शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुरगूड परिसरात आणखी गॅस्ट्रोचे रुग्ण

By admin | Updated: November 18, 2014 01:02 IST

विविध रुग्णालयात दाखल : साथ नसल्याचा तालुका आरोग्याधिकाऱ्यांचा निर्वाळा

मुरगूड : मुरगूड परिसरातील बोळावी, चिमगाव, करंजिवणे, शिंदेवाडी, कुरणी, यमगे, सुरूपली आदी गावांतून गेल्या पंधरा दिवसांत मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात ११८ ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यातील १०९ रुग्णांना घरी पाठविले आहे. अद्याप नऊजणांवर उपचार सुरू असून, आज दिवसभरामध्ये शहरातील विविध रुग्णालयात २५ हून अधिक ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दाखल झाले आहेत. पण कागल तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कोणतीच साथ पसरली नसल्याचा निर्वाळा कागलमध्ये बसून निवेदनाद्वारे दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरातील हळदवडे, सुरूपली, यमगे, शिंदेवाडी या गावांत गॅस्ट्रोसदृश साथीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. हळदवडे गावात तर दोन दिवस चिखली आरोग्य विभागाचे पथक ठाण मांडूनच बसले होते. पैकी काही रुग्णांचा गॅस्ट्रोचा रिपोर्टही सकारात्मक मिळाला होता. युद्धपातळीवर या गावांत उपाययोजना झाल्यानंतर रुग्णांच्या पंक्तीत सुधारणा झाली होती. या गावांमध्ये सभापती पिंटू यांनी भेट दिली होती, पण सध्या आठ दिवसांपासून बोळावी, चिमगाव, करंजिवणे, कुरणी गावात या लक्षणाचे रुग्ण आढळत आहेत. रुग्णांना मोठ्या प्रमाणात जुलाब उलट्या सुरू झाल्या आहेत. त्यामधील बरेचसे रुग्ण मुरगूडच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचीच नोंद मिळते.शहरातील खासगी रुग्णालयामध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहेत. अशा पद्धतीची गंभीर परिस्थिती असताना आणि आज सर्वच वर्तमानपत्रात याबाबत वृत्त प्रसिद्ध हाऊनसुद्धा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने नागरिकांत अंसतोष आहे. रुग्णांवर चांगल्या पद्धतीने ग्रामीण रुग्णालयात उपचार होत आहेत, पण ज्या गावांतून रुग्ण येत आहेत, त्या गावांमध्ये जाऊन तेथील परिस्थिती पाहण्याची गरज आहे.आरोग्याधिकाऱ्यांनी हाकल्या उंटावरून शेळ्या आज मुरगूड परिसरामधील कोणत्याच गावामध्ये गॅस्ट्रोसदृश आजाराची साथ नसल्याचा निर्वाळा कागल तालुका आरोग्याधिकारी डॉ. अजितकुमार गवळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर जावक क्रमांक शासकीय कोणताही शिक्का नसून हे एका साध्या कागदावर तयार केले आहे. शहराच्या परिसरातील रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयात भरती होत असताना कागलमध्ये बसून आपल्या कर्मचाऱ्यांकरवी निवेदन देणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे हे अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.