शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार

By admin | Updated: December 9, 2014 23:52 IST

रघुनाथदादा पाटील : उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्या

इस्लामपूर : केंद्र शासनाने परदेशातून शेतीमालाची आयात केल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील शेतमालाचे भाव कोसळले आहेत. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळू लागल्यानेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण वाढले असून, त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या हंगामात उसाला ३५०० रुपयांची पहिली उचल द्यावीच लागेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी साखर कारखानदारांना दिला.ऊसदर हक्कासाठी २५ नोव्हेंबरपासून किल्ले शिवनेरीवरून सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचे आगमन आज (मंगळवारी) इस्लामपूर येथे झाले. यावेळी त्यांनी हुतात्मा, राजारामबापू व सर्वोदय साखर कारखाना येथे कारखानदार प्रतिनिधींशी संवाद साधून ३५०० रुपयांची पहिली उचल देणे कसे शक्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ऊस तोडणी मजुरांना समान काम, समान वेतन कायद्यानुसार हार्वेस्टर यंत्राइतकीच ऊस तोडणी मजुरी मिळाली पाहिजे. केंद्रीय कृषिमूल्य व उत्पादन खर्च आयोगाने चुकीच्या पध्दतीने मूल्यांकन केल्याने शेतकऱ्यांचे २२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून उसावर प्रतिटन ४००० रुपयांचा प्रत्यक्ष कर आकारला जातो. इतर अप्रत्यक्ष करांची यादी वेगळीच आहे. या करातील निम्मा वाटा शासनाने दिला, तर शेतकऱ्यांना ४००० रुपयांचा दर मिळेल. उत्पादन खर्च, नफ्यातील ५० टक्के वाटा व अतिरिक्त उताऱ्याचे ३०० रुपये गृहित धरून ३५०० रुपयांचा भाव देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन कृतीत आणावे. (वार्ताहर)सत्तासुंदरीची टाच दिसेनास्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर कोटी करताना रघुनाथदादांनी ‘पिंजरा’ चित्रपटातील आदर्श मास्तरची लावण्यवतीच्या नादाला लागून कशी वाताहत झाली, याची आठवण करून दिली. आज शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे स्वाभिमानीचे शिलेदार सत्तासुंदरीच्या नादाला लागले आहेत; मात्र अद्याप त्यांना या सत्तासुंदरीची टाचही दिसलेली नाही. त्यामुळे ‘यांच्या आदर्शाचा तोरा, त्यांचा कागद आहे कोरा’ अशी अवस्था झाल्याचा टोला पाटील यांनी मारला.