शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

यंदा ‘आयटीआय’ला गेल्या वर्षीपेक्षा जादा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

अकरावी, बारावीच्या शिक्षणाच्या तुलनेत आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास कमी खर्च येतो. कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले तर कोणाला ...

अकरावी, बारावीच्या शिक्षणाच्या तुलनेत आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास कमी खर्च येतो. कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले तर कोणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. या दोन्ही परिस्थितीत हातात कला असणाऱ्या मात्र फारशी अडचण आली नाही. एक, दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एखादे कौशल्य प्राप्तीबरोबरच हाताला रोजगार मिळत असल्याने ग्रामीण भागातील अधिकतर विद्यार्थ्यांचे आयटीआयमध्ये प्रवेशित होण्याला अधिक प्राधान्य आहे. त्यामध्ये विद्यार्थिनींचे प्रमाणही समाधानकारक आहे. त्यामुळे यावर्षी ११ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने यंदाच्या अर्जांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

पॉईंटर

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय : १२

एकूण प्रवेश क्षमता : ३२५२

खासगी आयटीआय : ३९

एकूण प्रवेश क्षमता : ३२०४

आतापर्यंत आलेले अर्ज : ११ हजार

चौकट

गेल्यावर्षी पेक्षा चांगले चित्र

गेल्यावर्षी जिल्ह्यातील आयटीआयसाठी ८९०० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. यावर्षी आतापर्यंत ११ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे यंदा चांगले चित्र आहे.

प्रतिक्रिया

म्हणून वाढले आयटीआयचे विद्यार्थी

कमी खर्चात रोजगाराभिमुख शिक्षण मिळत असल्याने आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. निदेशकांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रमांची माहिती दिली जात आहे.

-आर. एस. मुंडासे, प्राचार्य, शासकीय आयटीआय कळंबा

आयटीआयमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार, स्वयंरोजगाराच्या अनेक संधींची दारे खुली होतात. कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे अधिक ओढा आहे.

- विलास सोनवणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी

विद्यार्थी म्हणतात

आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगारासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. त्यामुळे आयटीआयमधील प्लंबिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहे.

-स्वप्नील पोवार, जाधववाडी