शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात चोरलेले मोबाईल थेट जातात दिल्ली, कर्नाटकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लहान मुलांचा वापर करुन शहरातून रोज शंभरहून अधिक मोबाईल संच चोरीला जात असल्याची धक्कादायक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लहान मुलांचा वापर करुन शहरातून रोज शंभरहून अधिक मोबाईल संच चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. आठवडा बाजारसह, गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरीला जात आहेत. मुलांचा मोबाईल चोरीसाठी वापर करणारी टोळी सदर बाजारातून दोघेजण चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. कोल्हापूरात चोरलेले मोबाईल आठवड्यात थेट दिल्ली, हवेरीला (कर्नाटक) पाठवले जातात, त्यामुळे तो पुन्हा परत मिळण्याच्या घटना दुर्मिळच.

भाजी खरेदीसाठी जाताना सावधान! असे म्हणण्याची वेळ आली. शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतिर्थ, रेल्वे स्टेशन, गंगावेश (शाहू उद्यान), टिंबर मार्केट या भाजी मार्केटसह लक्ष्मीपुरीतील कोंबडी बाजार, महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपूरीतून रोज मोबाईल चोरीच्या घटना घडतात. मोबाईल चोरीसाठी शहरात १५ ते २० लहान मुलांची टोळी सक्रीय असून वस्तू घेण्यासाठी ग्राहक वाकल्यानंतर त्याच्या खिशातून मोबाईल चोरला जातो. मुलांवर चोरीच्या संशयाचा प्रश्नच येत नाही. आठवडा बाजारातून मोबाईल चोरीच्या मोठ्या घटना घडताहेत. महाद्वार रोडवर महिला भीक मागतात, सोबतची मुले पर्स, पाकीट चोरत असल्याचे पोलिसांच्या सीसी टिव्हीमध्ये निदर्शनास आले. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यत चोरटे डाव साधून जागा बदलतात.

‘अविनाश, राजा’ टोळीचालक

सदर बाजार परिसरातून अविनाश आणि राजा नामक दोघे मोबाईल चोरट्या मुलांची टोळी चालवतात. चोरलेले मोबाईल रात्री त्यांच्याकडे आणून देतात, त्यांचा नाममात्र मोबदला मुलांना मिळतो. काही वर्षे हा चोरीछुपा प्रकार सुरु असूनही पोलिसांना थांगपत्ता नसल्याबाबत सांशकता आहे. मुलांना मोबाईल चोरीचे प्रशिक्षण दिले जाते. चोरी प्रकरणात दोघा म्होरक्यांची नावे पुढे आल्यास त्यांना पोलीस बोलवून त्यांची ‘फक्त’ चौकशी करतात.

आठवड्याला पोत्याने मोबाईल दिल्ली, हवेरीत

सदर बाजार येथून दर आठवड्याला किमान दिड ते दोन हजार मोबाईल पोत्यात भरुन दिल्ली अथवा कारवार व हवेरी (कनार्टक) येथे पाठवले जातात. अगर ते नेण्यासाठी तेथून खास व्यक्ती कोल्हापूरात येऊन मोबाईल घेऊन जाते.

बिहारची टोळी आली, मिरजहून रोज येतात

रोज सकाळी मिरजहून कोल्हापूरात यायचे दिवसभर मोबाईल चोरायचे अन सायंकाळी पुन्हा रेल्वेने मिरजला जायचे असाही दिनक्रम मिरजमधील मोबाईल चोरट्यांचा सुरु आहे. त्याशिवाय कोल्हापूरात मोबाईल चोरीला पर्वणी असल्याने आता बिहारच्या युवकांच्या टोळ्याही मोबाईल चोरीसाठी कोल्हापूरात आल्याची पोलिसांकडे माहिती आहे.

९० टक्के तक्रारी नाहीत, एक टक्का उघडकीस

मोबाईल चोरीच्या पोलीस ठाण्यात नोंदीसाठी ९० टक्के नागरीक पुढे येत नाहीत. फक्त सीमकार्ड ऑनलाईन बंद करुन गप्प राहतात. तसेच जे तक्रार देतात, त्यापैकी फक्त एक टक्केच मोबाईल सापडल्याच्या पोलिसांकडे नोंदी आहेत.

‘खोलखंडोबा’ परिसरातील फूटेज व्हायरल

चार दिवसापूर्वी शुक्रवार पेठेतील ‘खोलखंडोबा मंदीर’ परिसरात भीक मागणार्या महिलांसोबतचा मुलगा घराचा दरवाजा उघडून आत जाऊन मोबाईल चोरुन नेल्याचे सीसी टिव्ही फुटेज व्हायरल झाले. अशाच पध्दतीने मुलांचा मोबाईल चोरीसाठी सर्रास वापर होत आहे.