शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पिराचीवाडीतील वैकुंठभूमी ठरतेय ‘मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:52 IST

म्हाकवे : मृत्यू कोणालाही सुटलेला नाही; परंतु मृत्यूनंतर अंत्यविधी हा पिराचीवाडी (ता. कागल) येथील सरपंच सुभाष भोसले यांच्या दूरदृष्टी आणि संकल्पनेतून नव्याने उभारलेल्या वैकुंठभूमीतच व्हावा, अशी धारणा येथील वैकुंठभूमीला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात होईल असे निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ व विस्तीर्ण परिसर गावच्या मुख्य प्रवेशद्वारावरच डोंगराच्या कुशीत उभारलेली ही वैकुंठभूमी होय.आमदार ...

म्हाकवे : मृत्यू कोणालाही सुटलेला नाही; परंतु मृत्यूनंतर अंत्यविधी हा पिराचीवाडी (ता. कागल) येथील सरपंच सुभाष भोसले यांच्या दूरदृष्टी आणि संकल्पनेतून नव्याने उभारलेल्या वैकुंठभूमीतच व्हावा, अशी धारणा येथील वैकुंठभूमीला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात होईल असे निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ व विस्तीर्ण परिसर गावच्या मुख्य प्रवेशद्वारावरच डोंगराच्या कुशीत उभारलेली ही वैकुंठभूमी होय.आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रेरणेतून केवळ सहा महिन्यांत पिराचीवाडी गावच्या कायापालटाचा ध्यास घेऊन सरपंच भोसले यांनी विकासकामांचा पाठपुरावा केला. त्यामुळे गावातील विकासकामांसाठी केवळ सहा महिन्यांत १ कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. गावातील अनेक कामे सुरू आहेत.कागल तालुक्यातील उंच ठिकाण असणारे हे गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. मुळात निसर्गाचे वरदान लाभलेल्या याठिकाणी आमदार हसन मुश्रीफ यांचा फंड, जनसुविधा योजना, लोकसहभाग व १४ व्या वित्त आयोगातून १५ लाखांचा निधी खर्च करून वैकुंठभूमीची उभारणी केली आहे.गावापासून दोनशे मीटर अंतरावर उत्तरेला डोंगराच्या पायथ्याशी असणाºया मोकळ्या जागेत या वैकुंठभूमीची उभारणी केली आहे. १०० बाय ७० इतक्या क्षेत्रात आकर्षक स्वागतकमान, सर्वत्र पेव्हिंग ब्लॉक, नातेवाइकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडी, सावलीसाठी मोठ्या झाडांसह शोभेची फुलझाडे यामुळे या वैकुंठभूमीचे सौंदर्य पाहतच बसावे असे बनविले आहे. हे काम अत्यल्प काळात पूर्णत्वाकडे गेले आहे.दरम्यान, गावकºयांना येथील धुरासह राखेमधून कोणतेही प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच या वैकुंठभूमीच्या सहभोवती अत्याधुनिक चेनलिंगचे कंपाऊंड करण्यात आले आहे.मीही अचंबित झालो : मुश्रीफज्या-ज्या गावात राष्ट्रवादीची सत्ता आहे,तेथे दर्जेदार विकासकामे होण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न असतो. एखाद्या व्यक्तीने गावाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला तर काय बदल होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पिराचीवाडी गाव होय.सरपंच सुभाष भोसले यांनी गावात विकासाचे मॉडेल बनविले आहे. त्यांनी साकारलेली जिल्ह्यातील एकमेव वैकुंठभूमी पाहून तर मीही अचंबितच झालो. अशा कार्यपद्धतीला आपल्या नेहमीच शुभेच्छा आणि पाठबळ राहील, अशी प्रतिक्रिया देत आमदार हसन मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त केले.