शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

शाळा प्रवासासाठी ८०६ विद्यार्थ्यांच्या आईच्या बँक खात्यावर जमा होणार पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यातील ज्या गाव, वस्तीमध्ये अथवा वाड्यांमध्ये घरापासून एक किलोमीटरपर्यंत शाळा नसल्यास आणि इयत्ता सहावी ...

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यातील ज्या गाव, वस्तीमध्ये अथवा वाड्यांमध्ये घरापासून एक किलोमीटरपर्यंत शाळा नसल्यास आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत तीन किलोमीटरपर्यंत शाळा नसल्यास दरमहा वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. प्रतिविद्यार्थी दरमहा तीनशे रुपये असा भत्ता आहे. या भत्त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे एकूण ८०६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यात ग्रामीण क्षेत्रातील ६६३ आणि शहरी क्षेत्रातील १४३ विद्यार्थी आहेत. त्यांना एकूण ४,८३६०० रुपये भत्ता वितरित केला जाणार आहे. या भत्त्यासाठी जिल्ह्यात २९४ इतके सर्वाधिक विद्यार्थी हे राधानगरी तालुक्यातील आहेत.

पॉईंटर्स

प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिमाह : ३०० रुपये

जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थी : ८०६

तालुकानिहाय लाभार्थी

आजरा : ३०

भुदरगड :४७

चंदगड :८५

गडहिंग्लज : १६

गगनबावडा :६४

हातकणंगले : २८

कागल :१६

करवीर :१८

राधानगरी : २९४

शाहूवाडी : ३८

शिरोळ : ४३

कोल्हापूर शहर : १२७

प्रतिक्रिया

शासन आदेशानुसार या विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधेसाठी भत्ता देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे. प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या भत्त्याचे वितरण करण्यात येईल.

- आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

चौकट

फेब्रुवारी, मार्चचा भत्ता

या भत्त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची शाळेमध्ये ५० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. शाळा सुरू असल्यास आणि नियमानुसार उपस्थिती असेल, तरच निधी देण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांतील ऑफलाईन वर्ग दि. २७ जानेवारीपासून सुरू झाले. त्यानंतर मार्चपर्यंत शाळा सुरू राहिल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी, मार्चचा भत्ता दिला जाणार आहे. वर्ग भरल्याने आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याने या दोन महिन्यांचा भत्ता देण्यात कोल्हापूर जिल्ह्यात कोणतीही अडचण नाही.