शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सोमवारपासून टोलवसुली ? ‘आयआरबी’ची तयारी : कामगारांसह यंत्रणेची जुळणी सुरू

By admin | Updated: May 15, 2014 01:03 IST

कोल्हापूर : सर्वाेच्च न्यायालयाने टोलला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविली व लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून रिकामे होणारे

कोल्हापूर : सर्वाेच्च न्यायालयाने टोलला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविली व लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून रिकामे होणारे पोलीस यामुळे पुढील आठवड्यात सोमवारपासून पुन्हा टोल वसुली सुरू करण्याची तयारी आयआरबीने केली आहे. यासाठी आवश्यक कामगार, यंत्रणा व प्रशासकीय कागदपत्रांची जोडणी सुरू असल्याची माहिती आयआरबीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मनोज चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील टोल वसुलीस दिलेली स्थगिती ५ मे रोजी सर्वाेच्च न्यायालयाने उठविली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या निकालावर फेरविचार करून ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. टोलची लढाई आता पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात उन्हाळी सुटी संपल्यावर १२ जूननंतर रंगणार आहे. तोपर्यंत आयआरबीस उच्च न्यायालयाचा पुढील आदेश मिळेपर्यंत टोलवसुलीस सुरुवात करता येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे कोणत्याही क्षणी टोलवसुलीची तयारी आयआरबीने केली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने टोलवसुलीसाठी पोलीस संरक्षण देण्याची सूचना केल्याचे आयआरबीचे म्हणणे आहे. निवडणुकीचा निकाल लागताच टोलवसुली सुरू करण्याची तयारी आयआरबीने केली आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारी व यंत्रणा उभारणीचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आवश्यक यंत्रणा उभारणीनंतर पुढील आठवड्यात सोमवारनंतर केव्हाही टोल वसुलीस सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.