदलल्याने या डिजिटल सिग्नेचर नोंदणीकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींचे जुने हिशेब पूर्ण नसल्याने या प्रक्रियेला विलंब होत आहे. राज्यात निवडक जिल्हे वगळता बहुतांशी जिल्ह्यांत ही प्रक्रिया संथपणाने सुरू आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून विकासकामे करण्यावरही मर्यादा येत आहेत.

चौकट

या जिल्ह्यांचे काम झाले ५० टक्केवर

अहमदनगर, अकोला, धुळे, गडचिरोली, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, सांगली, वर्धा या जिल्ह्यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ५० टक्केहून अधिक ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत करून घेतली आहे. राज्यात धुळे जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, या जिल्ह्याच्या ९९ टक्के ग्रामपंचायतींनी ही प्रणाली नोंद केली आहे. तर जळगाव आणि जालना जिल्ह्यांत हे प्रमाण केवळ ७ टक्क्यांवर आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांचे हे काम २५ टक्क्यांच्या खाली आहे.