शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार

By admin | Updated: December 9, 2014 23:52 IST

रघुनाथदादा पाटील : उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्या

इस्लामपूर : केंद्र शासनाने परदेशातून शेतीमालाची आयात केल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील शेतमालाचे भाव कोसळले आहेत. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळू लागल्यानेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण वाढले असून, त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या हंगामात उसाला ३५०० रुपयांची पहिली उचल द्यावीच लागेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी साखर कारखानदारांना दिला.ऊसदर हक्कासाठी २५ नोव्हेंबरपासून किल्ले शिवनेरीवरून सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचे आगमन आज (मंगळवारी) इस्लामपूर येथे झाले. यावेळी त्यांनी हुतात्मा, राजारामबापू व सर्वोदय साखर कारखाना येथे कारखानदार प्रतिनिधींशी संवाद साधून ३५०० रुपयांची पहिली उचल देणे कसे शक्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ऊस तोडणी मजुरांना समान काम, समान वेतन कायद्यानुसार हार्वेस्टर यंत्राइतकीच ऊस तोडणी मजुरी मिळाली पाहिजे. केंद्रीय कृषिमूल्य व उत्पादन खर्च आयोगाने चुकीच्या पध्दतीने मूल्यांकन केल्याने शेतकऱ्यांचे २२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून उसावर प्रतिटन ४००० रुपयांचा प्रत्यक्ष कर आकारला जातो. इतर अप्रत्यक्ष करांची यादी वेगळीच आहे. या करातील निम्मा वाटा शासनाने दिला, तर शेतकऱ्यांना ४००० रुपयांचा दर मिळेल. उत्पादन खर्च, नफ्यातील ५० टक्के वाटा व अतिरिक्त उताऱ्याचे ३०० रुपये गृहित धरून ३५०० रुपयांचा भाव देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन कृतीत आणावे. (वार्ताहर)सत्तासुंदरीची टाच दिसेनास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर कोटी करताना रघुनाथदादांनी ‘पिंजरा’ चित्रपटातील आदर्श मास्तरची लावण्यवतीच्या नादाला लागून कशी वाताहत झाली, याची आठवण करून दिली. आज शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे स्वाभिमानीचे शिलेदार सत्तासुंदरीच्या नादाला लागले आहेत; मात्र अद्याप त्यांना या सत्तासुंदरीची टाचही दिसलेली नाही. त्यामुळे ‘यांच्या आदर्शाचा तोरा, त्यांचा कागद आहे कोरा’ अशी अवस्था झाल्याचा टोला पाटील यांनी मारला.