शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ‘आयटीआय’ला गेल्या वर्षीपेक्षा जादा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

अकरावी, बारावीच्या शिक्षणाच्या तुलनेत आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास कमी खर्च येतो. कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले तर कोणाला ...

अकरावी, बारावीच्या शिक्षणाच्या तुलनेत आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास कमी खर्च येतो. कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले तर कोणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. या दोन्ही परिस्थितीत हातात कला असणाऱ्या मात्र फारशी अडचण आली नाही. एक, दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एखादे कौशल्य प्राप्तीबरोबरच हाताला रोजगार मिळत असल्याने ग्रामीण भागातील अधिकतर विद्यार्थ्यांचे आयटीआयमध्ये प्रवेशित होण्याला अधिक प्राधान्य आहे. त्यामध्ये विद्यार्थिनींचे प्रमाणही समाधानकारक आहे. त्यामुळे यावर्षी ११ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने यंदाच्या अर्जांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

पॉईंटर

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय : १२

एकूण प्रवेश क्षमता : ३२५२

खासगी आयटीआय : ३९

एकूण प्रवेश क्षमता : ३२०४

आतापर्यंत आलेले अर्ज : ११ हजार

चौकट

गेल्यावर्षी पेक्षा चांगले चित्र

गेल्यावर्षी जिल्ह्यातील आयटीआयसाठी ८९०० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. यावर्षी आतापर्यंत ११ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे यंदा चांगले चित्र आहे.

प्रतिक्रिया

म्हणून वाढले आयटीआयचे विद्यार्थी

कमी खर्चात रोजगाराभिमुख शिक्षण मिळत असल्याने आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. निदेशकांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रमांची माहिती दिली जात आहे.

-आर. एस. मुंडासे, प्राचार्य, शासकीय आयटीआय कळंबा

आयटीआयमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार, स्वयंरोजगाराच्या अनेक संधींची दारे खुली होतात. कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे अधिक ओढा आहे.

- विलास सोनवणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी

विद्यार्थी म्हणतात

आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगारासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. त्यामुळे आयटीआयमधील प्लंबिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहे.

-स्वप्नील पोवार, जाधववाडी