शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षा जगण्याचीच अधिक चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST

भारत चव्हाण / कोल्हापूर : देशभरातील कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाची महामारी, पहिली लाट ओसरते ना ओसरते तोच दुसरी लाट, सतत ...

भारत चव्हाण / कोल्हापूर : देशभरातील कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाची महामारी, पहिली लाट ओसरते ना ओसरते तोच दुसरी लाट, सतत वाढत असलेला रोगाचा संसर्ग, संचारबंदी, कडकडीत लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्यांचं जगणं हैराण झालं असून, यापुढील काळात जनतेला काेरोनापेक्षा जगण्याचीच अधिक चिंता लागून राहिली आहे.

एकीकडे कोरोनाच्या महामारीतून जगलो तरच आपण काही मिळवू - कमवू शकू, असे सांगितले जात असले तरी उत्पन्नाचे सर्वच मार्ग जेव्हा खुंटतात, तेव्हा जगण्यासाठी पोट कसं भरायचं, या एकाच प्रश्नाने सर्वसामान्यांना सतावून सोडले आहे. कोरोनापेक्षा हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. सर्वसामान्यांच्या या दुखण्यावर समाजानं, प्रशासनानं, शासनानं कितीही फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. मोडकी - तोडकी का असेना मदत केली तरी त्याने सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजा दीर्घकाळ भागणार नाहीत, हे वास्तव आहे.

गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरु झाला आणि नागरिकांच्या जगण्याला ग्रहण लागले. श्रीमंतांच्या महालापासून ते झोपडीपर्यंत सर्वांनाच त्याची झळ कमी-अधिक प्रमाणात बसली आहे. परंतु, ज्यांचे हातावरचे पोट आहे, रोजंदारीवर कुटुंबाचा गाडा चालतो अशांना त्याची झळ अधिक बसली आहे. हातचं राखून ठेवलेलं सगळं संपलं आहे, आता उद्या खायचं काय आणि जगायचं कसं, याच प्रश्नांनी सुकलेल्या मनात घर करुन टाकले आहे.

कोरोनामुळे केवळ उद्योग, व्यवसाय, व्यापारच बुडालेला नाही तर प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही नुकसान होत आहे. त्यांचे खच्चीकरण होताना दिसत आहे. नोकरी-रोजगार बुडाल्याने तरुण हैराण आहे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होत आहे. प्रत्येक घटकावर परिणाम झालेला आहे. यातून कसं उभं राहायचं, पुन्हा पूर्ववत परिस्थिती येण्याकरिता आणखी किती काळ जाईल, याबाबतच्या शंका-कुशंकांची चिंता प्रत्येकाला सतावत आहे.

- दोन-अडीचशे रुपये मिळायचेही बंद -

कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे. दिवसभर राबल्यावर पेट्रोल खर्च वगळता चारशे-पाचशे रुपये मिळत होते. अंशत: लॉकडाऊनच्या काळात सकाळी सात ते अकरा यावेळेत दोन अडीचशे रुपये मिळायचे. त्यातून दूध, भाजीपाला भागत होता. पण कडकडीत लॉकडाऊनच्या काळात तेही मिळणे बंद झाले. ज्यांची स्वत:ची रिक्षा आहे, त्याचे त्यातल्या त्यात बरे, पण जो दुसऱ्याची रिक्षा चालवतो, त्याचे काय हाल झाले असतील, याची कल्पनाही न केलेली बरी.

- विद्यार्थ्यांचं असंही नुकसान -

गेले वर्षभर शाळा, महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. काही शाळा सुरु झाल्या पण दुसऱ्या लाटेच्या भीतीने बंद झाल्या. ऑनलाईन शिक्षणाच्या धोरणामुळे शैक्षणिक नुकसान तर झाले आहेच, शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांचे बौध्दिक नुकसानही झाले आहे. ऑनलाईन शिक्षण देताना, समजून देताना आणि घेताना बरीच दमछाक झाली. त्याचा एकंदर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना बाहेर पडायचे आहे.