शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

वासाच्या दुधाचे आश्वासन म्हणजे मोदींच्या १५ लाखाप्रमाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

(अरुण डोंगळे यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दूध उत्पादकांचे वासाचे दूध परत करण्याचे दिलेले ...

(अरुण डोंगळे यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दूध उत्पादकांचे वासाचे दूध परत करण्याचे दिलेले वचन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ लाख रुपयांच्या आश्वासनाप्रमाणेच असल्याची स्पष्ट कबुली ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या वक्तव्याने उपस्थित अध्यक्ष विश्वास पाटील आणि अन्य संचालकही अवाक झाले. मात्र, ऐन सर्वसाधारण सभेच्या तोंडावर विरोधकांना आयते कोलीत दिल्याची चर्चा संघात सुरु आहे.

‘गोकुळ’ची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २४) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत टँकरप्रमाणेच वासाच्या दुधाचा प्रश्न चांगलाच गाजला. विरोधकांनी हा मुद्दा घेऊन तत्कालीन सत्ताधाऱ्यांना हैराण केले होते. संघात सत्तांतर होऊन तीन - चार महिने झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वासाचे दूध शेतकऱ्यांना परत देण्याच्या वचनाचे काय झाले? अशी विचारणा केली असता अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, एकूण संकलनाच्या तुलनेत वासाच्या दुधाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. यामध्ये हस्तक्षेप करत संचालक अरुण डोंगळे म्हणाले, हे दूध परत देणे शक्य नाही. निवडणुकीत दिलेले वचन म्हणजे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ लाख रुपयांच्या आश्वासनाप्रमाणेच आहे. डोंगळे यांच्या या विधानाने उपस्थित संचालक चांगलेच अवाक झाले.

नेत्यांना सगळं माहिती नसते

वासाच्या दुधाची टक्केवारी कित्येक वर्षी तीच आहे. याबाबत जुन्या नेत्यांना थोडी माहिती होती. मात्र, या नेत्यांना सगळं माहिती नाही, असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.