शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मनरेगा’ रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची : नीता शिंदे

By admin | Updated: March 20, 2015 23:40 IST

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भातील पत्रकारांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची ठरली असून, त्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण होऊन विकासाला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नीता शिंंदे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भातील पत्रकारांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय कृषी विभागाचे तांत्रिक अधिकारी तरूण वैती यांच्यासह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिंंदे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फळबाग लागवड केली जात आहे. यामुळे फळबागांचे क्षेत्र वाढून बागायतदारांना फायदा मिळत आहे. तसेच योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंंचन विहिरींच्या कामांमुळे पिण्यासाठी आणि सिंंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या जॉबकार्डधारकांना त्यांचे वेतन वेळेत उपलब्ध करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम (इएफएमएस) हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. याद्वारे जॉबकार्डधारकांचे वेतन हे थेट त्यांच्या बँकेतील खात्यात जमा करण्यात येत असल्याने वेतन मिळण्यासाठीचा विलंब कमी झाला आहे, असे त्या म्हणाल्या.सीद यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा परिचय करुन दिला. ते म्हणाले, योजनेच्या अंमलबजावणीत ग्रामसभेच्या रुपाने थेट ग्रामस्थांचा सहभाग असतो. गावपातळीवरील गरजेनुसार ग्रामस्थ कामांची निवड करत असल्याने गावासाठीची महत्त्वाची विकासकामे साध्य होत आहेत. या माध्यमातून गावाचा पर्यायाने जिल्ह्याचा विकास होतो आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून जिल्हाभरात ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिशय पारदर्शक अशी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले. एकात्मिक व प्रमुख कायदेशीर बाबी, योजनेची वैशिष्ट्ये, कामाचे स्वरूप, मजुरीचे वाटप, विलंबाचा आकार, बेरोजगार भत्ता तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांची भूमिका विशद केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली. यावेळी मार्गदर्शकांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात एकूण १,१३,८८४ जॉबकार्डधारक असून, त्यापैकी ३५,००० मजूर नियमित असल्याची माहिती रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांनी दिली. मजुरांची सर्व प्रकारची माहिती, तसेच चालू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची माहिती, त्यांचे वेतन आदी पूर्ण माहिती ६६६.ेॅल्ल१ीँ.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा दैनंदिन अहवाल या संकेतस्थळावर पाहात येऊ शकेल, असेही त्या म्हणाल्या.