शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पावसाळ्यापूर्वी कळंबा तलावातील गाळ काढणार

By admin | Updated: March 20, 2016 01:05 IST

चंद्रकांतदादा पाटील : जलयुक्त शिवार अभियानातून कामास सुरुवात; तलावाच्या सुशोभीकरणास मदत

कळंबा : ऐतिहासिक कळंबा तलावातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जाईल. यासाठी जी यंत्रसामग्री लागेल, ती दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिली. कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथील कळंबा तलाव येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ काढण्याच्या प्रारंभप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून राज्य २०१९ पर्यंत पाणीटंचाईमुक्त करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. २०१५-१६ ला सरकारने जलयुक्त शिवार अभियानावर १४०० कोटी रुपये खर्च केले, तर यावर्षी २०१६-१७ ला एक हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्याचबरोबर २५ हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली आहे, तर पाच लाख सोलर पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. तसेच, कळंबा तलावातील गाळ काढण्यात येत आहे. हा गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जाईल. सतेज पाटील म्हणाले, कळंबा तलावाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी आणखी यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. तीन महिन्यांच्या आत काम करण्यास जलसंपदा विभागाला सांगितले आहे. कोणतेही राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून हे काम व्हावे. उन्हाळ्यात कळंबा ग्रामस्थांना पाणी पुरविण्यासाठी महापालिका कुठे कमी पडणार नाही. अमल महाडिक म्हणाले, या तलावातील ५० हजार क्युबिक मीटर गाळ काढायचा आहे. काही मदत लागेल ती देऊ. कळंबा तलावासाठी चंद्रकांतदादा पाटील यांची मदत झाली. जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात ५७५ कामे सुरू आहेत, तर २८ कोटी ४० लाखांचा आराखडा तयार आहे.