शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राज्यातील बहुतांशी ग्रामपंचायती डिजिटल सिग्नेचरबाबत उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर असल्याशिवाय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर असल्याशिवाय कोणालाही रक्कम अदा करता येणार नाही, असे असताना राज्यातील ३४पैकी २५ जिल्ह्यांतील हे काम ५० टक्क्यांपेक्षा पुढे गेलेले नाही. त्यामुळे निधी मिळाला तरी तो खर्च करता येत नसल्याचे चित्र समोर येत आहे.

वित्त आयोगाच्या निधीतून ८० टक्के रक्कम थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झालेली आहे. प्रत्येकी १० टक्के रक्कम ही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना देण्यात आली आहे. परंतु, हे करत असताना केंद्र शासनाने पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम सक्तीची केली आहे. त्यानुसार जोपर्यंत सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल सिग्नेचर नोंद केली जात नाही, तोपर्यंत ही प्रणाली कार्यरतच होत नाही.

ही प्रणाली सुरू करून वर्ष होऊन गेले. परंतु, त्यातील काही तांत्रिक बाबींची अडचण असल्याने ही प्रणाली सुरूच करता येत नव्हती, असा काहींचा अनुभव आहे. तसेच कोरोना काळात सर्वच ग्रामपंचायतींच्या कामाचे धोरणच बदलल्याने या डिजिटल सिग्नेचर नोंदणीकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींचे जुने हिशेब पूर्ण नसल्याने या प्रक्रियेला विलंब होत आहे. राज्यात निवडक जिल्हे वगळता बहुतांशी जिल्ह्यांत ही प्रक्रिया संथपणाने सुरू आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून विकासकामे करण्यावरही मर्यादा येत आहेत.

चौकट

या जिल्ह्यांचे काम झाले ५० टक्केवर

अहमदनगर, अकोला, धुळे, गडचिरोली, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, सांगली, वर्धा या जिल्ह्यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ५० टक्केहून अधिक ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत करून घेतली आहे. राज्यात धुळे जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, या जिल्ह्याच्या ९९ टक्के ग्रामपंचायतींनी ही प्रणाली नोंद केली आहे. तर जळगाव आणि जालना जिल्ह्यांत हे प्रमाण केवळ ७ टक्क्यांवर आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांचे हे काम २५ टक्क्यांच्या खाली आहे.