शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

‘मनरेगा’ रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची : नीता शिंदे

By admin | Updated: March 20, 2015 23:40 IST

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भातील पत्रकारांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची ठरली असून, त्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण होऊन विकासाला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नीता शिंंदे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भातील पत्रकारांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी तरूण वैती यांच्यासह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिंंदे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फळबाग लागवड केली जात आहे. यामुळे फळबागांचे क्षेत्र वाढून बागायतदारांना फायदा मिळत आहे. तसेच योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंंचन विहिरींच्या कामांमुळे पिण्यासाठी आणि सिंंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या जॉबकार्डधारकांना त्यांचे वेतन वेळेत उपलब्ध करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम (इएफएमएस) हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. याद्वारे जॉबकार्डधारकांचे वेतन हे थेट त्यांच्या बँकेतील खात्यात जमा करण्यात येत असल्याने वेतन मिळण्यासाठीचा विलंब कमी झाला आहे, असे त्या म्हणाल्या.सीद यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा परिचय करुन दिला. ते म्हणाले, योजनेच्या अंमलबजावणीत ग्रामसभेच्या रुपाने थेट ग्रामस्थांचा सहभाग असतो. गावपातळीवरील गरजेनुसार ग्रामस्थ कामांची निवड करत असल्याने गावासाठीची महत्त्वाची विकासकामे साध्य होत आहेत. या माध्यमातून गावाचा पर्यायाने जिल्ह्याचा विकास होतो आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून जिल्हाभरात ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिशय पारदर्शक अशी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले. एकात्मिक व प्रमुख कायदेशीर बाबी, योजनेची वैशिष्ट्ये, कामाचे स्वरूप, मजुरीचे वाटप, विलंबाचा आकार, बेरोजगार भत्ता तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांची भूमिका विशद केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली. यावेळी मार्गदर्शकांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात एकूण १,१३,८८४ जॉबकार्डधारक असून, त्यापैकी ३५,००० मजूर नियमित असल्याची माहिती रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांनी दिली. मजुरांची सर्व प्रकारची माहिती, तसेच चालू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची माहिती, त्यांचे वेतन आदी पूर्ण माहिती ६६६.ेॅल्ल१ीँ.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा दैनंदिन अहवाल या संकेतस्थळावर पाहात येऊ शकेल, असेही त्या म्हणाल्या.