शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काळ्या पैशाबाबत मोदींनी माफी मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:47 IST

कोल्हापूर : परदेशातील काळा पैसा भारतात आणून सामान्य माणसाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये भरण्याची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले; पण आता परदेशात काळा नव्हे तर ‘पांढरा पैसा’ असल्याचा साक्षात्कार अर्थमंत्री अरुण जेटली व नरेंद्र मोदी यांना झाला आहे. त्यांनी खोटे बोलून जनतेला फसविले असून, याबद्दल देशाची माफी ...

कोल्हापूर : परदेशातील काळा पैसा भारतात आणून सामान्य माणसाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये भरण्याची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले; पण आता परदेशात काळा नव्हे तर ‘पांढरा पैसा’ असल्याचा साक्षात्कार अर्थमंत्री अरुण जेटली व नरेंद्र मोदी यांना झाला आहे. त्यांनी खोटे बोलून जनतेला फसविले असून, याबद्दल देशाची माफी मागावी, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी केली. बोगस शेतकऱ्यांची बैठक घेऊन ‘एफआरपी’ची पुनर्रचना केली, तर ऊसपट्ट्यात ‘कमळ’ औषधालाही ठेवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.राजू शेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत शेतकºयांची बैठक घेऊन आगामी हंगामात एफआरपी वाढीबाबत सूतोवाच केले; पण या हंगामाची अगोदरच एफआरपी निश्चित केली जाते. भाजपला मानणाºया शेतकºयांना तेही प्रश्न न विचारण्याच्या अटीवर बैठकीसाठी बोलावले. बैठकीचे नुसते नाटक असून वाढीव एफआरपी परवडत नसल्याने साखर कारखानदारांच्या आडून नरेंद्र मोदींनी ‘एफआरपी’चा ९.५ टक्के ऐवजी १० टक्के बेस करण्याचा घाट घातला आहे; त्यामुळे दोनशे रुपये नव्हे केवळ ५५ रुपयेच वाढीव एफआरपी मिळणार आहे. बोगस शेतकºयांची बैठक घेवून ‘एफआरपी’ची पुनर्रचना कराल तर ऊसपट्ट्यात ‘कमळ’ औषधालाही ठेवणार नाही. दीडपट हमीभावाची मखलाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद करावी.बैठक नव्हे, सत्कारदेशातील शेतकºयांना शेतीमालाच्या दराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावले नव्हते, तर शेतकºयांच्या वतीने सत्कार करून घेण्यासाठीच ही बैठक होती. एवढी वाईट वेळ पंतप्रधानांवर आल्याची टीका शेट्टी यांनी केली.थकीत एफआरपी द्यावीच लागेलशेतकºयांची थकीत एफआरपी द्यावीच लागेल; त्याचबरोबर आगामी हंगामात वाढीव एफआरपीमुळे शॉर्टमार्जिन झाले तर ते कसे भरून काढायचे हा कारखानदारांचा प्रश्न आहे. साखरेचा दर २९०० ऐवजी ३१०० रुपयांवर निश्चित करावा. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असेही शेट्टी यांनी सांगितले.बापट यांनी मका शेतकºयांना द्यावामक्याची भाकरी अपवादाने खाल्ली जाते. अन्नपुरवठा मंत्री गिरीश महाजन यांना मका खपवायचा असल्यास त्यांनी पशुखाद्यासाठी द्यावा, शेतकरी घेण्यास तयार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.निर्णय फसलाराज्य सरकारने दूध पावडर उत्पादन करणाºया दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. दोन महिन्यांत सरकारचे यावर ५३ कोटी खर्च होऊनही पावडरचे दर पडलेले आहेत. सरकारचा हा निर्णय फसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.मुंबईकर दुधासाठी तडफडतील११ वर्षांपूर्वी दूध दरवाढीसाठी असाच संघर्ष केला होता, त्यावेळी मुंबईकडे जाणारे दूध रोखले होते. अहमदाबाद, नाशिक व पुणे या तिन्ही मार्गाने मुंबईत जाता येते, तिथेच नाकाबंदी करून मुंबईत एक थेंबही दुुधाचा सोडणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.दूध अनुदानासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊराज्य सरकारने १५ जुलैपर्यंत गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अन्यथा १६ जुलैपासून बेमुदत दूध संकलन बंद करण्यात येईल. मुंबईला जाणाºया सर्व रस्त्यांची नाकेबंदी करून दुधाचा थेंबही जाऊ देणार नाही, प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.खासदार शेट्टी म्हणाले, दुधाचे खरेदी दर कमी झाल्याने गाय दूध उत्पादक कमालीचा अडचणीत सापडला आहे. या संकटाची पूर्वसूचना दीड वर्षापूर्वी केंद्रीय कृषिमंत्र्यांना दिली होती. त्याला सावरण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी २९ जून रोजी दुग्ध आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. शेजारील राज्यांप्रमाणे दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत राज्य सरकारने १५ जुलैपर्यंत निर्णय घ्यावा. राज्यात रोज एक कोटी लिटर गाय दूध उत्पादन आहे. प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी पाच कोटी लागतात. त्यासाठी सरकारने ४५० कोटींची मदत करणे अपेक्षित आहे.डेन्मार्क, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियामध्ये असेच संकट आहे, तेथील शेतकºयांनी गार्इंचे संगोपन बंद करून कत्तलखान्याकडे पाठवल्या, येथे तेही करता येत नाही. केंद्र सरकारने अतिरिक्त पावडर खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करणे अपेक्षित होते; पण तसे न केल्याने पेच निर्माण झाला. दूध संघांनाही आवाहन आहे, आमच्या लढाईत त्यांनी साथ द्यावी. आमच्या आडवे येऊ नका. सरकारने अनुदानाचा निर्णय घेतला तर ठीक, अन्यथा आंदोलनाचा वणवा पेटणार असून त्याच्या तयारीसाठी कोल्हापुरात ६ जूलै रोजी दूध उत्पादकांचा मेळावा घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी प्रा. जालंदर पाटील, अनिल मादनाईक, भगवान काटे, आदी उपस्थित होते.